Thursday, 17 August 2017

दिनविशेष - २२ ऑगस्ट २०१७


तिथी
 भाद्रपद शुक्ल १ (२२:१६)
वार
 मंगळवार
नक्षत्र
 मघा (१४:४३)
योग
शिव (२७:४१)
करण
किंस्तुग्घ्न (११:०४), बव (२२:१६)

मौनव्रतारंभ

हे व्रत भाद्रपद शुक्ल प्रतिपदेला पूर्ण होते. श्रावण पौर्णिमेपासून हे चालू झालेले असते. त्या दिवशी नदीस्नान झाल्यावर कोमल दूर्वांकुरांच्या १६ गाठी घातलेला तातू करून त्याचे पूजन करतात व स्त्रिच्या डाव्य़ा हातात व पुरुषाच्या उजव्या हातात बांधलेला असतो. यानंतर महिनाभर पाणी आणणे, दळणे, नैवेद्य करणे वगैरे वेळी सर्वस्वी मौन पाळावे व भाद्रपद शुक्ल प्रतिपदेला नदीस्नान करून नित्यकर्मे झाल्यावर देव, ऋषी, मनुष्य व पितरांचे तर्पण करावे. सदाशिवाची षोडशोपचारे पूजा करावी.
'जन्मजन्मांतरेष्वेव भावाभावेन यत्कृतम् ।
क्षंतव्यं देव तत्सर्वं शंभॊ त्वां शरणं गत: ॥‘
अशी प्रार्थना करावी. हे १६ दिवसांचे व्रत आहे.

महत्तमव्रत

हे व्रत भाद्रपद शुक्ल प्रतिपदेला करतात. यासाठी जटाजूटधारी, त्रिशूल, कपाल, कुंडिका यांनी युक्‍त, चंद्रधारी, त्रिनेत्री भगवान शंकराची सुवर्णमूर्ती त्या दिवशी स्थापन केलेल्या कलशावर ठेवावी आणि तिचे यथाविधी पूजन करावे. नैवेद्यात ४८ फळे अथवा मोदक अगर मिष्टान्ने ठेवून त्याचा नैवेद्य दाखवावा. १६ देवतांना, १६ ब्राह्मणांना देऊन १६ आपण घ्यावीत आणि
'प्रसीद देवदेवेश चराचर जगद्‌गुरो । वृषध्वज महादेव त्रिनेत्राय नमो नम: ॥
या मंत्राने प्रार्थना करून दूध देणारी गाय दान द्यावी. एकभुक्त राहून व्रत पूर्ण करावे. यायोगे सर्व पापांपासून मुक्‍तता मिळते; राज्य, धन, पुत्र, स्त्री, आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त होते.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

कन्यायन

२७:४९ ला रवि सायन सिंह राशीत प्रवेश करीत आहे.

सौर शरद ऋतु आरंभ

सौर कालगणनेनुसार शरद ऋतु आरंभ होत आहे.

प्रतिपदा श्राद्ध

अपराण्ह काळी प्रतिपदा तिथी असल्यामुळेज्यांची श्राद्ध तिथी भाद्रपद शुक्ल १ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment