तिथी
|
फाल्गुन कृष्ण २ (२४:५६)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
हस्त (११:०६)
|
योग
|
ध्रुव (२५:४१)
|
करण
|
तैतिल (१४:२१), गरज (२४:५६)
|
तुकाराम बीज
संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा
विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु ' म्हणून ओळखतात. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व संत कवी होते.
फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराज वैकुंठवासी झाले. हा दिवस तुकाराम बीज
म्हणून ओळखला जातो.
भारतीय चैत्र मासारंभ (शके १९४१)
भारतीय कालगणनेनुसार चैत्र
मास आरंभ होत आहे. शक १९४१ चा आरंभ होत आहे.
द्वितीया श्राद्ध
अपराण्ह काळी द्वितीया
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी फाल्गुन कृष्ण २ असेल तर या दिवशी
श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
©संकलन: सौ. प्राची शिंदे.
No comments:
Post a Comment