तिथी
|
भाद्रपद शुक्ल १४ (१२:४१)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
धनिष्ठा (१२:२४)
|
योग
|
सुकर्मा (२५:५६)
|
करण
|
वणिज (१२:४१), विष्टि (२४:४१)
|
शिक्षक दिन
डॉ. राधाकृष्णन
यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा
सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून
परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात
शिक्षकाचा मोठा वाटा असतो. डॉ. राधाकृष्णन यांनी एके ठिकाणी म्हटले आहे - "ज्या देशात
निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते तेंव्हा त्या देशातील
शिक्षकच खरे सन्मानाला पात्र होतात." आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी
शिक्षकांचा सन्मान केला जातो.
विश्वातील विविध
देशांमध्ये विविध दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. ५ ऑक्टोंबर हा जागतिक शिक्षक
दिन आहे.
देश
|
शिक्षक दिन
|
अर्जेन्टीना
|
११ सप्टेंबर
|
अल्बानिया
|
७ मार्च
|
ऑस्ट्रेलिया
|
ऑक्टोंबर मधील शेवटचा
शुक्रवार
|
ब्राज़ील
|
१५ ऑक्टोंबर
|
चिली
|
१६ ऑक्टोंबर
|
चीन(PRC)
|
१० सप्टेंबर
|
चेक गणराज्य
|
२८ मार्च
|
इक्वाडोर
|
१३ एप्रिल
|
अल साल्वाडोर
|
२२ जून
|
हांग कांग
|
१२ सप्टेंबर
|
हंगरी
|
जून महिन्याचा पहिला दिवस
|
भारत
|
५ सप्टेंबर
|
इंडोनेशिया
|
२५ नोव्हेंबर
|
ईरान
|
२ मे
|
मलेशिया
|
१६ मे
|
मेक्सिको
|
१५ मे
|
मंगोलिया
|
फेब्रुवारीचा पहिला weekend
|
पाकिस्तान
|
५ ऑक्टोंबर
|
पेरू
|
६ जुलै
|
फ़िलीपीन्स
|
५ ऑक्टोंबर
|
पोलैंड
|
१४ ऑक्टोंबर
|
रूस
|
५ ऑक्टोंबर
|
सिंगापुर
|
१ सप्टेंबर
|
दक्षिण कोरिया
|
१५ मे
|
ताइवान
|
२८ सप्टेंबर
|
थाईलैंड
|
१६ जानेवारी
|
तुर्की
|
२४ नोव्हेंबर
|
संयुक्त राज्य अमेरिका
|
६ मे
|
वियतनाम
|
२० नोव्हेंबर
|
अनंत चतुर्दशी / अनंतव्रत
हे व्रत भाद्रपद
शुक्ल चतुर्दशी दिवशी करतात. यासाठी उदयव्यापिनी तिथी घेतात. पौर्णिमायुक्त असेल
तर फल अधिक वाढते. कथेच्या अनुरोधाने जर मध्याह्नपर्यंत चतुर्दशी असेल तर उत्तम
मानतात. स्वत:स काही अडचण असेल तर ब्राह्मणाकडून पूजा करावी. कारण हे व्रत इतर
कोणत्याही सोयीच्या दिवशी करता येत नाही. आणि या व्रताचा लोप होत. नाही.
व्रत करणार्याने
त्या दिवशी प्रात:स्नान करून
'ममाखिलपापक्षयपूर्वक शुभफलवृद्धये
श्रीमदनन्तप्रीतिकामनया अनंतव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून
जागा सुशोभित करावी. चौरंगास कर्दळी लावून त्यावर साक्षात नाग अगर दर्भाचा बनवलेला
सप्तफणांचा शेषस्वरूप अनंत याची प्रतिष्ठापना करावी. त्याच्यापुढे १४ गाठींचा
रेशमाचा अनंतदोरक ठेवून आम्रपल्लवांसह पंचामृतादी धूप, दीप, गंध, फूल वगैरे
षोडशोपचारांनी पूजा करून नैवेद्य अर्पण करावा.
"नमस्ते
देव देवेश नमस्ते धरणीधर ।
नमस्ते सर्व
नागेन्द्र नमस्ते पुरुषोत्तम ॥"
असा श्लोक
म्हणून नमस्कार करावा, व
'न्यूनातिरिक्तानि परिस्फुटानि यानीह कर्माणि
मया कृतानि ॥
सर्वाणि चैतानि
मम क्षमस्व प्रयाहि तुष्ट: पुनरानमनाय ॥'
या मंत्राने
विसर्जन करावे आणि
'दाता च विष्णुर्भगवाननन्त: प्रतिगृहीता च स एव
विष्णु: ।
तस्मात्त्वया
सर्वमिदं ततं च प्रसीद देवेश वरान् ददस्व ॥'
या मंत्राने वाण
द्यावे बिनमिठाचे पदार्थ खावेत. .
कदलीव्रत
भाद्रपद शुक्ल चतुर्दशी
दिवशी केळी (कर्दळी ) च्या झाडाखाली बसुन अनेक प्रकारच्या फळा - फुलांनी व धूप -
दीप दाखवून त्याची पूजा करावी. सप्त धान्य, रक्तचंदन, घृतदीपक, दही, दूध अक्षता, वस्त्र, तुपात तळलेला
नैवेद्य, जायफळ, सुपारी व प्रदक्षिणा यांनी अर्चना करून
'चिन्तयेत्कदलीं नित्यं कदलै: कामदीपितै: ।
शरीरारोग्यलावण्यं
देहि देवि नमोऽस्तु ते ॥
अशी प्रार्थना
करावी. याप्रमाणे ३ अगर ४ महिने केल्यास त्या वंशात स्त्री पातकी निघत नाही व सर्व
पुत्रपौत्रादींसह सुदैवी व सदाचारिणी होतात.
पालीव्रत
भाद्रपद शुक्ल
चतुर्दशी दिवशी चारी वर्णांपैकी कुणीही कुलस्त्रीने जलाशयावर जाऊन अक्षता घेऊन
त्याचे मंडल करावे. त्यावर वरुणाची मूर्ती अथवा वारुण यंत्र स्थापन करावे. त्याची
गंध-फुलांनी पूजा करावी.
'वरुणाय नमस्तुभ्यं नमस्ते यादसां पते ।
अपांपते
नमस्तुभ्यं रसानां पतये नम: ॥'
या मंत्राने
अर्घ्य द्यावा आणि
'माक्लेदं मा च दौर्गन्ध्यं वैरस्यं मा
मुखेऽस्तु मे ।
वरुणो
वारुणीभर्ता वरदोऽस्तु सदा मम ॥'
अशी प्रार्थना
करून ब्राह्मणांना भोजन घालावे व मग स्वत: जेवावे.
प्रोष्ठपदी पोर्णिमा
तीन पिढ्या
पर्यंतचे श्राद्ध महालायात करतात.
मात्र त्या
आधीच्या तीन पिढ्यांचे श्राद्ध प्रोष्ठपदी
पौर्णिमेला केले जाते.
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
कुलधर्म
मृत्यू योग
१२:२४ नंतर मंगळवारी
शततारका नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो.
असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा
परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.
भद्रा
१२:४१ नंतर २४:४१ पर्यंत भद्रा
म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व
दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात
तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा
येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र
असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत
चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता
येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक
तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती
अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा
रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व
पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ
आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही
शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील
काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ
मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये
विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा
मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे
अग्निभय होण्याची शक्यता असते.
पौर्णिमा श्राद्ध
अपराण्ह काळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी भाद्रपद पौर्णिमा आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
पौर्णिमेचा महालय १०, १३, १४, १७, १९ पैकी कोणत्याही दिवशी करावा.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment