Saturday, 5 August 2017

दिनविशेष - ७ ऑगस्ट २०१७


तिथी
 श्रावण शुक्ल १५ (२३:४१)
वार
 सोमवार
नक्षत्र
 श्रवण (२७:३३)
योग
 आयुष्मान (१८:५८)
करण
 विष्टि (११:०८), बव (२३:४१)

खंडग्रास चंद्रग्रहण

पृथ्वी पासून सूर्याच्या पूर्ण विरुद्ध बाजूस चंद्र येतो, तेव्हा चंद्रावर पृथ्वीची छाया पडून, त्याचा संपूर्ण किंवा काही भाग दिसेनासा होतो. याला चंद्र ग्रहण म्हणतात

-    चंद्राचा कक्षा मार्ग हा क्रांतीवृत्ताला सामोरा समोरच्या दोन बिंदूत सुमारे ५ अंशाचा विक्षेप कोण करून छेदतो.  त्यामुळे चंद्र स्वकक्षेत क्रांतीवृत्तापासून ५ अंश उत्तरेस किंवा दक्षिणेस असेल असताना अमावास्या किंवा पौर्णिमा झाली , तर त्या वेळी सूर्याच्या किंवा भूछायेच्या आड येऊन ग्रहण होते.
-    सूर्य ग्राहणात नेहमी सूर्यबिंबाच्या पश्चिमेकडील बाजूस सुरवात होते तर चंद्र ग्रहणात नेहमी चंद्र बिंबाच्या पूर्वेकडील बाजूने ग्रहण लागते.
चंद्र ग्रहण कधीही कंकणाकृती होत नाही.

ग्रहण दिसणारे प्रदेश
भारतासह संपूर्ण आशिया खंड, युरोप सह अफ्रिका खंड, रशियाचा दक्षिणेकडील प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, अंटार्क्टिका

ग्रहण स्पर्श – २२:५२
ग्रहण मध्य – २३:५१
ग्रहण मोक्ष – २४:४९ (रात्री १२:४९)
ग्रहण पर्व – १:५७
(सर्व वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार)
हे ग्रहण सर्व भारतात खंडग्रास दिसणार आहे.

पुण्यकाल
ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे.

वेधारंभ
हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात असल्याने ३ प्रहर आधी म्हणजे दुपारी १ वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत.  वेधकाळात भोजन करू नये. स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध हि कर्मे करता येतील.  बाल, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रीयांनी सायंकाळी ५ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत.

ग्रहणातील कृत्ये
ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये झोप मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन व कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान, करण्यापुरती शुद्धी असते.

ग्रहणाचे राशीपरत्वे फल
मेष, सिंह, वृश्चिक, मीन या राशीना शुभ फल आहे.
वृषभ, कर्क, कन्या, धनु या राशींना मिश्र फल आहे.
मिथुन, तुला, मकर, व कुंभ या राशींना अशुभ फल आहे.
ज्यांना अशुभ फल आहे त्यांनी व गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये.

श्रावणी सोमवार

दर सोमवारी महादेवाचे पूजन करावे.

शिवमुष्टी

मूग.
श्रावणी सोमवारचे व्रत असते या दिवशी शंकराला शिवमूठ वाहिली जाते.
पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसर्‍या सोमवारी तिळाची, तिसर्‍या सोमवारी मूगाची, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा असेल तर सातूची शिवमूठ वाहिली जाते.
आपल्या शेतात पिकलेलं धान्य देवाला अर्पण करण्याची वृत्ती इथं दिसून येते. शंकराच्या १२ ज्योतीर्लिंग असलेल्या ठिकाणी भाविक मोठया संख्येने गर्दी करतात.
शिवामूठ वाहताना असे म्हणतात.
शिवा शिवा महादेवा,
माझी शिवामूठ ईश्वरा देवा.
सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा,
नावडती आहे ती आवडती कर रे देवा.

नारळी पोर्णिमा

समुद्राकाठी रहाणार्‍या व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. यादिवशी कोळी लोक आपल्या होड्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात.

श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनार्‍यालगत राहणार्‍या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. सुरक्षिततेची समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ तयार केले जातात. भारताला सुमारे 1517 कि.मी. लांबीचा व महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

रक्षाबंधन

हे व्रत पौर्णिमेला करतात. या दिवशी परान्ह व्यापिनी तिथी धरतात. जर ती दोन्ही दिवशी असेल अगर दोन्ही दिवशी नसेल तर पूर्वी धरावी. जर त्या दिवशी भद्रा असेल तर ती वर्ज्य करावी. भद्रामध्ये श्रावणी व फाल्गुनी दोन्ही वर्ज्य ठरविल्या आहेत. कारण श्रावणीमुळे राजाचे व फाल्गुनीमुळे प्रजेचे अनहित होते. त्या दिवशी व्रत करणार्‍याने प्रात:स्नानादी नित्यकर्मे करून वेदोक्‍त मंत्राने रक्षाबंधन, पितृतर्पण, आणि ऋषिपूजन करावे. शूद्राने मंत्राशिवाय स्नानदानादी करावे. रक्षेसाठी चित्रविचित्र रंगीत वस्त्र अगर रेशीम वापरावे. त्यात तीळ, सुवर्ण, केशर, चंदन, अक्षता आणी दूर्वा घालून त्याला रंगीत दोरा गुंडाळावा आणि आपल्या घरातील पवित्र जागी (देवघरात) कलश स्थापन करून त्यावर त्याची यथाविधी पूजा करावी. नंतर राजा, मंत्री, वैश्‍य अगर शिष्ट शिष्यांच्या वगैरे उजव्या हातात
'येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महबल: ।
तेन त्वां अनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ॥'
या मंत्राने बांधावा. या बंधनामुळे वर्षभर पुत्रपौत्रादी सर्व सुखी राहतात.

श्यामाकाग्रयण

अग्रायण म्हणजे नवीन धान्याचा  स्थालीपाक ( होम ) करुन त्यानंतरच तो भक्षण करणें. अग्रयणाचे प्रकार तीन आहेत . व्रीह्याग्रयण , यवाग्रयण , आणि श्यामाकाग्रयण. त्या तीन आग्रयणांमध्यें श्यामाकाग्रयण अनित्य आहे . इतर दोन आग्रयणें अनाहिताग्नि ( आधान न केलेल्या ) गृहस्थाला नित्य आहेत.  
श्यामाक ( सांवे ), नीवार ( तृणधान्यें ) यांचा उपयोग करून  वर्षाऋतूंत व आपत्कालीं होम करावा . इतर द्रव्यानें किंवा जुन्या व्रीह्यादिकांनीं होम करुं नये .

हयग्रीवोत्पत्ति


श्रवणाकर्म/ श्रवणपूजन

श्रावण पौर्णिमेदिवशीच राजा दशरथाच्या हातून वन्यपशू समजून नेत्रहीन मातापित्यांचा एकुलत एक पुत्र श्रावण मारला गेला. त्यावेळी राजा दशरथाने त्यांचे सांत्वन केले व आपल्या हातून चुकीने झालेल्या हत्येचे परिमार्जन व्हावे म्हणून श्रावणी पौर्णिमे दिवशी 'श्रवणपूजे' चा सर्वत्र प्रसार केला. तेव्हापासून बहुतेक सर्व श्रद्धाळू जन त्या दिवशी 'श्रवणपूजा' करून त्यालाच रक्षा अर्पण करतात. (हे व्रत नाही.)


कुलधर्म

जुने जानवे टाकुन नवीन जानवे घालणे, पुन्हा नव्याने अध्यनन करणे, हा श्रावणातल्या श्रवण नक्षत्रावर करावयाचा सांघिक स्वरुपाचा कुलाचार आहे. त्यावेळी वेगवेगळ्या देवतांचे पुजन होम - हवन विधी करतात.

अमृतयोग

२७:३३ पर्यंत सोमवारी श्रवण नक्षत्र असल्यामुळे अमृतसिद्धी योग होत आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

भद्रा

११:०८ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्राकल्याणी अशी नावे आहेत.हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्धअष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला पादअसे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका


योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

पौर्णिमा श्राद्ध

अपराण्ह काळी पौर्णिमा तिथी असल्यामुळेज्यांची श्राद्ध तिथी श्रावण शुक्ल १५ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.

सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment