तिथी
|
माघ शुक्ल १२ (११:३०)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (१२:१३)
|
योग
|
विष्कंभ (८:४०), प्रीति (२९:४२)
|
करण
|
कौलव (२२:२४)
|
प्रदोष
सूर्यास्तानंतर
पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने
साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक
चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास
करतात.
‘कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष
आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक
वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन
'मम पुत्रादिप्राप्तिकामनया
प्रदोषव्रतमहं करिष्ये'
इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे
पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व
षोड्शोपचारे पूजा करावी.
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण
करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा
लावताना आठ वेळा नमस्कार करावा.
'धर्मस्त्वं वृष रूपेण
जगदानन्दकारक।
अष्टमूर्तैरधिष्ठानं अथः पाहि सनातन ।'
या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला
स्पर्श करुन पुढील मंत्राने शंकर, पार्वती आणि नंदिकेश्वराची
प्रार्थना करावी.
ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्ये चापम्रुत्यव: !
भय क्लेश मनस्ताप: नश्यनंतु मम सर्वदा !!
"
( कर्ज,रोग,गरिबी,अपम्रूतू,भय, त्रास ईत्यादि मनस्ताप माझे कायमचे नाहिशे होवोत.)
हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या
स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी
भौम प्रदोष करावा.
Ø शुक्रवार: सौभाग्य किंवा
स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी
शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा.
Ø रविवार: आयुर्दायासाठी
अर्कप्रदोष हे व्रत करावे.
भीष्म द्वादशी
हे व्रत माघ शुक्ल द्वादशीलाच असते. या व्रताला ब्रह्मार्पण करून ब्राह्मणांना
भोजन द्यावे आणि पारणे करावे. एकादशीप्रमाणेच बाकीचा विधी आहे. हे व्रत वासुदेवाने
प्रथम भीमाला सांगितले, म्हणून त्याला भीमाचे नाव प्राप्त झाले.
शुक्ल दशमीला शरीराला तूप लावून स्नान करावे.
'ॐ नमो नारायणाय'
या मंत्राने विष्णुची पूजा करावी. त्याबरोबर गरुड - गणेशाची पूजा करावी.
एकादशीला पूर्ण उपवास करावा.
द्वादशीला नदीमध्ये स्नान करून घरापुढे मांडव घालावा. एका तोरणाला पाण्याने
भरलेले पात्र टांगावे. त्या पात्राच्या तळाला एक छिद्र पाडावे. त्यातून झिरपणारे
थेंब मस्तकावर घ्यावे. नंतर ऋग्वेदी पुरोहिताकडून होम, यजुर्वेदी पुरोहिताकडून
रुद्रावर्तन आणि सामवेदी पुरोहिताकडून सामगायन करवावे. पुरोहितांना वस्त्रालंकार
देऊन त्यांच सन्मान करावा. हे व्रत करणारा पापमुक्त होतो. या व्रताचे माहात्म्य
वाजपेय आणि अतिरात्र या यागापेक्षाही मोठे आहे, असे सांगितले आहे.
फल - विष्णुलोकप्राप्ती.
तिलद्वादशी
हे व्रत षट्तिला एकादशीप्रमाणेच आहे. यासाठी माघ. शुक्ल द्वादशीला तिलमिश्रित
पाण्याने स्नान करावे. तिळांनी विष्णूपूजन करावे. तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
तिळाचाच नैवेद्य दाखवावा. तिळाचेच हवन करावे आणि भोजनात तिळाचेच प्रमाण अधिक असावे, यामुळे स्वाभाविक, आगन्तुक, शारीरिक आणि सांसर्गिक
सर्व व्याधी दूर होतात व सर्व प्रकारचे सुख लाभते.
वराह द्वादशी
एक तिथिव्रत. माघ शुक्ल द्वादशीला हे व्रत करावयाचे असते. विष्णूचा अवतार वराह
ही या व्रताची देवता आहे. या व्रताचा विधी - एकादशीला व्रतसंकल्प व पूजा करावी.
एका पात्रात सुवर्णाची, चांदीची किंवा तांब्याची नाणी व सर्व प्रकारची धान्यबीजे घालून त्यावर वराहाची
सोन्याची मूर्ती ठेवावी आणि तिची पूजा करावी. रात्री जागर करावा. द्वादशीला
पूजेतील वराहाची मूर्ती ब्राह्मणाला द्यावी.
फल - सौभाग्य, संपत्ती, सौंदर्य, पुत्र यांची प्राप्ती.
कल्पादि
ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभाची जी तिथी असते तिला कल्पादि
असे म्हणतात. पुढील सात तिथी कल्पादि आहेत.
१)
चैत्र - शुक्ल ५,
२)
चैत्र – कृष्ण ५
३)
वैशाख – शुक्ल ३
४)
कार्तिक - शुक्ल ७
५)
मार्गशीर्ष – शुक्ल ९
६)
माघ – शुक्ल १३
७)
फाल्गुन – शुक्ल ३
धर्मसिंधु ग्रंथात चैत्र
कृष्ण ५ न सांगता चैत्र शुक्ल प्रतिपदा सांगितली आहे.
घबाड
११:३० पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: धनिष्ठा
चंद्र
नक्षत्र : आर्द्रा
तिथी: शुक्ल १२ = १२
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११
x ३ = ३३
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता
७ ने भागू ४५ / ७ = ६ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
त्रयोदशी श्राद्ध
अपराण्ह काळी त्रयोदशी तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी माघ शुक्ल १३ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि
अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त
मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन
वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त
प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ,
त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment