Saturday, 30 April 2016

महाराष्ट्र दिन

मे १, इ.स. १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.

महाराष्ट्र दिनाची कहाणी


२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ च्या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत प्रचंड जनसमुदाय,एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत,फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे "दिसताक्षणी गोळ्या" घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.

दिनविशेष - १ मे २०१६


तिथी
 चैत्र कृष्ण ९ (१९:२३) 
वार
 रविवार     
नक्षत्र
 धनिष्ठा (२१:२२)
योग
 शुक्ल (१४:२४)
करण
 तैतिल (८:०५)

महाराष्ट्र दिन

मे १, इ.स. १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.

महाराष्ट्र दिनाची कहाणी

२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ च्या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत प्रचंड जनसमुदाय,एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत,फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे "दिसताक्षणी गोळ्या" घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.

घबाड

२१:२२ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: भरणी
चंद्र नक्षत्र : शततारका
तिथी: १५ + १० = २५
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२४ x ३ = ६९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे २५ तिथी मिळवू : ६९ + २५ = ९४
आता ७ ने भागू  ९७ / ७ = १३ ३/७

बाकी ३ म्हणून घबाड.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

दिनविशेष - १३ एप्रिल २०१६


तिथी
 चैत्र शुक्ल ७ (२१:४१)  
वार
 बुधवार     
नक्षत्र
 आर्द्रा (१४:२२)
योग
 अतिगंड (१४:४४)
करण
 गरज (१०:०५)

सूर्याला दवणा वाहणे

या दिवशी सूर्याला दवणा वाहाव्यात.

अनोदना सप्तमी

चैत्र शुक्ल  षष्ठी व सप्तमी दोन्ही दिवस केवळ पाणी पिऊन उपवास करावयाचा असतो. सप्तमीस सूर्यपूजा करावयाची.

गोमयादी सप्तमी

गोमयादी सप्तमी चैत्र शुक्ल  सप्तमीचे नाव. या दिवसापासून प्रत्येक महिन्यातल्या शुक्ल  सप्तमीस एक वर्षपर्यंत सूर्यपूजा करतात. त्या दिवशी गोमय, यावक, दूध किंवा गळलेली पाने भक्षण करुन राहतात.

तुरग सप्तमी

हे चैत्र शुक्ल  सप्तमीस करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी उपास करुन रवी, निकुंभ, अरुण, यम, यमुना, शनी, रविपत्‍नी छाया, सप्त छंद, धाता, आर्यमा इ. देवतांची पूजा करतात. उद्यापनाच्या वेळी घोडा दान देतात.

नामसप्तमी

हे व्रत चैत्र शुक्ल  सप्तमीपासून एक वर्षपर्यंत करतात. चैत्रादी बारा महिन्यांत सूर्याच्या बारा नावांनी यथाक्रम पूजा करावी. जसे - चैत्रात 'धाता' या नावाने, 'वैशाखात' अर्यमा, ज्येष्ठात 'मित्र',  आषाढात 'वरुण' , श्रावणात 'इंद्र' भाद्रपदात 'विवस्वान्, आश्‍विनात 'पर्जन्य', कार्तिकात 'पूषा', मार्गशीर्षात 'अंशुमान्' , पौषात  'भग', माघात 'त्वष्टा', फाल्गुनात 'विष्णू' अशा नामोच्चारासहित सूर्याचे पूजन करुन एकभुक्त राहावे. असे केल्याने आयुष्य, आरोग्य आणि ऐश्‍वर्य यांची अपूर्व अभिवृद्धी होते.

मोदनव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल  सप्तमीला करतात. त्या दिवशी सकाळी प्रातःस्नानादी उरकून सूर्यनारायणाची पूजा करावी. ब्राह्मणांना खिरीचे भोजन घालावे आणि आपणही एकदा ते सेवन करावे.

सूर्यव्रत

हे व्रत चैत्र शुक्ल  सप्तमीलाच करतात. यासाठी घरातील एका बाजूचा निवान्त भाग धुऊन, सारवून स्वच्छ करावा. तेथे मध्यभागी वेदी तयार करावी आणि तिच्यावर अष्टदल कमल काढावे. कमळाच्या निरनिराळ्या दलांवर पुढीलप्रमाणे देवतांच्या मूर्तीची स्थापना करावी. पूर्वेकडील दलावर दोन ऋतुकारक 'गंधर्व' , आग्नेयेकडील दलावर दोन ऋतुकारक 'गंधर्व' दक्षिण दलावर दोन 'अप्सरा', नैऋत्य दलावर दोन 'राक्षस', पश्‍चिमेकडील दलावर दोन ऋतुकारक 'महानाग', वायव्यदलावर दोन 'यातुधान', उत्तर दलावर दोन 'ऋषी' आणि ईशान्यदलावर एक 'ग्रह', याप्रमाणे स्थापना करून त्या सर्वांची गंधपुष्प, धूप, दीप, आणि नैवेद्य यांनी वेगवेगळी पंचोपचार पूजा करावी. सूर्याला तुपाच्या १०८ आहुती द्याव्या व इतर सर्वांना ८-८ आहुती द्याव्या. प्रत्येक देवतेच्या नावाने एकएक ब्राह्मण याप्रमाणे ब्राह्मण निमंत्रित करुन त्यांना भोजन घालावे. अशातर्‍हेने एक वर्षपर्यंत प्रत्येक शुक्ल  सप्तमीस केल्याने सूर्यलोकाची प्राप्ती होते.

कमल सप्तमी

हे चैत्र शुक्ल  सप्तमीचे नाव. या दिवशी सूर्याचे व्रत करतात. व्रतावधी एक वर्ष. सूर्य ही या व्रताची देवता. तिलपात्रात कमलावर सूर्याची स्थापना करुन पूजा करतात आणि सुवर्णकमलाचे ब्राह्मणास दान करतात. असा या व्रताचा आणखीन एक विधी आहे.

रवि अश्विनी नक्षत्र प्रवेश

१९:४७ ला रवि अश्विनी नक्षत्रात प्रवेश करीत आहे.

रवि मेष राशी प्रवेश

१९:४७ ला रवि मेष राशीत प्रवेश करत आहे.
रवि संक्रमणाच्या वेळी, मेष राशीसाठी संक्रमणा पूर्वी व नंतर १०/१५ घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून पुण्यकाल १२:३९  ते सूर्यास्त असा आहे.
सामुदायिक मुहूर्त ४५ म्हणजे समर्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·         १५ : महर्घ / जघन्य : फळ = तेजी
·         ३० : साम्यार्घ : फळ = सम
·         ४५ : समर्घ : फळ = मंदी

भद्रा

२१:४१ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - ३० एप्रिल २०१६


तिथी
 चैत्र कृष्ण ८ (२०:३७)  
वार
 शनिवार     
नक्षत्र
 श्रवण (२१:५५)
योग
 शुभ (१६:२१)
करण
 बालव (८:५९)

कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

जानकी व्रत

हे व्रत चैत्र कृष्णअष्टमीला करतात. यात जनककन्या जानकीची पूजा करतात. श्रीगुरु वसिष्ठांच्या आज्ञेवरुन श्रीरामचंद्राने समुद्रतटावर असलेल्या तपोभूमीवर बसून हे व्रत केले होते. या व्रतात भाताचे हवन करावे व अनरशांचा नैवेद्य दाखवावा. आपल्या मनोकामना पूर्ण होण्याकरिता हे व्रत अवश्य करावे.

भैरव- शीतल अष्टमी

चैत्र कृष्णअष्टमी दिवशी शीतलादेवीचे पूजन करतात. प्रथम थंड पाण्याने आणि नंतर दुधाने देवीला स्नान घालून भाताचा नैवेद्य दाखवतात. अन्य उपचारही अर्पण करतात. त्याचप्रमाणे भैरवाचीही पूजा करतात. म्हणून या व्रताला भैरव-शीतला अष्टमी असे म्हणतात.

दग्ध योग

२०:३७ नंतर शनिवारी नवमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी




संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Thursday, 28 April 2016

दिनविशेष - २९ एप्रिल २०१६


तिथी
 चैत्र कृष्ण ७ (२१:१०)  
वार
 शुक्रवार     
नक्षत्र
 उत्तराषाढा (२१:४८)
योग
 साध्य (१७:४६)
करण
 विष्टि (९:१२)

दग्ध योग

२१:१० नंतर शुक्रवारी अष्टमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


भद्रा

९:१२ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट