तिथी
|
चैत्र कृष्ण ९ (१९:२३)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
धनिष्ठा (२१:२२)
|
योग
|
शुक्ल (१४:२४)
|
करण
|
तैतिल (८:०५)
|
महाराष्ट्र दिन
मे १, इ.स. १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस
महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन
म्हणूनही ओळखला जातो.
महाराष्ट्र दिनाची कहाणी
२१ नोव्हेंबर
इ.स.१९५६ च्या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात
तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे
नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र
छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून
कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य
सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार
टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर- सव्वाशे
कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून
मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत प्रचंड
जनसमुदाय,एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या
बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत,फ्लोरा फाउंटनकडे जमू
लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच.
कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला
कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा
फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच
विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना
गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई
यांचे "दिसताक्षणी गोळ्या" घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय
फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या
निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त
महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५
आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व
हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन १
मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
करावी लागली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.
घबाड
२१:२२ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: भरणी
चंद्र
नक्षत्र : शततारका
तिथी: १५ + १० = २५
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२४
x ३ = ६९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २५ तिथी
मिळवू : ६९ + २५ = ९४
आता
७ ने भागू ९७ / ७ = १३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment