तिथी
|
चैत्र शुक्ल ४ (२६:५४)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
कृत्तिका (१८:०७)
|
योग
|
आयुष्यमान (२२:४५)
|
करण
|
वणिज (१६:२१)
|
विनायक चतुर्थी
विनायकी हे
संकष्टीप्रमाणेच एक सर्व कामनांना सिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या
शुद्ध पक्षातील चतुर्थीस 'विनायकी चतुर्थी' असे म्हणतात.
आपल्या पंचागात विनायकी व संकष्टी असे उल्लेख असतात. संकष्टीप्रमाणेच विनायकी हे
व्रत आहे व ते गजाननाला प्रिय आहे. त्याचा पूजाविधी संकष्टीप्रमाणेच असतो. विनायक
हे गणपतीचेच नाव आहे. या दिवशी चंद्रदर्शन अथवा चंद्रपूजा याचा संबंध नसतो. या
दिवशी दोन वेळा उपवास करावयाचा असतो. दुसरे दिवशी पारणे करतात. या व्रतसाधनाने
सर्व विघ्ने, बाधा वगैरेचे निरसन होते व सर्व कामना परिपूर्ण
होतात. गणपतीची कृपा होते. महान सिद्धिदायक असे हे व्रत आहे. संकटकाळी पुष्कळ लोक
आपल्या संकटनाशनार्थ हे व्रत करतात व श्रीगजाननाला नवस बोलतात. या विनायकी ७, ११, २१, अशा ठरवून करावयाच्या
असतात. यातही मंगळवारी येणारी विनायकी 'अंगारिका विनायकी; म्हणून हिचे महत्वही विशेष सांगितले आहे. एक 'अंगारिका विनायकी' चतुर्थी व्रत
केल्यास सर्व वर्षातील विनायकी केल्याचे पुण्य मिळते, एवढे या योगाचे
महत्व आहे.
या दिवशी सर्व
पूजा नेहमीप्रमाणेच अथवा संकष्टीप्रमाणेच अथवा संकष्टीप्रमाणेच मंत्र म्हणून
करावी. उपचार समर्पण करताना फक्त
'श्रीसिद्धिविनायकाय नमः |
असा निर्देश
करावा.
आश्रमव्रत
या व्रताचा
प्रारंभ चैत्र शुक्लचतुर्थीपासून होतो. तीन महिन्यांचा एक असे वर्षाचे चार भाग
करुन प्रत्येक भागात अनुक्रमे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांची पूजा करावयाची, असा या व्रताचा विधी आहे. व्रतावधी एक वर्ष.
गणपतीला दवणा व लाडूचा नैवेद्य समर्पण करणे
या दिवशी श्रीगजाननाला दवणा
वाहाव्यात व लाडूचा नैवेद्य अर्पण करावा.
भद्रा
१६:२१ नंतर २६:५४ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment