तिथी
|
निज जेष्ठ शुक्ल १३ (अहोरात्र)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (अहोरात्र)
|
योग
|
साध्य (२४:२७)
|
करण
|
कौलव (१७:३५), तैतिल (--:--)
|
सोमप्रदोष
सूर्यास्तानंतर
पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने
साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक
चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास
करतात.
‘कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष आहे. प्रत्येक
महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक वर्षभर करावे.
व्रतादिवशी प्रात: स्नान करुन
'मम पुत्रादिप्राप्तिकामनया प्रदोषव्रतमहं करिष्ये'
इ. संकल्प करून
व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे पुढे बसून वेदपाठी
ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व षोड्शोपचारे पूजा करावी.
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण
करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा
लावताना आठ वेळा नमस्कार करावा.
'धर्मस्त्वं वृष रूपेण जगदानन्दकारक।
अष्टमूर्तैरधिष्ठानं अथः पाहि सनातन ।'
या मंत्राने
नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला स्पर्श करुन पुढील
मंत्राने शंकर, पार्वती आणि नंदिकेश्वराची प्रार्थना करावी.
ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्ये चापम्रुत्यव: !
भय क्लेश मनस्ताप: नश्यनंतु मम सर्वदा !!
"
( कर्ज,रोग,गरिबी,अपम्रूतू,भय, त्रास ईत्यादि मनस्ताप माझे कायमचे नाहिशे होवोत.)
हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या
स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø सोमवार: आनंद, शांतिरक्षणासाठी
व पारमार्थिक कल्याणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी
भौम प्रदोष करावा.
Ø बुधवार: सर्व प्रकारच्या पापातून मुक्त करण्यात येणारे एक प्रकारचे
व्रत आहे.
Ø गुरुवार: बृहस्पतिप्रदोष अथवा गुरुप्रदोष व्रत केल्याने शत्रूंचा नाश
होतो, अशी धार्मिक
कल्पना आहे. पुराणातल्या एका कथेनुसार गुरुप्रदोष व्रताच्या साहाय्याने
इंद्राने वृत्रासुरावर विजय प्राप्त केला होता.
Ø शुक्रवार: सौभाग्य किंवा
स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर तसेच धर्म, अर्थ, काम व मोक्ष
प्राप्ति साठी शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी
शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा.
Ø रविवार: आयुर्दायासाठी
अर्कप्रदोष अर्क प्रदोष हे व्रत करावे.
शिवराज्याभिषेकोत्सव दिन
जेष्ठ शुक्ल त्रयोदशी दिवशी
शिवराज्याभिषेकोत्सव दिन साजरा केला जातो.
रयतेच्याया स्वतंत्र
सार्वभौम राज्याला बळकटी देण्याच्या उद्देशाने राजधानी रायगडावर शिव राज्याभिषेक
झाला. मराठी संस्कृती विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय राज्याभिषेक दिनानिमित्त
जाहीर केले. आपल्या स्वतंत्र राज्याची शिवशक (राज्याभिषेक शक) ही नवी
कालगणना सुरु केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई व होन अशी मराठी
लिपीतील नाणी चलनात आणली. मराठी भाषेतील अनेक महत्वपूर्ण ग्रंथ निर्माण करून
घेतले. परकियांच्या तावडीतून सोडविलेल्या गडकोट किल्ल्यांना पूर्वीची मराठी नवे
दिली. एवढ्यावरच न थांबता आपल्या लोककल्याणकारी स्वतंत्र राज्याचा विचार
महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता,संपूर्णभारतात आणि जगभर
पोहोचविण्यासाठी राज्याभिषेकानंतर परकीय सत्ताधीशांविरूढ मोहिमांचा धडका सुरु
केला.
शिवशक आरंभ
शिव शक ३४५ आरंभ होत आहे.
दुर्गंधी-दुर्भाग्यनाशक व्रत
ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला
कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन करावे व त्या ठिकाणचा पांढरा
धोतरा, लाल कणेरी आणि सपुष्प निंबाचे गंधफूल लावून
पूजन करावे. ही तीन्ही झाडे सूर्यनारायणाला फार प्रिय आहेत, म्हणून यांचे पूजन करतात.
त्रयोदशी श्राद्ध
अपराण्ह काळी त्रयोदशी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ शुक्ल १३ आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment