नूतन संवत्सर आरंभाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
तिथी
|
फाल्गुन अमावस्या (८:२७), चैत्र शुक्ल १ (२९:४५)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
उत्तराभाद्रपदा (१३:४१)
|
योग
|
ब्रह्मा (१८:१३)
|
करण
|
किंस्तुघ्न (१९:०९)
|
संवत्सरपूजा
चैत्र शुक्लप्रतिपदेला संवत्सरपूजा करावी. यात
मुख्यतः ब्रह्मदेव व त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीमधील मुख्य मुख्य देवता, यक्ष-राक्षस-गंधर्व, ॠषिमुनी, मनुष्यप्राणी, नद्या-पर्वत, पशुपक्षी, कीटक, इतकेच नव्हे, तर रोग व त्यांवरील उपचार
यांचीही पूजा करावी. यावरुन एकच गोष्ट सूचित होते व ती म्हणजे संवत्सर सर्वांत
प्रमुख व महामान्य होय.
ज्यात मासादी
योग्य प्रकारे निवास करतात. त्याला संवत्सर म्हणतात. संवत्सर म्हणजे बारा मासांचा
कालविशेष असाही दुसरा अर्थ आहे. श्रुतिवचन असेच आहे. (द्वादश मासाः संवत्सरः।
) ज्याप्रमाणे महिन्यांचे चांद्रमास, आदि तीन भेद आहेत, त्याचप्रमाणे संवत्सराचेही सौर, सावन व चांद्र
असे तीन भेद आहेत. परंतु अधिक मास (मलमास) धरुन चांद्रमास तेरा महिन्यांचा होतो.
अशा वेळी चांद्रमास बारा महिन्यांचा राहत नाही. स्मृतिकारकांनी या विषयाचे
स्पष्टीकरण असे केले आहे की बादरायणाने अधिक मासासह ३०-३० दिवसांचे दोन-दोन महिने
न मानता ६० दिवसांचा एक महिना धरला आहे. व अशातर्हेने वर्ष किंवा संवत्सर १२
मासाचेच होते.
तरीदेखील १३
मासांचे संवत्सर दुसर्या एका श्रुतिवचनानुसार होऊ शकते. ज्योतिःशास्त्रानुसार
संवत्सराचे सौर, सावन, चान्द्र, बार्हस्पत्य आणि नाक्षत्र असे ५ भेद आहेत. परंतु
धर्मकृत्यात आणि लौकिक व्यवहारात चांद्रसंवत्सर-गणना रूढ आहे. चांद्र-संवत्सराचा
आरंभ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो. यावर कोणी असे वि़चारिल की, चांद्रमास वद्य प्रतिपदेपासून प्रारंभ होतो, असे अस्ता चांद्रसंवत्सर शुध्द प्रतिपदेपासून सुरु होते हे
कसे ? याचे स्पष्टीकरण असे की, वद्य पक्षाच्या आरंभी मलमास
(आधिकमास) येण्याची शक्यता आहे, तशी शुक्लपक्षाच्या आरंभी
नाही. यामुळे संवत्सरारंभ शुक्लप्रतिपदेपासून धरण्याकडे प्रवृत्ती व रिवाज आहे. या
शिवाय ब्रह्मदेवाने सृष्टीचा आरंभ याच शुक्लप्रतिपदेपासून केला होता आणि याच
प्रतिपदेला मत्स्यावतार झाला व सत्ययुगाचा आरंभ झाला होता.
या प्रतिपदेचे हे
महत्व जाणून व मानून भारतातील महामहिक सार्वभौम सम्राट विक्रमादित्यानेही आपल्या
संवत्सराची सुरुवात (सुमारे दोन हजार वर्षापूर्वी) चैत्र शुध्द प्रतिपदेलाच केली
होती.
जगातील सर्व
वर्षकालगणनांमध्ये शालिवाहन शकगणना व विक्रमसंवत गणना सर्वोत्कृष्ट आहेत, यात संदेह नाही. परंतु शकगणनेचा उपयोग विशेषतः गणितामध्ये
होतो आणि विक्रमसंवत-गणनेचा उपयोग या देशात गणित, फलित, लोकव्यवहार, आणि धर्मानुष्ठांचा
कालनिर्णय या कामी होतो व सर्व व्यवहारांत ह्या गणनेला आदराचे स्थान आहे.
सुरुवातीस प्रतिपदा घेण्याचे कारण असे की, ब्रह्मदेवाने
सृष्टी निर्माण केली तेव्हा ही तिथी 'प्रवरा' (सर्वोत्तम) तिथी म्हणून सुचित केली होती आणि खरोखरच ही 'प्रवरा'च म्हणजे सर्वोत्तम आहे. धार्मिक, सामाजिक, व्यावहारिक आणि राजनैतिक
विषेश महत्वाची अशी अनेक कामे या तिथीला सुरु करतात. या तिथीस विषेश महत्वाची अशी
अनेक कामे या तिथीला सुरु करतात. या तिथीस संवत्सरपूजा, नवरात्र (घट)
स्थापना, ध्वजारोपण, तैलांभ्यंगस्नान, वर्षादिचा फलपाठ, पारिभद्राचे पत्रप्राशन
आणि प्रपास्थापन इत्यादी लोकप्र्सिध्द व जगदुपकारक अशी अनेक कामे केली जातात. या
सर्व कारणास्तव सर्वच ठिकाणचे सनातनी लोक संवत्सर-मोहोत्सव साजरा करतात.
संवत्सरपूजा केल्याने
सर्वे पापांचा नाश होतो. आयुष्यवृद्धी होते, सौभाग्याची वाढ
होते आणि शांती लाभते.
संवत्सरारंभ
कलियुग शक (युगाब्द)
|
५११९
|
|
श्रीमन्नृप शालिवाहन शक
|
१९३९
|
हेमलंबीनाम संवत्सर
|
श्रीमन्नृप विक्रमार्क
समयातीत गुजराती संवत्
|
२०७३
|
कीलक् नाम संवत्सर
|
मारवाडीयसंवत्
|
२०७४
|
सौम्यनाम संवत्सर
|
संवत्सरातील अधिपती आणि त्यांची फले
१
|
राजा
|
मंगळ
|
धान्य आणि संपत्ति कमी होईल. आग चोर, रोगराई यापासून
त्रास होईल, पाऊस कमी पडेल.
|
सौराष्ट्र (काठेवाड), पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग,
वऱ्हाड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश, पाटणा
|
२
|
मंत्री
|
गुरु
|
पाऊस चांगला पडून धनधान्याची वृद्धी होईल. लोक आनंदी
होतील.
|
बंगाल प्रांत
|
३
|
कोशेष
|
रवि
|
|
|
४
|
मेघाधिप
|
बुध
|
विद्वानांची आपापल्या विषयात गती वाढेल. पाऊस चांगला पडून
धनधान्याची वृद्धी होईल.
|
बिहार, जबलपूर बाजूस, गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण
यांच्या संगमाच्या पूर्वेस
|
५
|
पूर्व धान्याधीश (खरीप पिक)
|
रवि
|
पर्जन्यमान कमी राहील. धनधान्य आणि दूधदुभते यांचा तुटवडा
होईल. रोग आणि चोर यापासून त्रास होईल.
|
गुजराथ
|
६
|
सेनेश
|
शनि
|
|
पंजाब व काश्मीर
|
७
|
छत्रेश
|
|
|
|
८
|
रसेश
|
मंगळ
|
गुळ, तूप, मध कमी मिळेल, मणी, मोती, सोने महाग होईल
|
कोकण, मध्यप्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग
|
९
|
आज्ञाधिप
|
गुरु
|
|
|
१०
|
पश्चात धान्येश (रब्बी पिक)
|
शुक्र
|
पाणी मुबलक मिळेल. धान्य पुष्कळ पिकेल. फुले व फळे चांगली
येतील.
|
विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी
|
११
|
निरसेश
|
रवि
|
तांबे, चंदन, माणिक, मोती, सोने मुबलक होतील.
|
दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश
|
१२
|
व्यापारेश
|
चंद्र
|
|
|
१३
|
व्यवहारेश
|
बुध
|
|
|
१४
|
नगराधिप
|
बुध
|
|
|
मेघ व नाग
१
|
मेघ: काल
|
पाऊस कमी होईल. रोगराई
वाढेल. लोकांना त्रास होईल.
|
२
|
नाग: हेममाली
|
पाऊस पुष्कळ पडेल पिक
चांगले येईल
|
३
|
पशुपाकाल: बलभद्र
|
लोक स्वधर्माचे पालन
करतील. पाऊस चांगला पडून समाधान मिळेल.
|
गुढीपाडवा
या तिथीला
वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष या दिवसापासून सुरु होते. दक्षिण
भारतात व भारताच्या इतर भागांतून नूतन वर्षारंभ चैत्र प्रतिपदेस होतो. या दिवशी
काही धार्मिक विधी सांगितले आहेत. त्यांत ब्रह्मपूजा हा महत्वाचा विधी असतो.
त्याचा इतिहास ब्रह्मपुराणात दिला आहे. व्रतराज या ग्रंथात असे सांगितले आहे की, ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी सकाळी समस्त
जग निर्माण करुन कालगणना सुरु केली. त्या तिथीला सर्व उत्पात, सर्व पापे व कलीकृत दुःस्वप्ने यांचा नाश करणारी महाशांती करावी, असे म्हटले आहे. ब्रह्मदेवाची पूजा झाल्यानंतर विपळे, पळे,
घटिका, प्रहर इ. सर्व कालविभागांची, दक्षकन्यांची व
विष्णूची पूजा करावी. यविष्ट नावाच्या अग्नीमध्ये हवन करावे. ब्राह्मण-भोजन
घालावे. व आप्तेष्टांना देणग्या द्याव्यात. ज्या वारी वर्षप्रतिपदा येते, त्या वाराच्या अधिपतीची पूजा करावी,असे एक विधान
भविष्यपुराणात सांगितले आहे.
त्याशिवाय 'व्रतपरिचया' त एक पूजेचा विधी सांगिअतला आहे. तो असा-
या दिवशी सकाळी
प्रातःस्नानादी नित्यकर्मे उरकून हातात गंधाक्षतपुष्प्जलादी घेऊन,
'मम सकुटुंबस्य सपरिवारस्य स्वजनपरिजनसहितस्य वा
आयुरारोग्यैश्वर्यादि सकलशुभफलोत्तरोत्तराभिवृध्द्यर्थं ब्रह्मादिसंवत्सर
चौरस चौरंगावर
किंवा वाळूच्या पेढीवर शुभ्रवस्त्र पसरुन आणि त्यावर हळदीने अगर केशराने मिश्रित
अशा अक्षतांचे अष्टदळ कमळ तयार करुन त्यावर सुवर्णमूर्तीची स्थापना करावी.
'ॐ ब्रह्मणे नमः ।'
या मंत्राने
ब्रह्मदेवाने आवाहन, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान,वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, अक्षत, पुष्प, धूप,
दीप, नैवेद्य, आचमन, तांबूल,आरती, नमस्कार, पुष्पांजली व प्रार्थना
या उपचारांनी पूजन करावे.
अशा प्रकारे
उपरोक्त समस्त देवतांचे वेगवेगळे अथवा एकत्र यथाविधी पूजन करावे. नंतर
भगवंस्त्वत्प्रसादेन
वर्ष क्षेममिहास्तु मे ।
संवत्सरोपसर्गा
मे विलयं यान्त्वशेषतः ।
अशी प्रार्थना
करावी. ब्राह्मणांना विविध पकवानांचे भोजन घालावे व स्वतः एकवेळ जेवावे.
पूजेच्यावेळी
नवीन पंचांगाची पूजा करुन त्यावरुन त्या वर्षाचा राजा, मंत्री, सेनापती, धनाधिपती, धान्याधिपती, दुर्गाधिपती, संवत्सरनिवास आणि फलाधिपती आदींचे फल श्रवण करावे.
या दिवशी आणखी एक
विधी भविष्यपुराणात सांगितला आहे. त्या दिवसाचा लौकिक विधी असा
प्रातःकाळी
अंगणात सडासंमार्जन करुन घरातील सर्व माणसे तैलाभ्यंग करुन उष्णोदकाने स्नान
करतात. कळकाच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा
पितळेचे भांडे घालून त्यावर कडुलिंबाचे ढाळे व फुलांची माळ बांधून दारात तो ध्वज म्हणजेच गुढी उभी
करतात. यालाच ब्रह्मध्वज असे म्हणतात व त्याची पूजा करतात. आपले घर ध्वज, पताका,तोरणे इ. सुशोभीत
करतात. या दिवशी पुरुष, स्त्रिया व मुले नवीन वस्त्रालंकार घालून आपल्या
घराण्याच्या चालीरीतीप्रमाणे कुलदेवतेचे अगर ग्रामदेवतेचे दर्शन घेतात.
दुपारी सवाष्ण व
ब्राह्मणासह मिष्टान्नाचे भोजन करतात.
ज्यांच्या
त्यांच्या घरातील रुढीप्रमाणे ग्रामजोशीकडून अगर उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग
अर्थात् वर्षफल श्रवण करतात. या पंचांगश्रवणाचे फल पुढीलप्रमाणे आहे :
तिथीच्या
श्रवणाने लक्ष्मी लाभते ;
वाराच्या श्रवणाने
आयुष्य वाढते;
नक्षत्रश्रवणाने
पापनाश होतो;
योगश्रवणाने रोग
जातो;
करणश्रवणाने
चिंतिलेले कार्य साधते;
असे हे
पंचांगश्रवणाचे उत्तम फल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगा स्नानाचे फल मिळते.
या तिथीला युगादी तिथी असे
म्हणतात. या दिवशी शक्य असेल तर पाणपोई घालावी. निदान उदककुंभाचे तरी दान करावे.
म्हणजे पितर संतुष्ट होतात. देवावर सतत धार बांधावी. पाण्यने भरलेल्या घड्याचे दान
करावे. त्याचा मंत्र असा-
एष धर्मघटो दत्तो
ब्रह्माविष्णु शिवात्मकः ।
अस्य
प्रदानात्सफला मम सन्तु मनोरथाः ॥
हा दिवस
इष्टमित्र व कुटुंबातील मंडळींसह आनंदात घालविल्याने वर्षभर सुख लाभते, असे त्याचे फळ आहे. या दिवशी आपापल्या कुलाचाराप्रमाणे
वासंतिक देवीचे अथवा श्रीराम-चंद्राचे नवरात्र सुरु करतात.
गुढी पाडवा हा
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला आहे.
अभ्यंगस्नान व कडूलिंबाचे चूर्ण खाणे
नूतन संवत्सर सुरु होते
त्या दिवशी मंगलस्नान (अभ्यंग) करून ब्राह्मणासह देवांची व गुरूची पूजा करावी.
अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडूलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून ते भक्षण
करावे. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासाहित कडूलिंबाच्या कोवळ्या पंचे
चूर्ण चिंचेत कालवावे.
फल: रोगशांती होऊन, सर्व व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या,
आयुष्य व लक्ष्मी (संपत्ति) यांची प्राप्ती.
पंचांगस्थ गणपती पूजन
नूतन संवत्सर आरंभाच्या
दिवशी पंचागस्थ गणपतीचे, ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ति
दानादिकांनी संतोषवून मिष्टान्न भोजन घालावे.
नानाप्रकारची गीते, वाद्ये
व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा. म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाचे जाते.
तिलक व्रत
चैत्र
शुक्लप्रतिपदेला हे व्रत करतात. त्या करीता नदीतीरावर अगर तळ्याकाठी जाऊन तेथे
किंवा घरातच सुगंधी चुर्णाने संवत्सर मूर्ती (विष्णुची मूर्ती) लिखित करुन तिची
'संवत्सराय नमः।',
'चैत्राय नमः ।',
'वसंताय नमः ।'
आदी
नामोमंत्रोच्चारपूर्वक पूजा करावी व तिला वस्त्र व फळे अर्पण कर्श्घरावी. तसेच, विद्वान ब्राह्मणांचे पूजन करावे. त्या वेळी
संवत्सरोऽसि
परिवत्सरोऽसीडावत्सरोऽसि अनुवत्सरोऽसि वत्सरोऽसि ।
हा मंत्र
म्हणावा. आणि
'भगवंस्त्वत्प्रसादेन वर्षं क्षेमामिहास्तु मे।
संवत्सरोपसर्गी
मे विलयं यात्वशेषतः ।'
(अर्थ- हे
भगवान,तुझ्या कृपेने माझे वर्ष सुखाचे जावो आणि
वर्षातील सर्व आपत्ती समूळ नष्ट होवोत.)
अशी प्रार्थना
करावी आणि दक्षिणा द्यावी.अशा प्रकारे प्रत्येक शुद्ध प्रतिपदेला असे वर्षभर व्रत
केले असता भूत-प्रेत-पिशाचादिकांची बाधा नाहीशी होते.
मग कपाळास चंदनाचा
तिलक लावतात. हे व्रत स्त्री व पुरुष या दोघांनी करणे उक्त आहे.
या व्रताची कथा
अशी- शत्रुंजय नावाचा एक
राजा होता. त्याला चित्रलेखा नावाची एक पत्नी होती. तिने तिलकव्रत केले होते.
त्यामुळे राजाला मारण्याच्या हेतूने जो जो शत्रू येईल तो तो चित्रलेखेच्या कपाळावरील
तिलकाच्या प्रभावाने त्याचा मित्र होऊन जाई. एकदा राजाला हत्तीने पाडले आणि राजा
मरणोन्मुख झाला. तेव्हा त्याचे प्राण नेण्यासाठी यमदुत आले. पण राजाच्या शेजारी
बसलेल्या चित्रलेखेच्या कपाळावरचा तिलक दृष्टीस पड्ताच ते भ्याले व पळून गेले.
पुढे राजाने राणीसह अनेक वर्षे सुखोपभोग घेतला.
आरोग्यव्रत
हे व्रत चैत्र
शुक्ल प्रतिपदेला करतात. यासाठी पूर्व दिवशी व्रत करुन प्रतिपदेला एका चौरंगावर
अनेक प्रकारची कमळे पसरावी व त्यांच्या ठायी सूर्याचे ध्यान करावे. पांढर्या
रंगाची सुगंधी फुले इ. सामग्री गेऊन पुजन करावे. अग्नी आणि ब्राह्मण यांना तृप्त
करावे. नंतर ब्राह्मणाने आज्ञा दिल्यास भोजन करावे. अशा तर्हेने वर्षभर दर शुद्ध
प्रतिपदेस व्रत केल्याने आणि शिवदर्शन घेतल्याने सदैव आरोग्य नांदते व सौभाग्याची
प्राप्ती होते. व्रतावधी एक वर्ष.
ईश्वर गण गौरीव्रत
चैत्र शुक्ल
प्रतिपदेपासून चैत्र वद्य तृतीयेपर्यंत रोज शिवगौरी यांची पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे. हे व्रत फक्त सुवासिनींसाठीच
सांगितलेले आहे.
फल-सौभग्यप्राप्ती.
पौरुषप्रतिपदव्रत
चैत्र
शुक्लप्रतिपदेपासून या व्रताला प्रारंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. व्रतकर्त्याने
पाण्यात उभे राहून विष्णूचे ध्यान-पूजन व त्यानंतर पुरुषसूक्त पठण करावयाचे असते.
दोन्ही पक्षांतल्या प्रतिपदांना हे व्रत करतात. हे एक तिथिव्रत आहे.
फल-विष्णुलोकप्राप्ती.
ब्राह्मण्यप्राप्ती
हे एक काम्य व्रत
आहे. कालावधी एक वर्ष. चैत्र शुक्लप्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत चार दिवस करावयाचे
हे व्रत आहे. त्यात अनुक्रमे इंद्र, यम, वरूण व कुबेर या देवांपैकी एकेकाची एकेका तिथीला पूजा
करतात. हे देव म्हणजे वासुदेवाची चार रुपे समजतात. पुजेच्या वेळी त्यांना अनुक्रमे
तांबडा, पिवळा, काळा व पांढरा या
रंगाची वस्त्रे समर्पण करतात.
फल- स्वर्गप्राप्ती.
विद्याव्रत
चैत्र
शुक्लप्रतिपदेस एका पेढी (वेदी) वर अक्षतांचे अष्टादल कमळ काढून त्याच्या मध्यभागी
ब्रह्मा, पूर्वेला ऋक्, दक्षिणेस यजुस, पश्चिमेस साम, उत्तरेस अथर्व, अग्निकोनात षट्शास्त्र, नैऋत्येस धर्मशास्त्र, वायव्येस पुराणे, ईशान्येस न्यायशास्त्र
यांची स्थापना करावी. त्या सर्वाचे नाममंत्राने आवाहनादी पुजन करून व खिरीचा
नैवेद्य दाखवून व्रतारंभ करावा. अशा प्रकारे दर शुद्ध प्रतिपदेस ह्याप्रमाणे बारा
महिने पूजन करुन गोप्रदान करावे. आणि असेच बारा वर्षेपर्यंत यथाविधी केले असता
व्रत करणारा महाविद्वान होतो व त्यास ब्रह्मलोक प्राप्त होतो.
कल्पादि
ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभाची जी तिथी असते तिला कल्पादि
असे म्हणतात. पुढील सात तिथी कल्पादि आहेत.
१)
चैत्र - शुक्ल ५,
२)
चैत्र – कृष्ण ५
३)
वैशाख – शुक्ल ३
४)
कार्तिक - शुक्ल ७
५)
मार्गशीर्ष – शुक्ल ९
६)
माघ – शुक्ल १३
७)
फाल्गुन – शुक्ल ३
धर्मसिंधु ग्रंथात चैत्र कृष्ण ५ न सांगता चैत्र शुक्ल प्रतिपदा सांगितली आहे.
श्रीराम नवरात्रारंभ
एक व्रत. चैत्र शुक्ल
प्रतिपदेपासून दशमीपर्यंत हे व्रत करतात. हे काही ऋग्वेदी देशस्थ,कोकणस्थ ब्राह्मणात
असते. यात रामाची नित्य पूजा, अध्यात्म रामायणाचे वाचन, कीर्तन इ. कार्यक्रम शक्यतेनुसार करतात. नऊ दिवस
उपवास किंवा धान्यफरांळ करतात. नवमीच्या दिवशी रामजन्माचे कीर्तन होते व दशमीला
पारणे असते.
वासंतिक देवी नवरात्रारंभ
वासंतिक देवीचे नवरात्र
आरंभ होत आहे.
इष्टी
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ
संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि
म्हणतात.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment