तिथी
|
माघ कृष्ण ९ (३०:४१)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
जेष्ठा (२४:४५)
|
योग
|
हर्षण (१०:१२)
|
करण
|
तैतिल (१७:५६), गरज (३०:४१)
|
अन्वष्टका श्राद्ध
धर्मसिंधु नुसार षण्णवती म्हणजे एकूण ९६ श्राद्धे सांगितली
आहेत. ती पुढीलप्रमाणे :
अमावास्या
|
१२
|
युगादि
|
४
|
मन्वादि
|
१४
|
संक्रांति
|
१२
|
वैधृती
|
१२
|
व्यतिपात
|
१२
|
महालय
|
१५
|
अष्टका
|
५
|
अन्वष्टका
|
५
|
पूर्वेद्यु
|
५
|
एकूण
|
९६
|
श्री रामदास नवमी
माघ कृष्ण नवमीस दासनवमी म्हणतात. या दिवशी सज्जनगडावर, श्रीसमर्थ
रामदासस्वामींची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर साजरी होते.
समर्थ दर्शनाची वारी म्हणून प्रतिवर्षी असंख्य समर्थभक्त गडावर येतात. मोठ्या
श्रद्धेने सर्मथांचे दर्शन, स्मरण करतात.
फल – आत्मोन्नती
घबाड
३०:४१ नंतर घबाड योग आहे. हा
प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: शततारका
चंद्र नक्षत्र : मूळ
तिथी: कृष्ण १० =
१५ + १० = २५
सूर्य नक्षत्र ते
चंद्र नक्षत्र = २३
२३ x ३ = ६९
यात शुक्ल
प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २५ तिथी मिळवू :
६९ + २५ = ९४
आता ७ ने
भागू ९४ / ७ = १३ ३/७
बाकी ३ म्हणून
घबाड.
यमघंट योग
२४:४५ नंतर बुधवारी मूळ नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज
सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
|
सोमवार – विशाखा
|
मंगळवार – आर्द्रा
|
बुधवार – मूळ
|
गुरुवार – कृत्तिका
|
शुक्रवार – रोहिणी
|
शनिवार – हस्त
|
|
यमघंट योगावर जन्म
झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण
केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता
कुलक्षय
देवास्थापाना केली असता
मृत्यू हि फळे मिळतात.
याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५,
गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर
पुढे) देखील यमघंट योग होतो.
नवमी श्राद्ध
अपराण्ह काळी नवमी
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी माघ कृष्ण ९ असेल तर या दिवशी
श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
©संकलन: सौ. प्राची शिंदे.
No comments:
Post a Comment