तिथी
|
माघ शुक्ल ३ (१०:१८)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
पूर्वाभाद्रपदा (१४:५८)
|
योग
|
शिव (११:३२)
|
करण
|
गरज (१०:१८), वणिज (२३:२५)
|
श्री गणेश जयंती
माघ शुक्ल चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या दिवशी मध्यान्ही श्री गणेशाचा जन्मोत्सव
असतो. तिळाच्या लाडवाचा नैवेद्य समर्पण करावा.
विनायक चतुर्थी
या चतुर्थीस 'विनायकी चतुर्थी' म्हणतात. असुर नरांतकाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या पोटी 'विनायक' नावाने अवतार धरला म्हणुन ही
विनायकी प्रसिद्ध आहे. शिवाय या चतुर्थीला 'ढुंढिराज चतुर्थी' असेही म्हणतात. हिला 'कुंद चतुर्थी' असेही नाव आहे. या दिवशी उपवास करून श्रद्धेने गणेशाची पूजा करावी; आणि पंचमीला तिळाचे जेवण करावे, अशा तर्हेने हे व्रत केल्यास
मनुष्य निर्विघ्न व सुखी होतो.
'गं स्वाहा'
हा मूळ मंत्र आहे.
'गां नम:'
ने ह्रदयादीन्यास करावा.
'आगेच्छोल्काय'
म्हणून गणेशाला आवाहन करावे आणि
'गच्छोल्काय'
म्हणून विसर्जन करावे. गंध इ. उपचारांनी विधिपूर्वक गणपतीचे पूजन करूज त्यास
लाडवांचा नैवेद्य अर्पण करावा.
नंतर आचमन, नमस्कार आणि प्रदक्षिणा इ. नंतर या गणेशगायत्री मंत्राचा जप करावा :-
'ॐ महोल्काय विद्महे वक्रतुंडाय धीमहि ।
तन्नोदन्ति प्रचोदयात् ॥' ( अग्निपुराण )
याच तिथीस गौरीव्रतही केले जाते. गणांसह गौरीची पूजा करतात. कुंकू इ.
साहित्यांनी भगवती गौरीची पूजा करतात. आपल्या सुख-सौभाग्यासाठी सुवासिनी व
ब्राह्मण यांची पूजा करावी. त्यानंतर प्रसन्न मनाने स्वबांधवांसह स्वत: भोजन
करावे. या गौरीव्रताच्या प्रभावाने सौभाग्य व आरोग्य यांची प्राप्ती होते.
या पुण्यमय तिथीला स्नान, दान, जप व होम इ. शुभ
कर्मांनी गजाननाच्या कृपेने सहस्रपट कामे यशस्वी होतात. या दिवशी नक्तव्रत करून
जे धुंडिराजाची मध्यान्ही व सायंकाळी पूजा करतील त्यांना सर्व देवांच्या पूजेचे फल
मिळते व ते सर्वत्र विजयी होऊन अंती गणेशलोकी जातील.
या दिवशी कोणी कोणी 'नक्त व्रत' पाळून ढुंढिराजाची पूजा करतात व त्यास तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवतात. जे
मांत्रिक या दिवशी तीळ व तूप यांनी हवन करतात, त्यांचे मंत्र सिद्ध होतात. या व्रताचे माहात्म्य फार आहे.
गणेशव्रत
माघ शुक्ल पूर्वविद्धा चतुर्थी दिवशी प्रात:स्नानादी नित्यकर्मे झाल्यावर
'ममाखिलाभिलषितकार्यसिद्धिकामनया गणेशव्रतं करिष्ये ।'
या मंत्राने संकल्प करावा आणि लाल वेदीवर लाल वस्त्र अंथरून व स्वत: लाल
वस्त्र परिधान करून लाल पूजोपचारांनी गणपतीची यथाविधी व शास्त्रोक्त पूजा करावी व
ओली हळकुंडे गूळ, साखर व तूप यांत मिसळून नैवेद्य दाखवावा. रात्री नक्त करून संपूर्ण अभीष्ट
प्राप्त करून घ्यावे.
तिलकुंद चतुर्थी/ तिलकचतुर्थी
माघ शुक्ल चतुर्थीला हे नाव आहे. या दिवशी नक्तव्रत, गणपतीची पूजा करतात. तिल व आज्य या
द्रव्यांनी हवन करतात. तिळामिश्रित गुळाच्या लाडवाचे सेवन करतात. रात्री जागरणही
करतात. हिला 'कुंद चतुर्थी' असेही नाव आहे. या दिवशी कुंदाच्या
फुलांनी सदाशिवाची पूजा करून जो नक्त भोजन करतो, त्याला लक्ष्मी प्राप्त होते.
वरदा चतुर्थी / (शिवपूजन)
माघ शुक्ल चतुर्थीस कुंदाच्या फुलांनी शिवपूजन करावे. श्रीप्राप्ती होते. या
दिवशी गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य वगैरेंनी पार्वतीचे पूजन करावे व गूळ, आले, लवण, पालक ( भाजी - मुळा ) आणि खीर
यांचा बली देऊन ब्राह्मणांना अर्पण करावा व भोजन द्यावे.
शांतिचतुर्थी
माघ शुक्ल चतुर्थीला गणेशपूजा करून तुपात तळलेले मोदक (अपूप ) आणि मिठाची
पक्वान्ने देऊन गुरुदेवाची पूजा करावी व गूळ, मीठ आणि तूप देऊन सर्व प्रकारची
शांती प्राप्त करून घ्यावी.
कुंद चतुर्थी /कुण्ड चतुर्थी
माघ शुक्ल चतुर्थी दिवशी उपास करून देवीची पूजा करावी. अनेक उपचारांनी पुजुन सर्व
प्रकारची नैवेद्यसामग्री सुपातून अगर मातीच्या भांड्यातून घालून ब्राह्मणाला
दिल्यास संतती आणि सौभाग्य प्राप्त होतात.
गौरी चतुर्थी
एक व्रत. माघ शुक्ल चतुर्थीला सर्वांनी, विशेषत: स्त्रियांनी कुंदपुष्पे वाहून गौरीची पूजा करावी. विद्वान ब्राह्मणाचा
सन्मान करावा. असा याचा विधी आहे.
फल - संतती व सौभाग्य यांची प्राप्ती.
ढुण्ढिपूजा
माघ शुक्ल चतुर्थी दिवशी नक्तव्रत आचरून काशीवासी ढुण्ढीराजाचे पूजन करावे
आणि तिलसाखरेचे मोदक अर्पण करून तिळांच्या आहुती द्याव्यात. रात्री एकभुक्त राहून
जागरण करावे म्हणजे त्याने संपूर्ण पापे नाहिशी होतात.
भद्रा
२३:२५
नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष माणू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि कारणाचा एकंदर जो
वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही
शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील
काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून प्रसंगविशेषी शुभ मनाला
जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
चतुर्थी श्राद्ध
अपराण्ह काळी चतुर्थी
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी माघ शुक्ल ४ असेल तर या दिवशी
श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
©संकलन: सौ. प्राची शिंदे.
No comments:
Post a Comment