Saturday, 22 July 2017

दिनविशेष - २३ जुलै २०१७


तिथी
 आषाढ कृष्ण अमावास्या (१५:१६)
वार
 रविवार
नक्षत्र
 पुनर्वसु (१५:१६)
योग
 वर्ज (२५:३६)
करण
नाग (१५:१६), किंस्तुग्घ्न (२५:४६)


दर्श अमावास्या

अपराण्हकाली जास्त मानाने असणाऱ्या अमावास्येलाच "दर्श अमावास्या" असे म्हणतात. अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.

दीपपूजन

आषाढी अमावास्या "दीप अमावास्या" म्हणुन पाळली जाते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांना (नीराजन, पणती, समयी पासून कंदील, इलेक्ट्रिक दिव्यापर्यन्त सर्वांना ) घासून पुसून स्वच्छ करून ते पेटवले जातात. त्यांची पूजा केली जाते.

घरातील दिव्यांना दुध पाण्याने धुउन स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून ठेवावेत त्यांची पूजा करावी.  या दिवसा पासूनच पत्रीचे महत्त्व सुरु होते. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी. गोडाचा नेवैद्य अर्पण करावा.

आपल्या घरातील लहान मुलांना औक्षण करावे. वंशाचा दिवा असतो न म्हणून आता मुलगा मुलगी हा भेद करत नाही त्यामुळे आपल्या दिव्याचे किंवा पणतीचे नक्की औक्षण करावे...!

दुर्वा ही वंश वृद्धीचे प्रतिक आहे , त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी ....!!
या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात...!

त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्ज्वलित करून त्याची पूजा केली जाते....!
पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात...!

 दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌|
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥

हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’!
त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते.

आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते.
असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.

नक्तव्रतारंभ

दिवसा भोजन न करता उपोषणाचा करणे पाणी पिणे व सुर्यास्तानंतर भोजन करणे म्हणजे नक्तव्रत. या व्रताचा आरंभ होत आहे.

भारतीय श्रावण मासारंभ

भारतीय कलगणनेनुसार श्रावण मास आरंभ होत आहे.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

अमावास्या, प्रतिपदा श्राद्ध

अपराण्ह काळीअमावास्या आणि प्रतिपदा या दोन्ही  तिथी असल्यामुळेज्यांची श्राद्ध तिथी आषाढ अमावास्या किंवा श्रावण शुक्ल १ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment