तिथी
|
वैशाख शुक्ल
१४ (६:३८)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
चित्रा (१४:०७)
|
योग
|
वज्र
(११:२९)
|
करण
|
वणिज (६:३८), विष्टि (१८:३०), बव (--:--)
|
पुष्टिपति विनायक जयंती / वैशाखी व्रत
हि खूप मोठी शुभ तिथी आहे. या दिवशी
दानधर्मादी अनेक पुण्य कृत्ये करतात. ही जर सूर्योदयापासून दुसरे दिवशी
सूर्योदयापर्यंत असेल, तर अधिक प्रशस्त मानली आहे. एरवी ती कार्यानुसार घ्यावी.
१)
धर्मराजासाठी पाण्याने भरलेला कुंभ
व मिष्टान्न दान दिल्यास गोदानाचे पुण्य मिळते.
२)
पाच अगर सात ब्राह्मणांना हलवा ( शर्करायुक्त
तीळ ) दिला, तर
सर्व पापांचा क्षय होतो.
३)
सारवलेल्या भूमीवर तीळ पसरून त्यावर
सपुच्छ मृगाजिन शिंगासह अंथरून व उत्तम प्रकारच्या वस्त्रासह दान केल्यास महान फळ
मिळ्ते.
४)
तिळाने स्नान करून तूपसाखर आणि
तिळाने भरलेला कलश भगवान विष्णूच्या नाममंत्राने आहुती द्यावी, अगर तीळ आणि मध यांचे दान
करावे. तिळाच्या तेलाचे दिवे लावावेत. तिलतर्पण करावे, अगर गंगास्नान केल्याने
सर्व पापांतून मुक्त होतो.
५)
जर या दिवशी एकभुक्त राहून पौर्णिमा, चंद्रमा व सत्यनारायणव्रत
केले, तर सर्व
प्रकारची सुखे, संपदा आणि श्रेयस यांची प्राप्ती होते.
अन्वाधान
अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा
असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख
द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान
म्हणतात.
ईष्टिच्या च्या आधीचा दिवस
अन्वाधानाचा असतो.
कुलधर्म
कूर्मजयंती
वैशाख पौर्णिमेस कूर्म जयंती साजरी
करतात.
या दिवशी भगवान विष्णूंनी
कूर्मावतार घेतला होता. आणि मंदराचल पर्वत आपल्या पाठीवर धारण करून समुद्रमंथनाला
मदत केली होती.
हादिवस उत्पादन संबंधित सर्व
कार्यांसाठी अतिशय शुभ मानला जातो.
भूमी पूजन,नवीन वस्तू पूजन किंवा
वस्तू दोष काढण्यासाठी देखील हा दिवस शुभ मानला आहे.
श्री विष्णू अवतार
मत्स्य अवतार
|
चैत्र शुक्ल तृतीया
|
अपराह्नकाळी
|
कूर्म अवतार
|
वैशाख पौर्णिमा
|
सायंकाळी
|
वराह अवतार
|
भाद्रपद शुक्ल तृतीया
|
अपराह्नकाळी
|
नृसिंह अवतार
|
वैशाख शुक्ल चतुर्दशी
|
सायंकाळीं
|
वामन अवतार
|
भाद्रपद शुक्ल द्वादशी
|
माध्यान्हकाळी
|
परशुराम अवतार
|
वैशाख शुक्ल तृतीया
|
माध्यान्हकाळीं झाला. (हा प्रदोषकाळी झाला असे अन्य मत असून सध्या
प्रचार ही प्रदोषकाळी मानण्याविषयीच आहे. )
|
राम अवतार
|
चैत्र शुक्ल नवमी
|
माध्यान्हकाळी
|
कृष्ण अवतार
|
श्रावण कृष्ण अष्टमी
|
मध्यरात्री
|
बौध्द अवतार
|
अश्विन शुक्ल दशमी
|
सायंकाळी
|
कल्की अवतार
|
श्रावण शुक्ल षष्ठी
|
सायंकाळी
|
भद्रा
६:३८ नंतर १८:३० पर्यंत भद्रा म्हणजेच
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान
शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा
नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली
व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक
चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध
व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र
असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र
असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र
असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे
फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास
तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे
चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून
विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत
निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका
भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग,
अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित
कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा
मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय
होण्याची शक्यता असते.
पोर्णिमा श्राद्ध
अपराण्ह काळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी वैशाख पौर्णिमा आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व
आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात
ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून
दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त
प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव
काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह
काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह
काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग
केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी
अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment