तिथी
|
कार्तिक शुक्ल ४ (अहोरात्र)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
जेष्ठा (२०:४६)
|
योग
|
अतिगंड (२५:१८)
|
करण
|
वणिज (१९:४७)
|
विनायक चतुर्थी
या चतुर्थीला 'स्कंद चतुर्थी' म्हणतात. या दिवशी गणेशबंधू षडाननाने देव-दानव
यांच्या युद्धात जय प्राप्त व्हावा म्हणून श्रीगणेशाचे व्रतपूर्वक पूजन केले.
त्यास लाल कमळे वाहिली. त्यावेळी प्रसन्न होऊन गणेशाने त्याला त्या युद्धात यशस्वी
होण्याचा वर दिला व आपले मयूर वाहन देऊन ही चतुर्थी तुझ्या नावे होईल, असा वर दिला.
एकानंगा पूजा
हे एक स्त्रीव्रत
आहे. एकानंगा हे एकानंशेचे दुसरे नाव आहे. कार्तिक शुद्ध चतुर्थी, अष्टमी, नवमी किंवा चतुर्दशी या
तिथीस हे व्रत करतात. चतुर्दशीच्या दिवशी पूजा करायची, ती एक फलित
वृक्षाखाली करतात व तिला अन्नाचा महानैवेद्य दाखवितात. मग त्या अन्नातला उत्कृष्ट
अंश देवीला पोचविण्याबद्दल बहिरी ससाण्याची किंवा दुसर्या एखाद्या पक्ष्याची
प्रार्थना करतात, या व्रताचा विशॆष हा की, या दिवशी पतीच्या अगोदर पत्नी भोजन करते.
भद्रा
१९:४७ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष माणू नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून
सर्व कार्यास प्रशस्त मानावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment