Thursday, 12 July 2018

दिनविशेष - १३ जुलै २०१८



तिथी
निज जेष्ठ कृष्ण ३० (८:१८), आषाढ शुक्ल १ (२८:३२)
वार
शुक्रवार
नक्षत्र
पुनर्वसु (१८:५९)
योग
व्यघात (८:३४), हर्षण (२८:२४)
करण
नाग (८:१८), किंस्तुग्घ्न(१८:२५), बव (२८:३२)


खंडग्रास सूर्यग्रहण

हे ग्रहण भारतामधून दिसणार नसल्याने ग्रहण वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत.
ग्रहण दिसणारे प्रदेश : ऑस्ट्रेलियाचे दक्षिण टोक, न्यूझीलंडचे पश्चिम टोक, हिंदी महासागर.
आरंभ : ७:१८
मध्य : ८:३१
समाप्ति : ९:४४
(सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार)

चंद्र हा पृथ्वी भोवती फिरणारा उपग्रह आहे. तो आपल्या कक्षावृत्तातून फिरत असताना जेव्हा सूर्याच्या आड येतो तेव्हा सूर्याचा संपूर्ण किंवा काही भाग आपणास दिसेनासा होतो. याला सूर्य ग्रहण म्हणतात.
  • -    चंद्राचा कक्षा मार्ग हा क्रांतीवृत्ताला सामोरा समोरच्या दोन बिंदूत सुमारे ५ अंशाचा विक्षेप कोण करून छेदतो.  त्यामुळे चंद्र स्वकक्षेत क्रांतीवृत्तापासून ५ अंश उत्तरेस किंवा दक्षिणेस असेल असताना अमावास्या किंवा पौर्णिमा झाली , तर त्या वेळी सूर्याच्या किंवा भूछायेच्या आड येऊन ग्रहण होते.
  • -    सूर्य ग्राहणात नेहमी सूर्यबिंबाच्या पश्चिमेकडील बाजूस सुरवात होते तर चंद्र ग्रहणात नेहमी चंद्रबिंबाच्या पूर्वेकडील बाजूने ग्रहण लागते.
  • -    चंद्र ग्रहण कधीही कंकणाकृती होत नाही

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

मासोपवासव्रत

आषाढ शुक्ल प्रतिपदा ते पौर्णिमेपर्यंत हे व्रत केले जाते. यामध्ये भगवान विष्णूची पूजा व स्वतः पंचगव्य घ्यावे. पौर्णिमेदिवशी व्रतसमाप्तीच्या वेळी ब्राह्मणभोजन घालून मग स्वतः जेवावे. याप्रमाणे हे मोक्षदायी व्रत सतत १३ वर्षे करावे. आषाढात जर शक्य झाले नाही, तर श्रावण किंवा भाद्रपद महिन्यात करता येते.


प्रतिपदा श्राद्ध

अपराण्ह काळी प्रतिपदा तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ आषाढ शुक्ल १ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment