Tuesday, 5 April 2016

दिनविशेष - १४ एप्रिल २०१६


तिथी
 चैत्र शुक्ल ८ (२१:२९)  
वार
 गुरुवार     
नक्षत्र
 पुनर्वसु (१४:३६)
योग
 सुकर्मा (१३:१७)
करण
 विष्टि (९:२९)

दुर्गाष्टमी

प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

गुरुपुष्यांमृत

१४:३६ नंतर सुर्योदयापर्यंत गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे सुवर्णसंचयासाठी शुभ असणारा गुरुपुष्यांमृत योग होत आहे. हा योग विवाहा साठी वर्ज आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

अशोक कलिका प्राशन

१४:३६ पर्यंत हे व्रत करावे. या व्रताचा विधी असा -
हे व्रत चैत्र शुक्ल  अष्टमीला करतात. त्या दिवशी प्रातःस्नानादी नित्यकर्मे उरकून अशोकवृक्षाची पूजा करावी. त्याची फुले किंवा कोमलपर्णयुक्त आठ कळ्या घेऊन त्यांनी शिवाची पूजा करावी.
'त्वामशोक नमाम्येनं मधुमाससमुद्‌भवम् ।
शोकार्तः कलिकां प्राश्‍य मामशोकं सदा कुरु ॥'
असे म्हणून आठ कळ्या भक्षण करुन व्रत केले असता व्रती शोकरहित होतो. त्या दिवशी बुधवार किंवा पुनर्वसु नक्षत्र असेल किंवा दोन्ही असतील तर व्रती मनुष्याला कोणतेही दुःख राहात नाही,

भवानीदेवी उत्पत्ति

भवानीचा अवतार चैत्र शुक्ल  अष्टमीला झाला म्हणून त्या दिवशी देवीचे पूजन करुन 'अनरसे' आदीचा नैवद्य दाखवावा. या दिवशी अष्टमी नवमीयुक्‍त घ्यावी. जो मनुष्य अष्टमीस भवानीचे दर्शन घेईल, तो कदापी शोक पावणार नाही. सर्वकाल आनंदी राहील. या दिवशी पुनर्वसुनक्षत्र बुधवारयुक्‍त ही तिथी असता प्रातःकाळी यथाविधी स्नान केले असता, वाजपेय यज्ञाचे फल प्राप्त होते. या दिवशी ब्रह्मपुत्रतीर्थात स्नान केले असता ब्रह्मपद प्राप्त होते. त्याचप्रमाणे शुद्ध व नियतमन होऊन सर्व चैत्र महिना ब्रह्मपुत्रतीर्थात स्नान करील त्यास मोक्षप्राप्ती होईल.

भद्रा

९:२९ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म एप्रिल १४, इ.स. १८९१; महू, मध्य प्रदेश येथे झाला. या दिवशी त्यांचा जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते. भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment