तिथी
|
भाद्रपद कृष्ण ९ (२०:३७)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (२७:३५)
|
योग
|
व्यतीपात (२५:१२)
|
करण
|
तैतिल (९:४२), गरज (२०:३७)
|
घबाड
२७:३५ नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ
योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: उत्तराफाल्गुनी
चंद्र
नक्षत्र : पुनर्वसु
तिथी: कृष्ण १० = १५ + १० = २५
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२३
x ३ = ६९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २५ तिथी मिळवू : ६९ + २५ = ९४
आता
७ ने भागू ९४ / ७ = १३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
अविधवा नवमी
भाद्रपद कृष्ण
नवमीस हे नाव आहे. या दिवशी स्वत:ची माता अथवा कुटुंबातील अन्य कोणी स्त्री
अहेवपणी (सधवा) मृत झाली असल्यास तिचे श्राद्ध करतात. यात ब्राह्मणभोजनाप्रमाणे
सुवसिनीलाही भोजन घालण्याची रूढी आहे. या दिवशीं पिता जिवंत असुन माता मृत असेल
अशा गृहस्थानें श्राध्द करावयाचें असतें. हें श्राध्द सपिंडक करावें. माता मृत असून पुढें कांहीं दिवसांनीं पिता मृत
झाल्यास हें अविधवा नवमी श्राध्द करु नये असे म्हणतात.
नवमी श्राद्ध
अपराण्ह काळी नवमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी नवमी असेल तर या दिवशी महालय करावा.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment