Monday, 1 May 2017

दिनविशेष - २ मे २०१७



तिथी
 वैशाख शुक्ल ७ (२०:५२)   
वार
 मंगळवार
नक्षत्र
 पुष्य (२८:३३)
योग
 शूल (१९:५१)
करण
 गरज (९:३७), वणिज (२०:५२)

गंगोत्पत्ति-गंगापूजन

गंगासप्तमी अगर जन्हुसप्तमी ही वैशाख शुक्ल सप्तमी दिवशी करतात. या दिवशी गंगामाता पुन्हा प्रकट झाली. या दिवशी गंगेचे पूजन करतात.
ब्रह्मपुराणातून 'पृथ्वी चन्द्रोदय' ग्रंथात असे सांगितले आहे की, राजर्षी जन्हूने प्रथम गंगेला क्रोधाने प्राशन करुन टाकली होती. नंतर सप्तमी दिवशी ती राजाच्या कानातून कन्येच्या रुपाने दिगंबरावस्थेत प्रकट झाली. म्हणून त्यादिवशी अशाच गंगेचे पूजन केले पाहिजे.
हरिवंशात पुण्यकव्रतानंतर (शेवटी) हे व्रत सांगितले आहे. गंगेने हे व्रत पार्वतीला सांगितले आहे, म्हणून आजही पार्वतीच्यासाठी हे व्रत केले जाते.
या दिवशी प्रात:काली विधिपूर्वक गंगास्नान करावे. माघ शुक्ल सप्तमी दिवशी दुसर्‍याही तीर्थात स्नान करता येते. या व्रताने सर्व कामना पूर्ण होतात, म्हणून या व्रताला 'सर्व-कामप्रद' असे म्हणतात. जी स्त्री हे व्रत करते , तिच्या सासर, माहेर व आजोळच्या सात पिढ्यांचा उध्दार होतो. या दिवशी एक सहस्त्र कुंभ दान करावेत , असे आहे. हे व्रत तारण, पारण, सर्वकामप्रद आहे.
अन्य पुराणातही या व्रताचा उल्लेख मिळतो. वैशाख शुक्ल सप्तमी दिवशी परमेश्वराची पूजा करवी. गंगेत यथाविधी आंघोळ करुन गंगेत पितृतर्पण करावे. दहा ब्राह्मणांना भोजन घालावे. चांगल्या पुष्पमाला, चंदनाच्या गंधाने व तलम वस्त्रांनी त्यांचे पूजन करावे. याने पूजक सर्व पातकातून मुक्त होतो. हे व्रत मध्यान्हव्यापिनी सप्तमीला करतात. जर दोन दिवश तशी सप्तमी असेल तर ' षष्ठीविद्धा' सप्तमी' गंगासप्तमी ' मानतात व हे शिष्टसंमत आहे. कारण सप्तमी व्रताच्या निर्णयप्रसंगी ' षष्ठीयुक्त ' सप्तमीच धरावी, असा युग्मवाक्य-निर्णय आहे.

भद्रा

२०:५२ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका


योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

सप्तमी श्राद्ध

अपराण्ह काळी सप्तमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी वैशाख शुक्ल ७ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment