Wednesday, 16 May 2018

दिनविशेष - २० मे २०१८



तिथी
 अधिक जेष्ठ शुक्ल ६ (२४:१८)   
वार
 रविवार
नक्षत्र
 पुष्य (२२:४४)
योग
 गंड (८:४८), वृद्धि (२९:४९)
करण
 कौलव (१३:२९), तैतिल (२४:१८)


अरण्यषष्ठी

ज्येष्ठ शुक्ल षष्ठी हे तिथीव्रत आहे.
ज्येष्ठे मासे सिते पक्षे षष्ठी चारण्यसंज्ञिता ।
व्यजनैक करास्तस्यामटन्ति विपिने स्त्रियाः ।'
तां विन्ध्यवासिनीं स्कन्दषष्ठीमाराधयन्ति च ।
कन्दमूलफलाहारा लभन्ते संतति शुभाम् ॥
अर्थ- ज्येष्ठ शुक्ल षष्ठीला अरण्यषष्ठी असे नाव आहे. तिला स्कन्दषष्ठी असेही म्हणतात. त्या दिवशी सुवासिनी हातात पंखा घेऊन वनात हिंडतात. कंद-मुळे-फळे खाऊन उपास करतात व विंध्यवासिनीची पूजा करतात. अपत्यप्राप्तीसाठी हे व्रत आहे.
राजस्थानातल्या स्त्रिया हे व्रत करतात व त्या दिवशी अरण्यात जाऊन अपत्यप्राप्तीसाठी विशिष्ट वनस्पती खातात. यासारखा आणि याच हेतूने प्राचीन ड्‍रुइडिक (Druidic) लोक एक सण पाळीत आणि त्याची तिथीही षष्ठी हीच असे.

घबाड

२२:४४ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: कृत्तिका
चंद्र नक्षत्र : पुष्य
तिथी: शुक्ल ६ = ६  
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

षष्ठी श्राद्ध

अपराण्ह काळी षष्ठी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी अधिक जेष्ठ शुक्ल ६ त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे. किंवा ज्यांचा गेल्या वर्षी (शके १९३९) जेष्ठ महिन्यात मृत्यू  झाला असेल आणि ज्यांची श्राद्ध तिथी त्यांचे जेष्ठ शुक्ल ६ आहे त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध या दिवशी करावे.
ज्या महिन्यात निधन झाले असेल तोच महिना अधिक मास येतो तेव्हा प्रथम वर्षश्राद्ध त्या अधिक महिन्यातच करावे. मात्र प्रतिसांवत्सरिक श्राद्ध या निज जेष्ठ महिन्यात करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment