तिथी
|
श्रावण कृष्ण ८ (१७:४०)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
कृत्तिका (२६:३१)
|
योग
|
वृद्धि (६:४८), ध्रुव (२७:५५)
|
करण
|
बालव (६:४५), कौलव (१७:४०),
तैतिल (२८:३१)
|
स्वातंत्र्य दिन
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला
इंग्रजांपासून स्वतंत्र्य मिळाले. त्याच्या
गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक
राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तसेच
देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरणूवका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा
दिवस साजरा केला जातो.
उमामहेश्वर व्रत
हे व्रत श्रावण कृष्ण अष्टमी दिवशी
करतात. या दिवशी सायंकाळी उमामहेश्वराची पूजा करून एकभुक्त राहावे.
जयंतीव्रत
श्रावण कृष्ण अष्टमीला
रोहिणिनक्षत्र आले असता हे व्रत करतात. यशोदा व कृष्ण ह्या व्रताच्या देवता होत.
पंचपल्लवयुक्त कलशावर कृष्णाला स्तनपान देणार्या यशोदाची मूर्ती स्थापून तिच्या
सन्निध चंद्र, रोहिणी यांच्याही मूर्ती बसवतात. मग त्याची पूजा करतात.
गोपाळकाला
श्रीकृष्णाने
गायी चारतांना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा
काला केला आणि सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या
दिवशी काला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.
गोपाळकाला म्हणजे
पांढर्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा अधिकाधिक प्रमाणात निर्गुण चैतन्याशी
संबंध दर्शवणारा आणि पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समूच्चय. ‘काला’ हा शब्द एकसंध
आणि वेगात सातत्य असणार्या क्रियेशी संबंधित आहे. ‘काला’ म्हणजे त्या
काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्टपूर्ण
कार्य दर्शवणार्या घटनांचे एकत्रिकरण.
पूर्णावतारी
कार्य हे स्थळ, काळ आणि स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते. या
कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पैलू आध्यात्मिकरीत्या ईश्वरी नियोजनाद्वारे
मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात. ‘गोपाळकाला’ हा
श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो.
काल्यातील प्रमुख
घटक
पोहे, दही, दूध, ताक आणि लोणी हे
काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत.
·
पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक (काहीही झाले, तरी श्रीकृष्णाला
धरून ठेवणारे सवंगडी)
·
दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्या
मातृभक्तीचे प्रतीक
·
दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक
·
ताक : गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक
·
लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या
निर्गुण भक्तीचे प्रतीक
मन्वादि
१४ मन्वंतराच्या आरंभ
झाल्या अशा १४ तिथीना मन्वादि असे म्हणतात. या मन्वादि १४ तिथी पुढे दिल्या आहेत.
१
|
स्वायंभुव
|
चैत्र शुक्ल तृतीया
|
२
|
स्वारोचीस
|
चैत्र शुक्ल पौर्णिमा
|
३
|
उत्तम
|
कार्तिक शुक्ल पौर्णिमा
|
४
|
तामस
|
आषाढ शुक्ल पौर्णिमा
|
५
|
रैवत
|
कार्तिक शुक्ल द्वादशी.
|
६
|
चाक्षुस
|
आषाढ शुक्ल दशमी.
|
७
|
वैवस्वत
|
ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
|
८
|
सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
|
९
|
दक्ष सावर्णी
|
आश्विन शुक्ल नवमी.
|
१०
|
ब्रह्म सावर्णी
|
माघ शुक्ल सप्तमी
|
११
|
धर्म सावर्णी
|
पौष शुक्ल एकादशी.
|
१२
|
रुद्र सावर्णी
|
भाद्रपद शुक्ल तृतीया.
|
१३
|
देव / रुची
सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल अमावस्या.
|
१४
|
इंद्र/ भूती
सावर्णी
|
श्रावण कृष्ण अष्टमी.
|
‘मनु’ बाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत म्हटले आहे
महर्षय: सप्त
पूर्वे चत्वारो मनवस्तथा !
मद्भावा मानसा
जाता येषां लोक इमा प्रजा: !!
(श्रीमद्भ्गव्दगीता
अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण
म्हणतात हे अर्जुना सात महर्षी जन आणि
त्यांच्याही पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वंजन माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात
यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.
श्रीकृष्ण जयंती (वैष्णव)
वैष्णव संप्रदायी
सप्तमीयुक्त अष्टमीचे दिवशी श्रीकृष्ण जयंती करीत नाहीत. सूर्योदयाला थोडावेळ जरी
अष्टमी असेल तरी वैष्णव संप्रदायामध्ये अशा अष्टमीचे दिवशी जन्माष्टमी करतात.
श्रावणी मंगळवार
दर
मंगळवारी मंगळागौरी पूजन करावे.
अष्टमी श्राद्ध
अपराण्ह काळी अष्टमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण कृष्ण ८ आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment