तिथी
|
वैशाख अमावास्या (१७:१८)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
भरणी (१०:५६)
|
योग
|
शोभन (२६:०६)
|
करण
|
चतुष्पाद (६:३६), नाग (१७:१८), किंस्तुघ्न (२७:५५)
|
दर्श भावुका अमावस्या
वैशाख
अमावास्येला भावुका अमावास्या म्हणतात. या दिवशी भावूकादेवी, पांडव, कुंती व दौपदी
यांची झाडपाल्याच्या मंडपात पूजा करावी.
अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक
फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.
दर्शश्राद्ध : दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना
उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.
शनैश्चर जयंती
शनिदेवाचा जन्म वैशाख अमावास्याच्या दिवशी मध्यान्ही म्हणजे दिवसा १२ वाजता
झाला होता, म्हणूनच वैशाख
अमावास्या शनैश्चर जयंती स्वरूपात साजरी केली जाते. शनीला तैलाभिषेक करून शनीचे काळ्या व निळ्या फुलांनी
पूजन करावे. शनैश्चर जयंतीच्या दिवशी पाळावयाचे नियम:
१)
या
दिवशी सकाळी उठून शुद्ध पाण्याने अंघोळ करावी.
२)
नंतर
पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण करावे.
३)
मंदिरात
जाऊन शनि देवताच्या मुर्तीचे मंत्रोपचारद्वारे महाभिषेक करावे.
४)
नंतर
या मुर्तीला तांदुळाने बनवलेल्या 24 दळांच्या कमळावर स्थापित करे.
५)
मग
काळे तीळ, काळी उडदाची डाळ, फुलं, धूप
व तेल इत्यादीने पूजा करावी.
६)
शनिदेवला
काळे वस्त्र किंवा लोखंडाची वस्तू अर्पित करावी
७)
पूजा
करताना शनिच्या दहा नावाचे उच्चारण करावे - कोणरथ, कृष्ण, पिप्पला, सौरि, पिंगलो, रोद्रोतको, बभ , मंद, शनैश्चर
८)
दिवसा
१२ वाजता महाआरती करून प्रसादाचे वितरण करावे.
९)
पूजा
झाल्यानंतर पिंपळाच्या झाडीची दोर्याने सात वेळा परिक्रमा करावी.
१०)
मग
खाली दिलेल्या मंत्राद्वारे शनिदेवाची प्रार्थना करावी -
शनैश्चर नमस्तुभ्यं नमस्ते त्वथ राहवे।
केतवे अथ नमस्तुभ्यं सर्वशांतिप्रदो भव।।
११)
आपल्या
आर्थिक स्थितिनुसार ब्राह्मणांना भोजन करावे व लोखंडाची वस्तु, धन इत्यादीचे दान करावे.
१२)
जर
तुमचे मंदिर जाणे संभव नसेल तर घरातसुद्धा शनिदेवाचे स्मरण करून शनि चालीसाचा पाठ
करावा. नंतर शनिची आरती करावी.
१३)
शनिच्या
पूजेच्या अगोदर जर हनुमानची आराधना केली तर शनिदेव प्रसन्न होतात.
अगस्ति लोप
अगस्ति हा तारा अस्त होत
आहे. अगस्ति ताऱ्याचा समुद्राच्या स्थितीशी संबंध आहे असे आढळून आल्यामुळे त्याचे
उदयास्त ज्योतिष ग्रंथात समाविष्ट केले गेले.
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
अमावास्या श्राद्ध
अपराण्ह काळी अमावास्या
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी वैशाख कृष्ण अमावास्या आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment