तिथी
|
श्रावण शुक्ल ११ (१६:३७)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
जेष्ठा (१८:१३)
|
योग
|
ऐन्द्र (१७:०५)
|
करण
|
विष्टि (१६:३७), बव (२९:४६)
|
पुत्रदा एकादशी/ शुक्लैकादशी
श्रावण शुक्ल
एकादशी पवित्रा, पुत्रदा व पापनाशिनी असते. यासाठी आदले दिवशी दुपारी
हविष्यान्न एकवेळ घ्यावे (एकभुक्त) एकादशी दिवशी प्रात:स्नानादी कर्मे झाल्यावर
'मम समस्त दुरितक्षयपूर्वकं
श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं श्रावण शुक्लैकदशीव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून
भक्तिभावपुर्वक व यथाविधी परमेश्वराची पूजा करावी. अनेक प्रकारची फुले, फळे पत्री आणि
नैवेद्य देऊन आरती करावी. त्यानंतर रात्रीच्या वेळी गायन, वादन, नर्तन, कीर्तन आणि
कथाश्रवण यांत रात्रभर जागरण करावे. दुसरे दिवशी पारणे करून यथाशक्ती ब्राह्मणभोजन
घालून मग स्वत: जेवावे. यामुळे पापाचा नाश होऊन पुत्रादी प्राप्ती होते.
पवित्रार्पण विधी
श्रावण शुक्ल
एकादशीला देवाला पवित्रक अर्पण करतात. जरी सामान्यत: बाजारात मिळणार्या सुताचे वा
रेशमाचे पवित्रक करतात, तरी शास्त्रात त्याचे वेगळे विधान आहे.
त्याप्रमाणे मणी, रत्न, सोने, चांदी, तांबे, रेशीम, सूत, त्रिसर, पद्मसूत्र, कुशा, मुंज, कापूस अगर अन्य
प्रकारापासून पवित्रक करावे अगर सुवासिनी स्त्रीकडून सूत कातवून त्याच्या तीन दोर्यांचा
त्रिगुणाने करून त्यापासून बनवावे. रेशमाचे पवित्रक असेल तर त्यात आंगठ्याच्या
पेराप्रमाणे यथाशक्ती ३६०, २७०, १८०, १०८, ५४ , अगर २७ गाठी
घालाव्यात. त्याची लांबी गुडघा, मांडी अगर बेंबीपर्यंत ठेवून त्यावर पंचगव्य
प्रोक्षण करून त्याला स्वच्छ पाण्याने धुवावे. नंतर
'ॐ' नमो नारायणाय'
चा १०८ वेळा जप
करून शंखोदक शिंपडावे आणि रात्रभर ठेवून व्रताच्या दुसर्या दिवशी धारण करावा.
त्यावेळी तुपाने भिजलेल्या दोन वाती अगर कापूर पेटवून आरती करावी. आणि
मणि
-विद्रुममालाभिर्मंन्दारकुसुमदिभि: ।
इयं संवत्सरी
पूजा तवास्तु गरूडध्वज ॥
वनमाला यया देव
कौस्तुभं सततं ह्रदि ।
पवित्रमस्तु ते
तद्वत्पूजां च ह्रदये वह ॥'
असा श्लोक म्हणून
नमस्कार करावा. सत्ययुगात रत्नांचे, त्रेतायुगात सोन्याचे, द्वापार युगात
रेशमाचे व कलियुगात सुताचे पवित्रकक धारण करणे योग्य होय.
श्रावणी गुरुवार
दर गुरुवारी बुध-बृहस्पति
पूजन करावे.
घबाड
१८:१३
नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: आश्लेषा
चंद्र
नक्षत्र : मूळ
तिथी: १२
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११
x ३ = ३३
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १२ तिथी
मिळवू : ३३ + १२ = ४५
आता
७ ने भागू ४५ / ७ = ६ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
भद्रा
१६:३७
पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व
दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात
तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा
येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र
असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत
चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता
येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक
तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती
अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा
रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व
पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ
आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही
शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील
काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ
मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये
विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा
मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे
अग्निभय होण्याची शक्यता असते.
एकादशी श्राद्ध
अपराण्ह काळी एकादशी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण शुक्ल ११ आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह
काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment