Tuesday, 8 January 2019

दिनविशेष - १५ जानेवारी २०१९


तिथी
पौष शुक्ल ९ (२४:४५)
वार
मंगळवार
नक्षत्र
अश्विनी (१३:५६)
योग
साध्य (२९:३७)
करण
बालव (१२:४८), कौलव (२४:४५)


मकर संक्रांति

रवि मकर राशीत प्रवेश करत आहे. कोणत्या करणावर संक्रांत होत आहे त्यावरून वाहनादि प्रकार उक्त केलेले असतात

पुण्यकाल

संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी सूर्योदय ते सूर्यास्त असा आहे.

कर्तव्य

१)      तिलमिश्रित उदकाने स्नान,
२)      तिळाचे उटणे अंगास लावणे,
३)      तिलहोम,
४)      तिलतर्पण,
५)      तिलभक्षण व
६)      तिलदान
असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग करावा.

शके १९४०पौष शुक्ल ८, सोमवारी  १९:५१ वाजता रवि मकर राशीत प्रवेश करत आहे. बव करणावर संक्रांत होत असल्याने उक्त असलेले वाहनादि प्रकार पुढीलप्रमाणे

संक्रांतिवर्णन

वाहन
 वाहन सिंह असून उपवाहन हत्ती आहे.
वस्त्र
 पांढरे वस्त्र परिधान केले आहे.
शस्त्र
 हातात भृशुंडी घेतले आहे.
टिळा
 कस्तुरीचा टिळा लावलेला आहे.
वय
 वयाने बाल असून बसलेली आहे.
वासासाठी
 वासाकरिता चाफ्याचे फुल घेतलेले आहे. 
भक्षण
 अन्न भक्षण करीत आहे.
जाति
 देव जाति आहे.
रत्न
 भूषणार्थ प्रवाळ रत्न धारण केली आहे.
वारनाव
 वारनाव ध्वांक्षी आहे.
नक्षत्रनाव
 नक्षत्रनाव ध्वांक्षी आहे.
सामुदायिक मुहूर्त 
 सामुदायिक मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत.
दिशा
 दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे व ईशान्य दिशेस पहात आहे.

जन्मनक्षत्रानुसार संक्रांति फळ

फळ
नक्षत्र
पंथा (प्रवास)
रेवती, अश्विनी, भरणी
भोग (दु:ख)
कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य
व्यथा (आजार)
आश्लेषा, मघा, पूर्वा
वस्त्रम् (वस्त्रप्राप्ती)
उत्तरा, हस्त, चित्र, स्वाती, विशाखा, अनुराधा
हानि: (खर्च, नुकसान)
जेष्ठा, मूळ, पूर्वाषाढा
विपुलं धनं (मोठी अर्थप्राप्ती)
उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा

पर्व काळात वर्ज कामे

संक्रांतीच्या पर्व काळात पुढील कामे करू नयेत
·         दात घासणे,
·         कठोर बोलणे,
·         वृक्ष/गवत तोडणे,
·         गाई-म्हशींची धार काढणे,
·         कामविषय सेवन

संकल्प

देशकाल कथन करून
मम आत्मन: सकलपुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतिद्वारा सकलपापक्षयपूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्यसमृद्धि दीर्घायुः महैश्वर्य मन्गलाभ्युदय सुखसंपादादि कल्पोक्तफ़ल सिद्धये अस्मिन् मकरसंक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय (अमुक) दानं करिष्ये |
असा संकल्प करून दानवस्तूचे व ब्राह्मणाचे पूजन करून दान-दक्षिणा द्यावे.

संक्रांतिपर्वकाळात स्त्रियांनी करावयाची दाने

·         नवे भांडे,
·         गाईला घास,
·         अन्न,
·         तिलपात्र,
·         गुळ तीळ,
·         सोने,
·         भूमि,
·         गाय,
·         वस्त्र,
·         घोडा
इत्यादि यथाशक्ति दाने करावीत.

धार्मिक अर्थ

मकर संक्रांती पासून उन्हाळ्याची सुरूवात होते. पृथ्वीचा उत्तर गोलार्धात प्रवेश होतो. हिंदू श्रद्धेनुसार सूर्य प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्वाचे रूप आहे, जे एक, अद्वैत, स्वयं प्रकाशमान, दैवत्वाचे प्रतिक आहे.

पुराणातील उत्तरायण

महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म ज्यांना इच्छामरणाचे वरदान होते, त्यांनी बाणांच्या शय्येवर पडून राहून या दिवशी देह त्याग केल्याचे सांगितले जाते. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा शुभ मानला जातो.

ध्वजनवमी

पौष शुक्ल नवमीस हे नाव आहे. या तिथीला शाकंभरी असे म्हणतात. या दिवशी चंडिकेच्या पूजेचे विशेष महत्व आहे. पताकांनी देवीचे देऊळ सुशोभित करणे, कुमारिकांना भोजन घालणे आणि उपवास किंवा एकभुक्त करणे असा या व्रताचा विधी आहे.
फल- आरोग्य, शक्ती व संपत्ती यांची प्राप्ती.

उभय नवमी

एक तिथिव्रत. पौष मासातल्या शुक्ल आणि वद्य नवमीस भगवतीची त्रिकाल पूजा करतात. देवीची मूर्ती पिठाची करतात. ती चतुर्भज व शूलधारिणी असावी, असे सांगितले आहे. तिला घृताने स्नान घालतात. खीरभाताचा नैवेद्य दाखवतात. कुमारीला भोजन घालतात. अशा प्रकारे प्रत्येक महिन्यांच्या उभय नवमीस दुर्गेची विविध रूपे बनवून पूजा करतात.
फल- दुर्गानिवास.

अमृत योग

१३:५६ पर्यंत मंगळवारी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे होणारा गृहप्रवेशास वर्ज असा अमृतसिद्धि योग होत आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

नवमी श्राद्ध

अपराण्ह काळी नवमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी पौष शुक्ल ९ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
©संकलन: सौ. प्राची शिंदे.

No comments:

Post a Comment