तिथी
|
वैशाख शुक्ल
१३ (७:१२)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
हस्त (१३:५३)
|
योग
|
हर्षण
(१२:५६)
|
करण
|
तैतिल (७:१२), गरज (१८:५२), वणिज (--:--)
|
कामदेव व्रत
आरोग्य प्राप्ती साठी हे व्रत करतात. कामदेव
मदनाची सुवर्णमुर्ती करुन वैशाख शुक्ल त्रयोदशीला तिचे पूजन करावे व उपवास करावा.
दुसरे दिवशी ब्राह्मणभोजन घालून पूजासामग्रीसहित मूर्तीचे दान करवे व नंतर जेवावे.
याप्रमाणे वर्षभर प्रत्येक शुक्ल त्रयोदशीला केले असता सर्व रोग नाहीसे होऊन
आरोग्यप्राप्ती होते.
श्रीनृसिंह जयंती
वैशाख शुक्ल चतुर्दशीला श्रीनृसिंह
जयंती असते. ज्या दिवशी सूर्यास्त काळी चतुर्दशी असेल तो दिवस घ्यावा. या
चतुर्दशीस (पूर्वविद्धा म्हणजे त्रयोदशीयुक्त असेल तर अजून उत्तम) स्वाती
नक्षत्र आणि शनिवार आणि वणिज करण असा योग आल्यास तो अतिशय उत्तम मनाला जातो. व
नृसिंहजयंती व्रत करणार्यास सौभाग्य प्राप्त होते. जरी यातील एखादाही योग असेल तर
तो दिवस पापनाशक आहे. यंदा १२:०१ नंतर स्वाती नक्षत्र आणि १२:१० नंतर वणिज करण
आहे.
नृसिंहजयंती व्रत:
हे व्रत वैशाख शुक्ल चतुर्दशीला
करतात. ही चतुर्दशी प्रदोषव्यापिनी पाहिजे. जर दोन दिवशी अशी चतुर्दशी असेल अगर
दोन्ही दिवशी नसेल तर ( मदनतिथी ) त्रयोदशीचा संसर्ग टाळण्यासाठी दुसर्या
दिवशीचीच तिथी घ्यावी. उपवास करावा. व्रताच्या दिवशी पहाटे सूर्याला व्रत करणार
असल्याचे सांगुन तांब्याच्या कलशात पाणी भरावे व पुढील मंत्राने संकल्प सोडवा.
नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने
शुभे ।
उपवासं करिष्यामि
सर्वभोगविवर्जित: ॥
मध्यान्ही नदीवर जाऊन तीळ, गाईचे शेण, माती आणि आवळे यांनी मर्दन करुन वेगवेगळे चार वेळा स्नान करावे. नंतर
पुन्हा शुद्ध स्नान करुन तेथे नित्य आन्हिक करावे. नंतर घरी यावे व क्रोध, लोभ, मोह, असत्य भाषण , कुसंग व पापाचरण यांचा त्याग करावा. ब्रह्मचर्य
पाळावे आणि उपवास करावा. संध्याकाळी चौरंगावर अष्टदल काढून त्यावर सिंह, नृसिंह आणि लक्ष्मी यांच्या सुवर्णप्रतिमा
प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापन करून त्यांची षोडशोपचारपूर्वक पूजा करावी. ( किंवा
पौराणिक मंत्रांनी पंचोपचारांनी पूजा करावी) . रात्री गायनवादन, पुराणश्रवण, हरिकीर्तन, जागरण करावे.
दुसरे दिवशी ब्राह्मणभोजन घालून परिवारासह स्वत: भोजन करावे. या प्रमाणे
प्रतिवर्षी करण्याने नृसिंह-भगवान त्याचे सर्व ठिकाणी रक्षण करतात व यथेच्छ
धनधान्य देतात .
शिवलिंगपूजा
भय मुक्त होण्यासाठी हे व्रत करतात.
श्रीनृसिंहजयंती दिवशीच हे व्रत करतात. गव्हाच्या पिठाचे शिवलिंग करून त्याची
स्थापना करतात व त्याची यथासांग पूजा करतात. काही ठिकाणी हे नृसिंहजयंतीच्या
बरोबरच करतात. दोन्ही देवांची पूजा एकत्र करतात.
मृत्यू योग
१३:५३ पर्यंत शनिवारी हस्त नक्षत्र
असल्यामुळे मृत्यू योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार
– अनुराधा
|
सोमवार
– उत्तराषाढा
|
मंगळवार
– शततारका
|
बुधवार
– अश्विनी
|
गुरुवार
– मृग
|
शुक्रवार
– आश्लेषा
|
शनिवार
– हस्त
|
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो.
असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा
परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.
यमघंट योग
१३:५३ पर्यंत शनिवारी हस्त नक्षत्र
असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज
सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार
– मघा
|
सोमवार
– विशाखा
|
मंगळवार
– आर्द्रा
|
बुधवार
– मूळ
|
गुरुवार
– कृत्तिका
|
शुक्रवार
– रोहिणी
|
शनिवार
– हस्त
|
|
यमघंट योगावर जन्म झाल्यास
बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता
मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.
याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५,
गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर
पुढे) देखील यमघंट योग होतो.
चतुर्दशी श्राद्ध
अपराण्ह काळी चतुर्दशी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी वैशाख शुक्ल १४ आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे
महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या
काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा
सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त
सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ
बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment