तिथी
|
अधिक जेष्ठ कृष्ण ११ (११:५५)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
अश्विनी (२२:२९)
|
योग
|
शोभन (१८:४४)
|
करण
|
बालव (११:५५), कौलव (२३:०५)
|
कमला (परमा) एकदशी
अधिक महिन्यातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिला परमा किंवा कमला एकादशी
म्हणतात. तसं तर प्रत्येक वर्षी २४ एकादशा असतात. मात्र जेव्हा अधिक महिना (मलमास)
येतो, तेव्हा यांची संख्या
वाढून २६ होते. अधिक महिन्यात शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला पद्मिनी एकादशी तर
कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिला परमा एकादशी म्हणतात. भगवान
श्री कृष्णाने अर्जुनाला या व्रताचा विधी सांगितला होता.
हि एकादशी करण्यासाठी दशमीच्या दिवशी व्रताचा आरंभ करून एका पितळी भांड्यात
भात इ. भोजन करावे. मात्र मीठ खाऊ नये. जमिनीवर झोपावे आणि ब्रह्मचार्याचे पालन
करावे. एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर प्रात:विधी झाल्यावर, दंतधावन करून १२ वेळा पाण्याच्या
गुळण्या करून शुद्ध व्हावे.
सुर्योदयापूर्वी तीर्थस्थळी स्थानासाठी जावे. शेण, माती, तीळ, कुश आणि आवळा यांचे चूर्ण यांनी विधीपूर्वक स्नान करावे. श्वेत वस्त्र धारण
करून भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करावी.
दग्ध योग
११:५५ नंतर रविवारी द्वादशी
तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
द्वादशी श्राद्ध
अपराण्ह काळी द्वादशी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी अधिक जेष्ठ कृष्ण
१२ त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे. किंवा ज्यांचा गेल्या वर्षी (शके
१९३९) जेष्ठ महिन्यात मृत्यू झाला असेल
आणि ज्यांची श्राद्ध तिथी त्यांचे जेष्ठ कृष्ण १२ आहे त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध
या दिवशी करावे.
ज्या महिन्यात
निधन झाले असेल तोच महिना अधिक मास येतो तेव्हा प्रथम वर्षश्राद्ध त्या अधिक
महिन्यातच करावे. मात्र प्रतिसांवत्सरिक श्राद्ध या निज जेष्ठ महिन्यात करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment