तिथी
|
मार्गशीर्ष शुक्ल १ (२०:०५)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
जेष्ठा (२६:३७)
|
योग
|
धृति (२९:४०)
|
करण
|
किंस्तुग्घ्न (०६:५८)
|
देवदीपावली
मार्गशीर्ष शुक्ल
प्रतिपदेला देवदिवाळी असे नाव आहे. या दिवशी सर्व चित्तपावन ब्राह्मण कुटुंबांतून
आपला कुलस्वामी, कुलदेवता व ग्रामदेवता यांना महानैवेद्य अर्पण
करण्याचा कुलाचार पाळला जातो. त्याला नैवेद्य घालणे असेही म्हणतात. यावेळी मुख्य
देवतांचे नैवेद्य स्वतंत्र पानावर व ग्रामदेवतांचे नैवेद्य त्यांच्या संख्येइतक्या
भाताच्या मुद व पक्वान्ने एका पानावर या प्रमाणे मांडतात. वडे-घारगे (भोपळ्याचे गोड वडे) हे मुख्य पक्वान्न या वेळी
करतात.
सर्व देवतांना
एकाच वेळी नैवेद्य दाखविण्यात येतो. कुलदेवतेचा नैवेद्य घरातील मंडळी सेवन करतात.
इतर ग्रामदेवतांचे नैवेद्य बहुधा गाईला घालतात किंवा गुरवाला अथवा गोरगरिबांना
देतात. देवदिवाळीला हे जमले नाही तर पुढे चंपाषष्ठीपर्यंत सोयीच्या अशा कोणत्याही
दिवशी नैवेद्य घालावेत.
हा दिवस कोकणात ‘कोकणचा बैलपोळा’ किंवा ‘देवदिवाळी’ या नावानं साजरा होतो.
गाई, बैल,
वासरे, म्हशी, रेडे यांच्या शिंगांना
रंग लावून, त्यांना गोडधोड खायला घालून हा सण साजरा केला
जातो. हा सण म्हणजे पशूधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे.
मार्तंड भैरव मल्हारी खंडोबा षड्रात्रोत्सवारंभ
मार्तंड (मल्हारी) खंडोबाचा
सहा रात्रीचा उत्सव मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीपर्यंत
असतो. हा सहा रात्रींचा उत्सव खंडोबाचे
नवरात्र म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रतिपदेला स्नान झाल्यावर
घरातील पुरुषांनी देवाची नेहमीप्रमाणे पूजा करावी. देव्हाऱ्यातच लाल वस्त्र टाकून,
त्यावर दोन विड्याची पाने ठेवून त्यावर खंडोबाचा टाक ठेवावा. त्याच्या जवळ किंवा
समोर ताम्हण ठेवून त्यात थोडे गहू ठेवावे. त्यावर भांडे ठेवून त्यात पाणी सुपारी
पैसा टाकावा. त्यावर पाच विड्याची पाने व खोबऱ्याची वाटी हळद लावून ठेवावे.
नैवेद्य दाखवून आरती करावी. देवासमोर समईत तेल, समईवात घालून दिवा लावून ठेवावा.
अशा रीतीने खंडोबाची पूजा करावी. सहा दिवस रोज पूजा करताना टाक न हलवता फक्त
हळद-कुंकू, अक्षता, फुले वाहावीत. मात्र इतर देवांची पूजा नेहमीप्रमाणे करावी.
घरातील एकाने सहा दिवस उपवास करावा व अखंड दिवा देवासमोर लावून ठेवावा.
शेवटच्या म्हणजे
चंपाषष्ठीच्या दिवशी देवांना नमस्कार करून टाक थोडासा हलवावा. नंतर देवासमोर
ठेवलेले ताम्हण उचलून ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा जयघोष करावा. ताम्हण
उचलताना घरातील सर्व लहान थोरांचा सहभाग असावा. ताम्हणातील हळद उडवावी (भंडारा) व
नंतर खोबरे प्रसाद म्हणून वाटावे. पुरणपोळी, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी व इतर
लिंबू चटणी कोशिंबीर असं सर्व नैवेद्य दाखवून दिवटीबुधलीने ओवाळून आरती करावी. सवाष्ण-ब्राह्मण
जेवावयास बोलवावे.
हे सहा दिवस रोज एक फुलांची
माळ खंडोबाला वाहावी.
यामागे एक कथा आहे. मार्तंड
भैरवाचे मणी व मल्लासुर या राक्षसांबरोबर युद्ध चालू असताना श्री महादेवाला विजय
मिळावा म्हणून सप्तऋषींनी मार्तंडभैरव या देवतेचे पूजन केले. जसजसा देवसेनेचा विजय
होऊ लागला, तसे एक प्रत्येक दिवशी एक विजयमाळ देवाला वाहिली गेली. तोच विधी आपण
घरी बसवलेल्या नवरात्रात करतो अशी मान्यता आहे. (काही ठिकाणी माळेची पद्धत नसते.)
ज्या दिवशी देवांना विजय मिळाला, त्या दिवशी देवांचे विधीपूर्वक पूजन करून
मार्तंडभैरवाचा जयघोष केला, तेच आपण तळी भरणे यातून करतो. देवांचा विजय झाल्यावर
ऋषीमुनींनी मार्तंडभैरवाला अनेक सुवर्ण दिव्यांनी ओवाळले. म्हणून तळी भरल्यानंतर
दिवटी-बुधली वापरून देवांना ओवाळावे.
अनरक व्रत
एक ऋतुव्रत.
हेमंत व शिशिर ऋतूंत हे करतात. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून याचा प्रारंभ होतो.
यात केशवपूजा व 'ॐ नमः केशवाय' या मंत्राचा १०८
वेळा जप करतात.
कात्यायनी व्रत
नंदव्रजातील
कुमारिकांनी श्रीकृष्ण पती मिळावा, म्हणून मार्गशीर्ष मासात
महिनाभर व्रत केले. त्या प्रात:काळी यमुनेत स्नान करीत व कात्यायनीदेवीची वालुकामय
मूर्ती बनवून तिची पूजा करीत.
इष्टि
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ
संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि
म्हणतात.
चंद्रदर्शन
अमावास्येला दिसेनासा
झालेला चंद्र रविच्या पुढे १२ अंश गेला कि चंद्रदर्शन होते. १८:५५ ला पश्चिमेकडे
चंद्रदर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त १५ म्हणजे महर्घ आहेत.
यमघंट योग
२६:३७ नंतर बुधवारी मूळ
नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग
वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
|
सोमवार – विशाखा
|
मंगळवार – आर्द्रा
|
बुधवार – मूळ
|
गुरुवार – कृत्तिका
|
शुक्रवार – रोहिणी
|
शनिवार – हस्त
|
|
यमघंट योगावर जन्म झाल्यास
बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण
केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता
कुलक्षय
देवास्थापाना केली असता
मृत्यू हि फळे मिळतात.
याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५,
गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर
पुढे) देखील यमघंट योग होतो.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment