तिथी
|
भाद्रपद कृष्ण ७ (२५:०२)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
कृत्तिका (७:५६)
|
योग
|
हर्षण (९:५४)
|
करण
|
विष्टि (१४:०९), बव (२५:०२)
|
गुरुपालट व गुरु उपासना
भाद्रपद कृष्ण
सप्तमी मंगलवार, दिनांक १२-०९-२०१७ रोजी सकाळी ६:५३ वाजता गुरु तुला राशीत
प्रवेश करतो
पुण्यकाल
मंगळवारी पहाटे ५:०२ ते सकाळी ८:४४ पर्यंत आहे
कर्क, मीन व वृश्चिक या
राशींना ४-८-१२ वा गुरु येत असल्याने त्यांनी व लोहपादाने ज्या राशीस येत
आहे त्यांनी पीडा परिहारार्थ गुरूच्या उद्देशाने जप, दान, पूजा अवश्य करावी
तुला, सिंह, वृषभ, मकर या राशींना १-३-६-१० वा येत असल्याने
त्यांनी जप, दान, पूजा या पैकी एखादा प्रकार केल्याने त्या
पीडेचा परिहार होईल
राशी
|
पाद
|
फल
|
वृषभ, कर्क, धनु
|
सुवर्ण
|
चिंता
|
मेष, कन्या, मकर
|
रौप्य
|
शुभ
|
सिंह, वृश्चिक, मीन
|
ताम्र
|
श्री प्राप्ति
|
मिथुन, तुला, कुंभ
|
लोह
|
कष्ट
|
पीडा परिहारार्थ
पुण्यकालात जप, दान, पूजा करणे अत्यंत पुण्यकारक आहे.
गुरू
सुवर्णपादाने आल्यास त्याचे फल जरी चिंता असे आहे, तरी सुवर्णपादी गुरु शुभ
आहे
पीडा परिहारक दान
वस्तू : सुवर्ण, कांसे, पुष्कराज, हरभऱ्याची डाळ, घोडा, साखर, पिवळे वस्त्र, पिवळी फुले
जपसंख्या : 19 हजार
प्रतिमा :
सुवर्णाची
जपमंत्र
देवानांच ऋषीणांच
गुरुं कांचनसन्निभम्।
बुध्दिभूतं
त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्।।
गुरू प्रतिमेच्या
पूजनाचा संकल्प दानाचा संकल्प
मम जन्मराशे:
सकाशात् अनिष्टस्थानस्थितगुरो: पीडापरिहारार्थ एकादशस्थानवच्छुभफलप्राप्त्यर्थं
सुवर्ण प्रतिमायां बृहस्पतिपूजनं तत्प्रीतिकरं (अमुक) दान करिष्ये।
गुरूच्या
ध्यानाचा श्लोक
अहो वाचस्पते जीव
सिंधुमंडलसंभव ।
एह्यांगिरससंभूत
ह्यारुढ चतुर्भुज ।।
दंडाक्षसूत्र वरद
कमंडलुधर प्रभो ।
महानिंद्रेति
संपूज्यो विधिवन्नाकिनां गुरु: ।।
दानाचा श्लोक
बृहस्पतिप्रीतिकरं
दानं पीडा-निवारकम् ।
सर्वापत्ति
विनाशाय द्विजाग्र्याय ददाम्यहम ।।
भद्रा
१४:०९ पर्यंत भद्रा म्हणजेच
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व
दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात
तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा
येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र
असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत
चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता
येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक
तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती
अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा
रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व
पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ
आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही
शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील
काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ
मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये
विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा
मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे
अग्निभय होण्याची शक्यता असते.
सप्तमी श्राद्ध
अपराण्ह काळी सप्तमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी सप्तमी असेल तर या दिवशी महालय करावा.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment