Friday, 26 May 2017

दिनविशेष - २६ मे २०१७




तिथी
 जेष्ठ शुक्ल १ (२१:१८)   
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 रोहिणी (२१:०४)
योग
 सुकर्मा (१८:५४)
करण
 किंस्तुग्घ्न (११:१६), बव (२१:१८)

करिदिन

भावुका अमावास्येचा दुसरा दिवस म्हणून हा करिदिन आहे. ग्रहण दिवस, होळी, आयन दिन (उत्तरायण आणि दक्षिणायनाचा दिवस), भावुका अमावास्या व प्रेतदाहविधीचा दिवस अशा ५ प्रकारच्या दिवसांच्या दुसऱ्या दिवसाला करिदिन म्हणतात. हे ५ दिवस व त्यापुढचा म्हणजे करिदिन सर्व शुभ कार्याला वर्ज समजले जातात.

दशहरा आरंभ

जेष्ठ शुक्ल प्रतिपदेपासून दशमी पर्यंत दहा दिवस दशहरा साजरा करतात. गंगास्नान, गंगा पूजन, गंगास्त्रोत्र पठण, दान होम यापैकी शक्य ते करावे. शरीर, वाणी व मन यांचे कडून कळत-नकळत होणारी दहा पापे नष्ट होतात.   

धनिष्ठा नवक समाप्ति

वैशाख कृष्ण पक्षातील धनिष्ठा नक्षत्रापासून रोहिणी नक्षत्रा पर्यंत ९ दिवसाच्या कालावधील धनिष्ठा नवक असे संबोधतात. यालाच महापंचक असेही म्हणतात. २१:०४ ला रोहिणी नक्षत्र आणि म्हणूनच धनिष्ठा नवक समाप्त होत आहे.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

यमघंट योग

२१:०४ पर्यंत शुक्रवारी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


यमघंट योगावर जन्म झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.

याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५, गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर पुढे) देखील यमघंट योग होतो.

प्रतिपदा श्राद्ध

अपराण्ह काळी प्रतिपदा तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ शुक्ल १ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment