तिथी
|
अधिक जेष्ठ अमावस्या (२५:१३)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
रोहिणी (१६:४३)
|
योग
|
धृति (९:१२), शूल (२९:२०)
|
करण
|
चतुष्पाद (१४:५६), नाग (२५:१३)
|
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
दर्श अमावास्या
अपराण्हकाली जास्त मानाने असणाऱ्या अमावस्येलाच "दर्श अमावस्या"
असे म्हणतात. अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक
फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.
दर्शश्राद्ध : दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना
उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.
मलमास समाप्ती
१६
मे रोजी सुरु झालेल्या मलमासाची (अधिक जेष्ठ मासाची) समाप्ती होत आहे. व निज जेष्ठ
मासाचा आरंभ होत आहे.
अमावस्या श्राद्ध
अपराण्ह काळी अमावस्या
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी अधिक जेष्ठ कृष्ण
३० त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे. किंवा ज्यांचा गेल्या वर्षी (शके
१९३९) जेष्ठ महिन्यात मृत्यू झाला असेल
आणि ज्यांची श्राद्ध तिथी त्यांचे जेष्ठ कृष्ण ३० आहे त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध
या दिवशी करावे.
ज्या महिन्यात
निधन झाले असेल तोच महिना अधिक मास येतो तेव्हा प्रथम वर्षश्राद्ध त्या अधिक
महिन्यातच करावे. मात्र प्रतिसांवत्सरिक श्राद्ध या निज जेष्ठ महिन्यात करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment