तिथी
|
अधिक जेष्ठ कृष्ण ४ (२८:१८)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
पूर्वाषाढा (८:५१)
|
योग
|
शुक्ल (१९:५४)
|
करण
|
बव (१५:००), बालव (२८:१८)
|
संकष्टी चतुर्थी
पुणे चंद्रोदय: २२:१२
श्रीगणपतीच्या व्रतांपैकी हे दर महिन्यास येणारे एक संकटनाशक, महासिद्धिदायक असे व्रत आहे.
प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात जी चतुर्थी असते, त्या चतुर्थीस 'संकष्टी -चतुर्थी ' असे म्हण्तात. या दिवशी दिवसभर उपवास करावयाचा असतो. रात्रौ चंद्रदर्शनानंतर
गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी व त्यानंतर चंद्राची पूजा करुन त्याला व चतुर्थी
तिथीला अर्घ्य द्यावे, अशी पद्धत आहे. श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने हा या व्रतप्रभावाने ती
प्रसन्न होते आणि सर्व विघ्नांचा नाश होतो, असे महात्म्य आहे. या दिवशी चंद्रदर्शनानंतर चंद्राची पूजा करुन पारणे
करावयाचे असते; हे ह्या व्रताचे मुख्य अंग आहे. या दिवशी संध्याकाळी आंघोळ करुन श्रीगणपतीच्या
पूजेची तयारी करून घ्यावी. पुजास्थानी घरातील गणेशमूर्ती असेल तर ती ठेवावी.
नसल्यास सुपारी अक्षतापुंजावर ठेवून तिची गणपती म्हणून पूजा करावी. अथर्वशीर्षाची
२१ आवर्तने करावीत. पूजा षोडशोपचारांनी पंचामृतअभिषेकासह करावी. आवर्तनाच्या
प्रत्येक वेळी
'श्रीविघ्नविनायकदेवताभ्यो नमः ।'
असे म्हणावे. प्रारंभी संकल्प करताना 'अमुक संकटनाशनार्थ' असे म्हणून त्या
संकटाचा उल्लेख करावा.चंद्राला अर्घ्य द्यावा. त्याच्या दिशेने गंध, फूल,अक्षता उडवाव्या व नमस्कार करावा. चतुर्थी तिथीला अर्घ्य ताम्हनात द्यावा व
शेवटी महानैवेद्य दखवून पारणे करावे. कथा ऐकावी. यायोगे सर्व संकटाचा नाश होतो, व गणेशकृपा होते, असा अनुभव आहे.
मंगळवारी येणार्या चतुर्थीला 'अंगारकी संकष्टी ' म्हणतात. हा एक महान
योग आहे. हे संकष्टीचे व्रत यथासांग करणार्यास वर्षातील सर्व चतुर्थी केल्याचे
पुण्य मिळते. यथाविधी व षोडशोपचारांनी गणपतीचे पूजन केल्यानंतर चंद्रोदय होताच
चतुर्थी तिथीस, चंद्रास आणि श्रीगजाननास अर्घ्यप्रदान करावे. गजाननाची करुणा भाकावी. या
व्रताच्या प्रभावाने साधकाची सर्व विघ्ने, संकटे दूर होतात. त्यास सर्व ऐहिक सुखे प्राप्त होऊन मंगलमूर्तीचे दर्शन होते, साक्षात्कार होतो, अशी लोकांत श्रद्धा आहे.
संकष्टी चतुर्थीची कथा
पूर्वी द्वारकेत सत्रजित नावाचा एक मोठा राजा होवून गेला. सत्रजित सूर्याचा
मोठा भक्त होता त्याच्या उपासनेने. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्यमंतक
मणी दिला. त्या मण्यात सूर्याचे तेज होते,. या मण्यामुळे राजास दररोज आठ भार सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित अभिमानी
झाला.
सत्रजितची कन्या सत्यभामा हि अत्यंत रूपवती व सर्व कलासंपन्न होती ती कृष्णावर
मनोमन प्रेम करायची त्यामुळे सत्राजित श्रीकृष्णाचा द्वेष करीत असे. सत्राजिताने
सात्यकी बरोबर सत्यभामेचा विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला असता सात्यकीने विवाहास
नकार दिला त्याला ठावूक होते कि सत्यभामेचे कृष्णावर प्रेम आहे,त्यामुळे सत्रजित श्रीकृष्णाचा
अधिकच द्वेष करू लागला.
पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधु प्रसंनजित हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात
शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याला ठार मारले व खावून टाकले पण तो दिव्यमणी
सिहाच्या गळ्यात अडकला पुढे त्या सिंहास जांबुवंताने ठार केले व तो स्यमंतक मणी
हस्तगत केला.
इकडे बंधू प्रसंनजित व स्यमंतक मणी दोन्ही गायब झाल्याने सत्रजितला कृष्णाचा
संशय आला त्याने कृष्णावर मणी चोरल्याचा आरोप केला. चोरीच्या आरोपाने श्रीकृष्ण
दुखी झाला व आपल्यावरील चोरीचा आळ दूर करण्यासाठी कृष्ण अरण्याकडे निघाला. जंगलात
एका गुहेतून दिव्य प्रकाश येत होता सैन्याला बाहेर थांबवून कृष्ण एकटाच गुहेत
शिरला ती गुहा जांबुवंताची होती जम्बुवाताने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे
युद्ध एकवीस दिवस चालले होते. जांबुवंत हा ब्रम्हाचा पुत्र होता, लंकाविजयात त्याने रामाला साथ दिली
होती त्याला आशीर्वाद होता कि श्रीकृष्णा शिवाय त्याला युद्धात कोणी हरवू शकत
नव्हते,
जम्बुवान्ताला समजले कि तो प्रत्यक्ष प्रभूंशी युध्द करत आहे तेव्हा तो
कृष्णाला शरण गेला इकडे गोकुळात नंद-यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते
कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाची प्रार्थना केली
व संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले.
श्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने
स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. त्यांना घेवून श्रीकृष्ण
द्वारकेत परतला त्याने सत्राजिताला मणी परत केला, तेव्हा सत्रजित लज्जित झाला सत्रजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागितली व त्याने
आपली कन्या सत्यभामेशी श्रीकृष्णाचा विवाह लावून दिला् व अशा प्रकारे संकष्टी
चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला.
दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे
संकटहर्त्या श्रीगणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या
मनोकामना पूर्ण होतात.दिवसभर उपोषण करुन, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी
श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे. असे हे व्रत असते.
घबाड
८:५१ नंतर २८:१८ पर्यंत
घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: रोहिणी
चंद्र
नक्षत्र : उत्तराषाढा
तिथी: कृष्ण ४ = १५ + ४ = १९
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८
x ३ = ५४
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १९ तिथी
मिळवू : ५४ + १९ = ७३
आता
७ ने भागू ७३ / ७ = १० ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
चतुर्थी श्राद्ध
अपराण्ह काळी चतुर्थी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी अधिक जेष्ठ कृष्ण
४ त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे. किंवा ज्यांचा गेल्या वर्षी (शके
१९३९) जेष्ठ महिन्यात मृत्यू झाला असेल
आणि ज्यांची श्राद्ध तिथी त्यांचे जेष्ठ कृष्ण ४ आहे त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध या
दिवशी करावे.
ज्या महिन्यात
निधन झाले असेल तोच महिना अधिक मास येतो तेव्हा प्रथम वर्षश्राद्ध त्या अधिक
महिन्यातच करावे. मात्र प्रतिसांवत्सरिक श्राद्ध या निज जेष्ठ महिन्यात करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment