Sunday, 3 February 2019

दिनविशेष - ४ फेब्रुवारी २०१९



तिथी
पौष कृष्ण ३० (२६:३४)
वार
सोमवार
नक्षत्र
श्रवण (३०:०१)
योग
सिद्धि (७:५८)
करण
चतुष्पाद (१३:!३), नाग (२६:३४)


दर्श अमावस्या

अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.

सोमवती अमावस्या

सोमवारी अमावस्या तिथी असल्यामुळे या दिवशी सोमवती अमावस्या आहे.

बकुल अमावस्या

पौषी अमावास्येला हे नाव आहे. या दिवशी दुधात तांदळाची खीर करून पितरांना वाढतात. त्यामुळे पितर संतुष्ट होतात, अशी समजूत आहे.

विधिपूजा

पौष अमावास्येस स्नानादी नित्यकर्मे झाल्यानंतर वस्त्राच्छादित वेदीवर वेद-वेदांगभूषित ब्रह्मदेवाचे गायत्रीसहित पूजन करावे व गाय, सोने, छत्र, वस्त्र, जोडे, शय्या, अंजन-दर्पणादी वस्तू
'स्थानं स्वर्गेऽथ पाताले यन्मर्त्ये किंचिदुत्तमम् ।
तदवाप्नोत्यसंदिग्धं पद्मयोनेः प्रसादतः ॥'
या मंत्राने ब्राह्मणांना दान द्याव्यात.

'यत्किंचित् वाचिकं पापं मानसं कायिक तथा ।
तत् सर्वं नाशमायति युगादितिथिपूजनात् ॥'
असे स्मरण करून आप्तजनांसह भोजन करावे.

अर्धकुंभ (प्रयाग/ अलाहाबाद)

कुंभमेळा म्हणजे ठरावीक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.
भारतामध्ये बारा वर्षांत अलाहाबाद (प्रयाग), उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो. बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर अलाहाबाद येथे महाकुंभमेळा भरतो.


मुख्यत: गुरु आणि रवि  व चंद्र यांच्या ठराविक स्थितीनुसार ठराविक ठिकाणी कुंभमेळा भरतो.
प्रयाग (अलाहाबाद) त्रिवेणी संगमा
गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमावर
कुंभमेळा
माघ अमावास्येला (म्हणजे मकर राशीत चंद्र अन् सूर्य) असताना आणि वृषभ राशीत गुरु
अर्धकुंभ
माघ अमावास्येला (म्हणजे मकर राशीत चंद्र अन् सूर्य) असताना आणि तूळ किंवा वृश्चिक राशीत गुरु
हरिद्वार
गागा नदीच्या तीरावर
कुंभमेळा
सूर्य मेष राशीत म्हणजे वैशाख महिन्यात आणि गुरु कुंभ राशीत
अर्धकुंभ
सूर्य मेष राशीत म्हणजे वैशाख महिन्यात आणि गुरु सिंह राशीत
उज्जैन
क्षिप्रा नदीच्या तीरावर
कुंभमेळा
सूर्य मेष राशीत म्हणजे वैशाख महिन्यात आणि गुरु सिंह राशीत
त्र्यंबकेश्वर- नाशिक
गोदावरी नदीच्या तीरावर
कुंभ मेळा
गुरु आणि सूर्य हे दोन्ही सिंह राशीत (श्रावण महिन्यात)

अर्धोदय

पौष अमावास्ये दिवशी जर रविवार, व्यतिपात, श्रवणनक्षत्र असेल तर तो अर्धोदय योग असतो. या दिवशी स्कंद पुराणमते सर्व जलाशयाचे जल गंगोदक बनते आणि सर्व ब्राह्मंण शुद्धात्मा होतात. म्हणून या पर्वात केलेले किंचितसे पुण्यदेखील मेरूसमान महान होते.

पात्रदान

अर्धोदय योग असलेल्या अमावास्येला ६०, ४० अथवा २५ माशांचे सोने अगर चांदी याचे पात्र करून त्यात खीर घालावी. भूमीवर अक्षतांचे अष्टदल कमल काढून त्यावर ब्रह्मा, विष्णू आणि शिवरूप देवतांचे पुजन करावे आणि त्यासहवर्तमान सुपात्र ब्राह्मणाला दान केल्यास समुद्रान्त पृथ्वीदान केल्यासमान फल मिळते. या दिवशी गोदान, शय्यादान वगैरे देय वस्तू तीन-तीन द्याव्यात. या योगावर वसिष्ठांनी सत्ययुगात, रामचंद्रांनी त्रैतायुगात, धर्मराजाने द्वापरात आणि कलियुगात पूर्णोदराने अनेकप्रकारे दानधर्म केला होता, म्हणून धर्मज्ञ सत्पुरुषांनी अद्यापही तसे अवश्य करावे.

पौषी अमावस्या

अमावस्या व पौर्णिमा या दोन्ही पर्वण्या आहेत. या दिवशी पृथ्विच्या कोणत्या न कोणत्या भागात सूर्य-चंद्राला ग्रहण असतेच. चंद्राचा अर्धा भाग हा नेहमी प्रकाशित असतो. ज्या दिवशी तो अजिबात दिसत नाही, त्या दिवसास ' अमावस्या' म्हणतात ही ;सिनीवाली' अगर 'कुहू' असते. तसेच पौर्णिमा 'राका' 'अनुमती' अशी दोन प्रकारची असते. चंद्र हा सूर्याच्या खाली असल्यामुळे पौर्णिमेला पांढरा व अमावास्येला काळा भाग सूर्याकडे असतो. त्यामुळे पृथ्वीवर केलेल्या दानाचे पुण्य बाष्पसंभूत होते आणि सूर्यकिरणांनी आकृष्ट होऊन पितरलोकापर्यंत (जिथे पितृगण राहतात.) पोचतात. यासाठीच अमावास्ये दिवशी पितृ-श्राद्धादी कृत्ये करावीत. ज्या दिवशी सूर्य, चंद्र, व पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, त्या वेळेसच ग्रहण होते. व्रतादीप्रमाण अमावस्या परविद्धा घ्यावयाची असते. चतुर्दशीयुक्त अमावस्या पूर्वविद्धा निषिद्ध मानतात.
'पुर्वाह्नो वै देवानां मध्याह्नो मनुष्याणां अपराण्हः पितृणाम् ।'
यानुसार दिवसाचे सुमारे १०-१० घटिकांचे तीन भाग करुन जप, ध्यान, उपासना वगैरे पहिल्या भागात करावे. संस्कारादि एवं आयुर्बलवित्तादीच्या प्राप्तीचे प्रयोगादी मनुष्यकार्य दुसरे तृतियांशात करावे. श्राद्ध, तर्पण वगैरे पितृकार्य तिसर्‍या तृतियांशात करावे, असे शास्त्रवचन आहे.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

अमावस्या श्राद्ध

अपराण्ह काळी अमावस्या तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी पौष कृष्ण ३० असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
©संकलन: सौ. प्राची शिंदे.

No comments:

Post a Comment