तिथी
|
आषाढ कृष्ण ३० (१५:२८)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
आश्लेषा (२४:०५)
|
योग
|
व्यतीपात (१९:४४)
|
करण
|
नाग (१५:२८), किंस्तुग्घ्न
(२५:४०)
|
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
दीपपूजन
आषाढी अमावास्या
"दीप अमावास्या" म्हणुन पाळली जाते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांना
(नीराजन, पणती, समयी पासून कंदील, इलेक्ट्रिक दिव्यापर्यन्त सर्वांना ) घासून पुसून स्वच्छ
करून ते पेटवले जातात. त्यांची पूजा केली जाते.
घरातील दिव्यांना
दुध पाण्याने धुउन स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून ठेवावेत त्यांची पूजा
करावी. या दिवसा पासूनच पत्रीचे महत्त्व
सुरु होते. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी
दिव्यांची पुजा करावी. गोडाचा नेवैद्य अर्पण करावा.
आपल्या घरातील
लहान मुलांना औक्षण करावे. वंशाचा दिवा असतो न म्हणून आता मुलगा मुलगी हा भेद करत
नाही त्यामुळे आपल्या दिव्याचे किंवा पणतीचे नक्की औक्षण करावे...!
दुर्वा ही वंश
वृद्धीचे प्रतिक आहे , त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी
....!!
या दिवशी
सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात...!
त्याच्या भोवती
रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्ज्वलित करून त्याची पूजा केली जाते....!
पूजेमध्ये
पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची
प्रार्थना करतात...!
दीप
सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्|
गृहाण मत्कृतां
पूजां सर्वकामप्रदो भव॥
हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज
आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’!
त्यानंतर दिव्यांची
कहाणी ऐकली जाते.
आयुरारोग्य व
लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते.
असं धार्मिक
ग्रंथात सांगितले आहे.
कहाणी दिव्याच्या अंवसेची-१
ऐका दीपकांनो, तुमची कहाणी.
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला
पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे
उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी
विचार केला. त्यांनीं रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे
दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घांसावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं
त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अंवसेचे दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य
दाखवावा. त्याप्रमाणं हीघरांतून निघाल्यावर तें बंद पडलं.
पुढं ह्या
अंवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखालीं मुक्कामास उतरला. तिथं
त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रूप धारण करून
झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचें घरीं जेवावयास काय
केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपाआपल्या घरीं घडलेली
हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला. बाबांनो, काय सांगू ?
यंदा माझ्यासारखा
हतभागी कोणीं नाहीं. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट
जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला
सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय ? मग तो सांगूं लागला. बाबांनो, काय सांगूं ? मी ह्या गांवच्या
राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशीं घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला
आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरानें विचार केला, हा आपल्यावर उगाच
आळ घातला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी
पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू-दिरांनीं
निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावं
पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो ! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला.
घडलेला प्रकार
राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाहीं अशी त्याची खात्री झाली. घरी आला.
कोणी प्रत्यक्षा पाहिलें आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरीं आणली.
झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य
करूं लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा
टळो ! ही सांठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
कहाणी दिव्याच्या अंवसेची - २
तमिळ देशाच्या पशुपती
शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती..!
लहानपणीच दोघांनी असं
ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या...!
पुढे गौरीला तीन मुली व
विनीतला तीन मुले झाली..!
गौरीच्या धाकट्या मुलीचे
नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचे दैव फिरल्याने
तो दरिद्री झाला...!
भाऊ गरीब झालेला पाहून ती
वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली..!
नंतर सगुणेचा विचार करू
लागली.
गौरीने (आईने) भावाला
दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले...!
तिने विनीतच्या धाकट्या
मुलाशी लग्न करायचे ठरविले..!
गौरी तिच्यावर संतापली.
परंतु तिने हेका सोडला नाही..!
लग्न होऊन ती विनीतच्या घरी
आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली...!
एके दिवशी त्या नगराचा राजा
स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका
घारीने उचलून नेली...!
अंगठी घेऊन घार सगुणेच्या
घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून
गेली...!
नंतर ती सगुणेला मिळाली. ती
राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली..!
राजाने प्रसन्न होऊन तिला
बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले..!
सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी
राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत
असा हुकूम काढा.’’ ..!
राजाने तसे केले. मग
शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले...!
तिने उपवास केला. राज्यात
कोणाच्याच घरात दिवे नव्हते...!
आपल्या दोन्ही दीरांना
पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी
शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्या बाईकडून परत येणार नाही..!
अशी शपथ घाल...!
त्याप्रमाणे त्यांनी केले.
अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली..!
या घटनेमुळे सगुणेच्या घरात
लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले...!
राज्यातले लोकसगुणेला
लक्ष्मीचा अवतार मानू लागले...!!
नक्तव्रतारंभ
दिवसा भोजन न
करता उपोषणाचा करणे पाणी पिणे व सुर्यास्तानंतर भोजन करणे म्हणजे नक्तव्रत. या
व्रताचा आरंभ होत आहे.
दर्श अमावास्या
अपराण्हकाली जास्त मानाने असणाऱ्या अमावास्येलाच "दर्श
अमावास्या" असे म्हणतात. अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता
अधिक फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.
दर्शश्राद्ध : दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना
उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.
अमावास्या-प्रतिपदा श्राद्ध
अपराण्ह काळी अमावास्या
आणि प्रतिपदा या दोन्ही तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी आषाढ
कृष्ण ३० किंवा श्रावण शुक्ल १ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
खंडग्रास सूर्यग्रहण
चंद्र हा पृथ्वी भोवती
फिरणारा उपग्रह आहे. तो आपल्या कक्षावृत्तातून फिरत असताना जेव्हा सूर्याच्या आड
येतो तेव्हा सूर्याचा संपूर्ण किंवा काही भाग आपणास दिसेनासा होतो. याला सूर्य ग्रहण
म्हणतात.
·
चंद्राचा कक्षा मार्ग हा
क्रांतीवृत्ताला सामोरा समोरच्या दोन बिंदूत सुमारे ५ अंशाचा विक्षेप कोण करून
छेदतो. त्यामुळे चंद्र स्वकक्षेत
क्रांतीवृत्तापासून ५ अंश उत्तरेस किंवा दक्षिणेस असेल असताना अमावास्या किंवा
पौर्णिमा झाली , तर त्या वेळी सूर्याच्या किंवा भूछायेच्या आड येऊन ग्रहण होते.
·
सूर्य ग्राहणात नेहमी
सूर्यबिंबाच्या पश्चिमेकडील बाजूस सुरवात होते तर चंद्र ग्रहणात नेहमी चंद्र
बिंबाच्या पूर्वेकडील बाजूने ग्रहण लागते.
·
चंद्र ग्रहण कधीही
कंकणाकृती होत नाही
हे ग्रहण भारतात दिसणार
नसल्याने ग्रहणाचे वेधादि कोणतेही नियम पाळू नयेत.
ग्रहण दिसणारे प्रदेश : ग्रीनलंड, उत्तर-पूर्व युरोप, रशिया,चीन, उत्तर पूर्व
आशिया
आरंभ: १३:३२
मध्य: १५:१६
समाप्ति: १७:०१
(सर्व वेळा भारतीय
प्रमाणवेळेनुसार)
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment