Monday, 20 August 2018

दिनविशेष - २६ ऑगस्ट २०१८

तिथी
श्रावण शुक्ल १५ (१७:२६)
वार
रविवार
नक्षत्र
धनिष्ठा (१२:३६)
योग
अतिगंड (२०:४७)
करण
बव (१७:२६), बालव (३०:२३)

श्रावणी रविवार

दर रविवारी गभस्ति सूर्याचे मौनाने पूजन करावे.

रक्षाबंधन

हे व्रत पौर्णिमेला करतात. या दिवशी परान्ह व्यापिनी तिथी धरतात. जर ती दोन्ही दिवशी असेल अगर दोन्ही दिवशी नसेल तर पूर्वी धरावी. जर त्या दिवशी भद्रा असेल तर ती वर्ज्य करावी. भद्रामध्ये श्रावणी व फाल्गुनी दोन्ही वर्ज्य ठरविल्या आहेत. कारण श्रावणीमुळे राजाचे व फाल्गुनीमुळे प्रजेचे अनहित होते. त्या दिवशी व्रत करणार्‍याने प्रात:स्नानादी नित्यकर्मे करून वेदोक्‍त मंत्राने रक्षाबंधन, पितृतर्पण, आणि ऋषिपूजन करावे. शूद्राने मंत्राशिवाय स्नानदानादी करावे. रक्षेसाठी चित्रविचित्र रंगीत वस्त्र अगर रेशीम वापरावे. त्यात तीळ, सुवर्ण, केशर, चंदन, अक्षता आणी दूर्वा घालून त्याला रंगीत दोरा गुंडाळावा आणि आपल्या घरातील पवित्र जागी (देवघरात) कलश स्थापन करून त्यावर त्याची यथाविधी पूजा करावी. नंतर राजा, मंत्री, वैश्‍य अगर शिष्ट शिष्यांच्या वगैरे उजव्या हातात
'येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महबल: ।
तेन त्वां अनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ॥'
या मंत्राने बांधावा. या बंधनामुळे वर्षभर पुत्रपौत्रादी सर्व सुखी राहतात.

शुक्ल यजु: तैत्तरीय श्रवणी

जुने जानवे टाकुन नवीन जानवे घालणे, पुन्हा नव्याने अध्यन करणे, हा सांघिक स्वरुपाचा कुलाचार आहे.
 त्यावेळी वेगवेगळ्या देवतांचे पुजन होम - हवन विधी करतात.
यजुर्वेदीयांना श्रावणी करिता श्रावणातील पौर्णिमा हा मुख्य काळ सांगितला आहे
जेव्हा दोन दिवस सूर्योदयव्यापी पौर्णिमा असेल तेव्हा पूर्व दिवसाची घ्यावी.
तैत्तरीय शाखीयांनी दुसऱ्या दिवशी ४-६ घटिकांहून अधिक आणि १२ घटिकांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या दिवशीची घ्यावी.

श्यामाकाग्रयण

अग्रायण म्हणजे नवीन धान्याचा  स्थालीपाक ( होम ) करुन त्यानंतरच तो भक्षण करणें. अग्रयणाचे प्रकार तीन आहेत . व्रीह्याग्रयण , यवाग्रयण , आणि श्यामाकाग्रयण. त्या तीन आग्रयणांमध्यें श्यामाकाग्रयण अनित्य आहे . इतर दोन आग्रयणें अनाहिताग्नि ( आधान न केलेल्या ) गृहस्थाला नित्य आहेत.  
श्यामाक ( सांवे ), नीवार ( तृणधान्यें ) यांचा उपयोग करून  वर्षाऋतूंत व आपत्कालीं होम करावा . इतर द्रव्यानें किंवा जुन्या व्रीह्यादिकांनीं होम करुं नये .

हयग्रीवोत्पत्ति


अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

पौर्णिमा श्राद्ध

अपराण्ह काळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण शुक्ल १५ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment