तिथी
|
श्रावण शुक्ल १३ (१२:५१)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
उत्तराषाढा (६:४८)
|
योग
|
सौभाग्य (१९:११)
|
करण
|
तैतिल (१२:५१), गरज (२६:०५)
|
वरदलक्ष्मी व्रत
या व्रताच्या
विधी मध्ये एक कलश ठेऊन त्यामध्ये श्री वरदलक्ष्मीला आवाहन करतात. श्रीसूक्त पठण
करून देवीची षोडशोपचारे पूजा करतात.
यानंतर २१ अनारशांचा नैवेद्य देवीला अर्पण करतात. त्यानंतर ब्राह्मण, सुवासिनी आणि ब्रह्मचारी यांना उपायान अर्थात भेंटवस्तु
देतात. असे मानले जाते कि दक्षिण भारतात
तिरुवादी, तिरुवायुर आणि तिरुपुत्तुर येथील मंदिरात
लक्ष्मीने स्वत: शंकराची पूजा केली होती.
म्हणून या व्रतात या मंदिराना विशेष महत्व
आहे. या व्रताचे फल पुत्रप्राप्ति, समृद्धि आणि धनधान्य
प्राप्ति असे आहे.
श्रावणी शुक्रवार
दर शुक्रवारी जरा–जीवंतिका पूजन
करावे.
घबाड
६:४८ नंतर १२:५१
पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: मघा
चंद्र नक्षत्र : श्रवण
तिथी: १३
सूर्य नक्षत्र ते
चंद्र नक्षत्र = १३
१३ x ३ = ३९
यात शुक्ल
प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १३ तिथी मिळवू :
३९ + १३ = ५२
आता ७ ने
भागू ५२ / ७ = ७ ३/७
बाकी ३ म्हणून
घबाड.
चतुर्दशी श्राद्ध
अपराण्ह काळी चतुर्दशी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण शुक्ल १४ आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment