Wednesday, 29 March 2017

दिनविशेष - २९ मार्च २०१७




तिथी
 चैत्र शुक्ल २ (२६:४७)   
वार
 बुधवार
नक्षत्र
 रेवती (११:३९)
योग
 ऐंद्र (१४:४४)
करण
 बालव (१६:१७)


बालचंद्रमाव्रत

सूर्यास्त समयी स्नान करून आकाशातील चंद्राची किंवा तांदुळाचे चंद्रबिंब करून
बालचंद्रमसे नम: |
असे म्हणून पूजा करावी. पुढे एक वर्षभर प्रत्येक महिन्याच्या चंद्रदर्शनाच्या दिवशी हे व्रत करावे. तळलेले पदार्थ पूजनाच्या दिवशी खाऊ नयेत.
फल : सुख व भाग्य प्राप्त होते.

चंद्रदर्शन

अमावास्येला दिसेनासा झालेला चंद्र रविच्या पुढे १२ अंश गेला कि चंद्रदर्शन होते. २०:१८ ला पश्चिम दिशेस चंद्रदर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत.

ईश्‍वर गण गौरीव्रत, शंकरपार्वतीस दवणा वाहणे

चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चैत्र वद्य तृतीयेपर्यंत रोज शिवगौरी यांची पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे. हे व्रत फक्त सुवासिनींसाठीच सांगितलेले आहे.
फल-सौभग्यप्राप्ती.



उमादी पूजा

हे एक तिथिव्रतआहे.  चैत्र शुक्ल द्वितीयेस हे व्रत करतात. या व्रतास उमा, शिव व अग्नी यांची पूजा करावयाची असते.

नेत्रव्रत

हे व्रतसुद्धा चैत्र शुक्ल द्वितीयेला करतात. ह्यासाठी सूर्यचंद्रस्वरूपी आश्‍विनकुमाराची मूर्ती बनवून तिचे गंधपुष्पादी साहित्याने पूजन करतात. या व्रतात ब्रह्मचर्याचे पालन करावे. ब्राह्मणांना सुवर्ण-रजताची दक्षिणा द्यावी आणि गाईच्या दह्यात गाईचे तूप मिसळून भोजन करावे. हे व्रत १२ वर्षापर्यंत करतात. हे व्रत केल्याने दृष्टी सुधारते आणि चेहरा अधिक कांतिमान होतो.

दग्ध योग

२६:४७ नंतर बुधवारी तृतीया तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


मृत्यू योग

११:३९ नंतर बुधवारी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने
हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो. 
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.

द्वितीया श्राद्ध

अपराण्ह काळी द्वितीया तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र शुक्ल २ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.




संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment