तिथी
|
चैत्र शुक्ल ७ (१३:०५)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (२३:५९)
|
योग
|
शोभन (१८:२९)
|
करण
|
वणिज (१३:०५)
|
सूर्याला दवणा वाहणे
या दिवशी सूर्याला दवणा
वाहाव्यात.
अनोदना सप्तमी
चैत्र शुक्ल षष्ठी
व सप्तमी दोन्ही दिवस केवळ पाणी पिऊन उपवास करावयाचा असतो. सप्तमीस सूर्यपूजा
करावयाची.
गोमयादी सप्तमी
गोमयादी सप्तमी हे
चैत्र शुक्ल सप्तमीचे नाव आहे. या
दिवसापासून प्रत्येक महिन्यातल्या शुक्ल
सप्तमीस एक वर्षपर्यंत सूर्यपूजा करतात. त्या दिवशी गोमय, यावक, दूध किंवा गळलेली पाने
भक्षण करुन राहतात.
तुरग सप्तमी
हे चैत्र
शुक्ल सप्तमीस करावयाचे एक व्रत आहे. या
दिवशी उपास करुन रवी, निकुंभ, अरुण, यम, यमुना, शनी, रविपत्नी छाया, सप्त छंद, धाता, आर्यमा इ. देवतांची पूजा
करतात. उद्यापनाच्या वेळी घोडा दान देतात.
नामसप्तमी
हे व्रत चैत्र
शुक्ल सप्तमीपासून एक वर्षपर्यंत करतात.
चैत्रादि बारा महिन्यांत सूर्याच्या बारा नावांनी यथाक्रम पूजा करावी. जसे -
चैत्रात 'धाता' या नावाने, 'वैशाखात' अर्यमा, ज्येष्ठात 'मित्र',
आषाढात 'वरुण' , श्रावणात 'इंद्र' भाद्रपदात 'विवस्वान्, आश्विनात 'पर्जन्य', कार्तिकात 'पूषा', मार्गशीर्षात 'अंशुमान्' , पौषात 'भग', माघात 'त्वष्टा', फाल्गुनात 'विष्णू' अशा नामोच्चारासहित सूर्याचे पूजन करुन एकभुक्त राहावे. असे
केल्याने आयुष्य, आरोग्य आणि ऐश्वर्य यांची अपूर्व अभिवृद्धी
होते.
मोदनव्रत
हे व्रत चैत्र
शुक्ल सप्तमीला करतात. त्या दिवशी सकाळी
प्रातःस्नानादी उरकून सूर्यनारायणाची पूजा करावी. ब्राह्मणांना खिरीचे भोजन घालावे
आणि आपणही एकदा ते सेवन करावे.
सूर्यव्रत
हे व्रत चैत्र
शुक्ल सप्तमीलाच करतात. यासाठी घरातील एका
बाजूचा निवान्त भाग धुऊन, सारवून स्वच्छ करावा. तेथे मध्यभागी वेदी तयार
करावी आणि तिच्यावर अष्टदल कमल काढावे. कमळाच्या निरनिराळ्या दलांवर पुढीलप्रमाणे
देवतांच्या मूर्तीची स्थापना करावी. पूर्वेकडील दलावर दोन ऋतुकारक 'गंधर्व' , आग्नेयेकडील दलावर दोन ऋतुकारक 'गंधर्व' दक्षिण दलावर दोन 'अप्सरा', नैऋत्य दलावर दोन 'राक्षस', पश्चिमेकडील दलावर दोन ऋतुकारक 'महानाग', वायव्यदलावर दोन 'यातुधान', उत्तर दलावर दोन 'ऋषी' आणि ईशान्यदलावर एक 'ग्रह', याप्रमाणे स्थापना करून त्या सर्वांची गंधपुष्प, धूप,
दीप, आणि नैवेद्य यांनी वेगवेगळी पंचोपचार पूजा करावी. सूर्याला
तुपाच्या १०८ आहुती द्याव्या व इतर सर्वांना ८-८ आहुती द्याव्या. प्रत्येक
देवतेच्या नावाने एकएक ब्राह्मण याप्रमाणे ब्राह्मण निमंत्रित करुन त्यांना भोजन
घालावे. अशातर्हेने एक वर्षपर्यंत प्रत्येक शुक्ल सप्तमीस केल्याने सूर्यलोकाची प्राप्ती होते.
कमल सप्तमी
हे चैत्र
शुक्ल सप्तमीचे नाव. या दिवशी सूर्याचे
व्रत करतात. व्रतावधी एक वर्ष. सूर्य ही या व्रताची देवता. तिलपात्रात कमलावर
सूर्याची स्थापना करुन पूजा करतात आणि सुवर्णकमलाचे ब्राह्मणास दान करतात. असा या
व्रताचा आणखीन एक विधी आहे.
भद्रा
१३:०५ नंतर २४:०९ पर्यंत
भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ
आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही
शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील
काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ
मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
अष्टमी श्राद्ध
अपराण्ह काळी अष्टमी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र शुक्ल ८ आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment