तिथी
|
वैशाख कृष्ण १ (६:४८)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
विशाखा (१५:५६)
|
योग
|
व्यतीपात
(९:३९)
|
करण
|
कौलाव (६:४८), तैतिल (१९:१०)
|
महाराष्ट्र दिन
मे १, इ.स. १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस
महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन
म्हणूनही ओळखला जातो.
महाराष्ट्र दिनाची कहाणी
२१ नोव्हेंबर
इ.स.१९५६ च्या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात
तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे
नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र
छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून
कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य
सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार
टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर- सव्वाशे
कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर
गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत प्रचंड
जनसमुदाय,एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या
बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत,फ्लोरा फाउंटनकडे जमू
लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच.
कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला
कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या
चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले.
सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना
गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई
यांचे "दिसताक्षणी गोळ्या" घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय
फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या
निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त
महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५
आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व
हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन १
मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
करावी लागली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.
देवर्षी नारद जयंती
वैशाख
कृष्ण प्रतिपदा ही नारदाची जन्मतिथी देवर्षी नारद जयंती म्हणून साजरी केली जाते.
पुराणांनुसार
भारतातील ऋषीमुनींपैकी फक्त नारदमुनींनाच देवर्षी ही पदवी मिळाली होती. जवळपास
सर्वच हिंदू ग्रंथांमध्ये उल्लेख आढळणारे ते एकमेव ऋषी आहेत. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापर युगातही नारदमुनी
देवी-देवतांमध्ये संवादाचे माध्यम होते. सदैव सतर्क राहणारे नारद हे
ब्रह्मदेवाच्या मुलांपैकी सनक, सनंदन, सनत आणि सनातन या सर्वांपेक्षा लहान होते.
ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानानुसार आकाश, पाताळ
तसेच पृथ्वी या तिन्ही लोकी भ्रमण करून नारद देव, संत-महात्मे, इंद्रादी शासक आणि जनमानसाशी थेट संवाद साधून त्यांची
सुख-दु:खे जाणून घेत अडचणी निवारण्यासाठी प्रयत्न करत. म्हणूनच तर ते देवांना
जेवढे प्रिय होते, तेवढेच ते
राक्षसांमध्येही प्रिय होते. यासोबतच देव आणि दानवांमध्ये संघर्ष निर्माण करणे किंवा
युद्ध भडकवणे हा त्यांचा ‘कळलावा’ गुणही प्रसिद्ध आहे. यामुळे त्यांना अनेकदा अपमानितही
व्हावे लागले आहे. मात्र, समाजहित हाच एकमेव
उद्देश असलेल्या नारदाने मान-अपमानाची कधीच पर्वा केली नाही. त्यांना विश्वातील
आद्य पत्रकार म्हणून ओळखले जाते.
दितीया श्राद्ध
अपराण्ह काळी दितीया
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी वैशाख कृष्ण २ आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment