Friday, 31 August 2018

दिनविशेष - २ सप्टेंबर २०१८


तिथी
श्रावण कृष्ण ७ (२०:४७)
वार
रविवार
नक्षत्र
कृत्तिका (२०:४८)
योग
व्याघात (१६:२५)
करण
विष्टि (९:२०), बव (२०:४७)


श्रावणी रविवार

दर रविवारी गभस्ति सूर्याचे मौनाने पूजन करावे.

भानुसप्तमी

रविवारी सप्तमी तिथी असल्याने या दिवशी भानुसप्तमी आहे.

पुत्रव्रत

या व्रतासाठी श्रावण कृष्ण सप्तमीला उपवास करून विष्णूचे पूजन करावे. दुसरे दिवशी
ॐ क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा
या मंत्राने तिळाच्या १०८ आहुती द्याव्यात. ब्राह्मणभोजन घालून बेलफळ खाऊन वर षड्‌रस (मधुर, आंबट, खारट, कषाय, तिक्‍त, कटू ) अन्न घ्यावे. याप्रकारे प्रत्येक सप्तमीला करून वर्षभर झाल्यावर दोन गोदाने दिल्यास पुत्रप्राप्ती होते.

ललितासखी व्रत

श्रावण कृष्ण सप्तमीला हे व्रत करतात. सकाळी स्नानानंतर शुभ्र वस्त्रे नेसून नदीजवळून माती आणून त्याचे लिंग करावे व त्याची यथासांग पूजा करावी. नैवेद्य दाखवून आरती करावी. रात्री देवीच्यासाठी जागरण करावे व सकाळी सर्व वस्तू नदीकाठी नेऊन पुन्हा पूजा करून ब्राह्मण स्त्रियांना दान द्याव्यात व पूजा विसर्जन करावी. नंतर हवन, देव-पितर यांचे पूजन करून ब्राह्मणभोजन घालून दक्षिणा द्यावी. यायोगे सर्व मनोकामना पूर्ण होऊन शिवलोक प्राप्त होतो.

श्रीकृष्ण जयंती (जयंती योग)

मध्यरात्री रोहिणी नक्षत्र असल्याने यावेळी जयंती योग होत आहे.
हे व्रत श्रावण कृष्ण अष्टमीला करतात. भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमीला बुधवारी रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री चंद्र वृषभ राशीला असताना झाला म्हणून उपासक आपल्या हितासाठी हे व्रत करतात.
हे व्रत सर्वमान्य असून बाल, कुमार, तरुण, वृद्ध सर्व लोकांना, स्त्री-पुरुषांना करण्यास योग्य आहे. यामुळे पापनाश होऊन सुखाची वाढ होते. यासाठी अष्टमीचा उपवास व नवमीचे पारणे सोडल्यावर व्रत पूर्ण होते. व्रत करणार्‍याने उपवास करण्याच्या आदल्या दिवशी अंशमात्र जेवावे. रात्री व्रतस्थ असावे. उपवासादिवशी प्रात:स्नानादी नित्यकर्मे झाल्यावर सूर्य, सोम, यम, काल, संधी, भूत, पवन, दिक्पती, भूमी, आकाश, खेचर, अमर व ब्रह्म वगैरेंना नमस्कार करून पूर्व किंवा उत्तराभिमुख बसावे, हातात पाणी, फुले, गंध, फळे घेऊन
'ममाखिल पापपरशमनपुर्वक सर्वाभीष्टसिद्धये श्रीकृष्नजन्माष्टमीव्रतमहं करिश्ये'
असा संकल्प सोडावा. मध्याह्नीला स्नान करावे. घरात देवकीसाठी 'सूतिकागृह' ठरवावे. बाळंतपणासाठी जरूर त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून ठेवाव्यात. शक्य असेल तर गाण्याबजावण्याचा कार्यक्रम ठेवावा. त्यातीलच एक सुखरूप ठिकाणी चांगला मऊ बिछाना घालून त्यावर अक्षतांनी मंडळ करून कलश स्थापावा व त्यावर सोने, चांदी, तांबा, पितळ, लाकूड अथवा माती याची मूर्ती अगर चित्र ठेवावे. चित्र वा मूर्ती जन्मलेल्या कृष्णाला स्तनपान करीत आहे व लक्ष्मी त्याच्या पायाला स्पर्श करीत आहे, असे असावे. यानंतर भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, असे मानून आपल्या संप्रदायपद्धतीने अथवा वेदोक्‍त, पुराणोक्‍त विधीने यथोपचार प्रेमाने पूजा करावी. पूजेमध्ये देवकी, वसुदेव, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा व लक्ष्मी या सर्वांचा नामनिर्देश करावा. शेवटी '
प्रणमे देवजननीं त्वया जातस्तु वामन: ।
वसुदेवात्तथा कृष्णो नमस्तुभ्यं नमो नम: ॥
सपुत्रार्घ्यं प्रदत्तं मे गृहाणेनं नमोऽस्तुते ।'
या मंत्राने देवकीला अर्घ्य द्यावेत.
'धर्माय धर्मेश्‍वराय धर्मपतये धर्मसंभवाय गोविंदाय नमो नम: '
या मंत्राने श्रीकृष्णाला पुष्पांजली अर्पण करावी.
रात्रौ कथाकीर्तन, पुराण इ. कार्यक्रमांनी जागरण करतात. देवास फराळाचा नैवेद्य दाखवतात. आणि, नवमी दिवशी पंचोपचारे पूजा करून महानैवेद्य अर्पण करतात. मृत्तिकेच्या मूर्ती असल्यास त्या जलाशयात विसर्जन करतात. धातूच्या मूर्ती असल्यास देव्हार्‍यात ठेवतात किंवा ब्राह्मणास दान देतात. काही ठिकाणी दहीकाला होतो. फल - संतती, संपत्ती वैकुंठलोक यांची प्राप्ती.

भद्रा

९:२० पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका


योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

सप्तमी श्राद्ध

अपराण्ह काळी सप्तमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण कृष्ण ७ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment