तिथी
|
भाद्रपद कृष्ण ८ (२६:१७)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (२३:४५)
|
योग
|
ववरीयान (१५:०९)
|
करण
|
बालव (१५:१५), कौलव (२६:१७)
|
कालाष्टमी
प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला
कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील
अष्टमीला शिवपूजन निषिद्ध मानले जाते.
एक काम्य व्रत.
भाद्रपद कृष्ण अष्टमीला
आर्द्रा नक्षत्र असेल त्या दिवशी या व्रताला प्रारंभ करतात. यात उमा-महेश्वराची
सुवर्ण मूर्तीला पंचामृताचे स्नान घालून त्यांची पूजा करतात. मग कणकेमध्ये पंचामृत
घालून ती मळतात व तिच्यापासून मासा वगैरे प्राण्यांच्या आकाराचे बत्तीस खाद्य
पदार्थ करून त्यांचा नैवेद्य दाखवतात. मग त्या सुवर्णमूर्ती व खाद्यपदार्थ एका
ब्राह्मणाला दान देतात.
फल- पापनाश; संपत्ती, दीर्घायुष्य व
कीर्ती प्राप्ती
महात्मा गांधी जयंती
भारताचे राष्ट्रपिता
मोहनदास करमचंद गांधी यांचा हा जन्म दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा
केला जातो.
मध्याष्टमी श्राद्ध
यमघंट योग
२३:४५ पर्यंत मंगळवारी आर्द्रा नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज
सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
|
सोमवार – विशाखा
|
मंगळवार – आर्द्रा
|
बुधवार – मूळ
|
गुरुवार – कृत्तिका
|
शुक्रवार – रोहिणी
|
शनिवार – हस्त
|
|
यमघंट योगावर जन्म
झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण
केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता
कुलक्षय
देवास्थापाना केली असता
मृत्यू हि फळे मिळतात.
याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५,
गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर
पुढे) देखील यमघंट योग होतो.
अष्टमी श्राद्ध
अपराण्ह काळी अष्टमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी अष्टमी असेल तर या दिवशी महालय करावा.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment