तिथी
|
भाद्रपद कृष्ण ४ (७:२५), भाद्रपद कृष्ण
५ (२९:२४)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
अश्विनी (१०:३७)
|
योग
|
ध्रुव (१५:३२)
|
करण
|
बालव (७:२५), कौलव (१८:२६), तैतिल (२९:२४)
|
घबाड
७:२५ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ
योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: पूर्वाफाल्गुनी
चंद्र
नक्षत्र : अश्विनी
तिथी: कृष्ण ४ = १५ + ४ = १९
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८
x ३ = ५४
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता
७ ने भागू ७३ / ७ = १० ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
क्षय दिन
ज्या
तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ती क्षय तिथी असते.
लागोपाठच्या
दोन सूर्योदयाच्या वेळी एकच तिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय
तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी
पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.
भरणी श्राद्ध
भरणीश्राद्ध
अपिंडक षड्देवतांच्या उद्देशाने सांकल्पविधीने करावे. याला धूरिलोचन अथवा
पुरूरवार्द्रव हे देव घ्यावे. भरणी श्राद्ध काम्य आहे. गयाश्राद्धाचे फल
इच्छिणाराने प्रतिवर्षी करावे.
पंचमी श्राद्ध
अपराण्ह काळी पंचमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी पंचमी असेल तर या दिवशी महालय करावा.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment