तिथी
|
वैशाख पोर्णिमा (६:२८)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
स्वाती (१४:४७)
|
योग
|
वज्र
(११:२९)
|
करण
|
बव (६:२८), बालव (१८:३४), कौलाव (--:--)
|
वैशाखस्नान समाप्ति
चैत्र शुक्ल पौर्णिमेपासून वैशाख शुक्ल
पौर्णिमेपर्यंत प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी कोठेही तीर्थक्षेत्री, अथवा नदी, विहीर, आड,तुळे किंवा सरोवर किंवा स्वतःच्या घरीदेखील
शुद्ध थंड पाण्याने स्नान करावे आणि नित्य आन्हिक झाल्यावर
ॐ
नमो भगवते वासुदेवाय
किंवा
हरे
राम हरे राम
या मंत्राचा यथाशक्ती जप
करुन एकच वेळ भोजन करावे. एकतीस दिवसापर्यंत असा क्रम ठेवल्यास अनेक प्रकारचे रोग
व दोष दुर होतात व त्याचा प्रभाव आणि पुण्य वाढतात.
या व्रताची समाप्ति होत आहे.
बुद्धपोर्णिमा
वैशाख शुध्द पौर्णिमेला बुद्ध
पौर्णिमा साजरी केली जाते.
जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी
भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान
मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला.
वैशाख शुध्द पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दु:खाचे मूळ व ते
नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. म्हणून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा करतात.
यमघंट योग
१४ : ४७ नंतर सोमवारी विशाखा
नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज
सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार
– मघा
|
सोमवार
– विशाखा
|
मंगळवार
– आर्द्रा
|
बुधवार
– मूळ
|
गुरुवार
– कृत्तिका
|
शुक्रवार
– रोहिणी
|
शनिवार
– हस्त
|
|
यमघंट योगावर जन्म झाल्यास
बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता
मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.
याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५,
गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर
पुढे) देखील यमघंट योग होतो.
इष्टि
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ
संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.
प्रतिपदा श्राद्ध
अपराण्ह काळी प्रतिपदा तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी वैशाख
कृष्ण १ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह
काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार
ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना
सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३
मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत.
या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी
अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment