Tuesday, 12 February 2019

दिनविशेष - १३ फेब्रुवारी २०१९


तिथी
माघ शुक्ल ८ (१५:४७)
वार
बुधवार
नक्षत्र
कृत्तिका (२२:२७)
योग
ब्रह्मा (१०:१८)
करण
बव (१५:४७), बालव (२७:२६)


दुर्गाष्टमी

प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

बुधाष्टमी

बुधवारी अष्टमी तिथी असल्याने या दिवशी बुधाष्टमी आहे.

भीष्माष्टमी

भीष्म तर्पणाने पापनाश
माघ शुक्ल अष्टमी दिवशी जवस, तीळ, गंध, फुले, गंगाजल, दर्भ आदींनी भीष्मांचे श्राद्ध अथवा तर्पण केल्याने अभीष्ट प्राप्त होते. मात्र तर्पण न केल्यास पाप घडते. त्याच दिवशी भीष्मांची पूजा करतात. त्यांना
'वसूनामवताराय शंतनोरात्मजाय च ।
अर्घ्यं ददामि भीष्माय आबालब्रह्मचारिणे ।'
या मंत्राने अर्घ्य द्यावा.

मोहिनीराजाचे नवरात्र

नगर जिल्ह्यात नेवासे गावी मोहिनीराजाचे मुख्य स्थान आहे. त्याचे नवरात्र करतात. माघ शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत नवरात्र असते. यात पूजा, आरती, नंदादीप, ब्राह्मणसुवासिनीभोजन, कथा-कीर्तन इ. कार्यक्रम असतात. पौष पौर्णिमेपासून माघ पौर्णिमेपर्यंत धरणे-पारणे करण्याची पद्धत आहे. रविवार हा या देवाचा वार आहे.

रवि कुंभ राशीत प्रवेश

८:४८ ला ला रवि कुंभ राशीत प्रवेश करीत आहे
रवीच्या कुंभ राशी संक्रमणासाठी पुण्यकाल संक्रमणा पूर्वी १६ घटिका असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. म्हणून पुण्यकाल सूर्योदय ते ८:४८ असा आहे. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत.
सामुदायिक मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहे. रविच्या राशी संक्रमाणाच्या वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·         १५ : महर्ग / जघन्य : फळ = तेजी
·         ३० : साम्यार्घ : फळ = सम
·         ४५ : समर्घ : फळ = मंदी

अष्टमी श्राद्ध

अपराण्ह काळी अष्टमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी माघ शुक्ल ८ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
©संकलन: सौ. प्राची शिंदे.

No comments:

Post a Comment