तिथी
|
भाद्रपद शुक्ल ९ (२९:१७)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
जेष्ठा (२५:५३)
|
योग
|
विष्कंभ (२५:३०)
|
करण
|
बालव (१६:०५), कौलव (२९:१७)
|
अदु:ख नवमी
'अदु:खनवमी' हे भाद्रपद शुक्ल नवमीचे नाव. विशेषत: स्त्रिया
हे व्रत करतात. व्रतावधी नऊ वर्षांचा. व्रतदेवता गौरी असते. उपास, पूजा, जागरण या तीन्ही
गोष्टींना या व्रतात महत्त्व आहे. स्त्रिया प्रात:काळी नदीवर स्नान करून मौन धरून
घरी येतात. कलशावर पूर्ण पात्रात गौरीची स्थापना करतात. नंतर पूजा, वायनदान, उपोषण शक्य
नसल्यास हविष्यान्न भोजन, रात्री नृत्य, गायन, कथाश्रवणादी
कार्यांत जागरण; दशमीस देवीची उत्तरपूजा, विसर्जन, दंपतीभोजन व
व्रतसंपूर्ती. नऊ वर्षे पूर्ण झाल्यावर उद्यापन. सुवर्णगौरी-प्रतिमेची पूजा व दान.
तीळ. घृत. पायस यांचे हवन. नऊ दंपतीस वायन व भोजन.
नंदानवमी
भाद्रपद शुक्ल
नवमी दिवशी (नंदानवमी) दुर्गादेवीची यथासांग, यथाविधी पूजा करावी
म्हणजे विष्णूलोक प्राप्त होतो. व्रत करणार्याने शुक्ल सप्तमीला एकवेळ जेवावे, अष्टमीला उपवास
करून दुर्गादेवीला दूर्वांवर स्थापन करून फळाफुलांनी पूजा करावी. रात्री
'ॐ नंदायै नम: स्वाहा हूं फट'
या मंत्राने जप व
जागरण करावे. नंतर नवमी दिवशी सकाळी चंडिकादेवीची, गुरूची व कुमारीची पूजा
करून भोजन करावे. स्नान व पिण्यासाठी कुशोदकाचा उपयोग करावा. या प्रमाणे शु. ७, ८ व ९मीस चार
वर्षेपर्यंत करावे.
गौरी पूजन
भाद्रपदातील
शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन केले जाते.
गौरीची स्थापना
झाल्यानंतर दुसर्या दिवशी, ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा करून नैवेद्य
दाखवतात.
रवि पूर्वाफाल्गुनी नक्षत्र प्रवेश
२०:३८ ला रवि
पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करीत आहे.
रविचे मृग नक्षत्र ते हस्त
नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो.
रवि नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी
चंद्र नक्षत्र: जेष्ठा
वाहन: गाढव
रवि नक्षत्र प्रवेशाच्या
वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य नक्षत्रापासून चंद्र
नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
|
वाहन
|
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
|
१
|
घोडा
|
पर्वतावर पाऊस पडेल
|
२
|
कोल्हा
|
पाऊस पडणार नाही.
|
३
|
बेडूक
|
भरपूर पर्जन्यवृष्टी
होईल.
|
४
|
मेंढा
|
पाऊस पडणार नाही.
|
५
|
मोर
|
अल्पवृष्टी होईल.
|
६
|
उंदीर
|
अल्पवृष्टी होईल.
|
७
|
महिष
|
भरपूर पर्जन्यवृष्टी
होईल.
|
८
|
गाढव
|
अल्पवृष्टी होईल.
|
० / ९
|
हत्ती
|
भरपूर पर्जन्यवृष्टी
होईल.
|
रवि नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी
चंद्र नक्षत्र: जेष्ठा
अंतर : ८
८ ला ९ ने भागले असता बाकी
राहते ८. म्हणून वाहन गाढव आहे. याचाच अर्थ रवि पूर्वाफाल्गुनी
नक्षत्रात असताना अल्पवृष्टी होईल.
नक्षत्रसंज्ञा : सूर्य-सूर्य
सूर्य नक्षत्रे
|
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
|
चंद्र नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती
|
दोन्ही सूर्य नक्षत्रे
|
वारा सुटेल
|
दोन्ही चंद्र नक्षत्रे
|
पाऊस पडणार नाही
|
एक चंद्र व दुसरे सूर्य
|
पाऊस पडेल
|
रवि नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी =
सूर्य नक्षत्र
चंद्र नक्षत्र: जेष्ठा = सूर्य
नक्षत्र
दोन्ही सूर्य नक्षत्र आहे.
याचा अर्थ रवि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात असताना वारा सुटेल.
स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री नपुंसक
स्त्री नक्षत्रे
|
आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
|
पुरुष नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा ,उत्तराभाद्रपदा, रेवती
|
नपुंसक नक्षत्रे
|
विशखा, अनुराधा, जेष्ठा
|
सूर्य नक्षत्र स्त्री
संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री पुरुष असा योग असेल
तर: वृष्टी समाधान कारक होईल.
रवि नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी =
स्त्री नक्षत्र
चंद्र नक्षत्र: जेष्ठा = नपुंसक नक्षत्र
सूर्य नक्षत्र स्त्री
संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक आहे
त्यामुळे रवि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात असताना वारे सुटून वृष्टी मध्यम होईल.
पावसाचा अंदाज घेताना या
बरोबरच रविच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह स्थिती लक्षात घेणे
देखील अत्यावश्यक आहे.
नवमी श्राद्ध
अपराण्ह काळी नवमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी भाद्रपद शुक्ल ९ आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment