तिथी
|
कार्तिक कृष्ण ३ (८:२२), कार्तिक कृष्ण ४ (२९:३६)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
मृग (७:४१), आर्द्रा (२९:३७)
|
योग
|
सिद्ध (११:०८)
|
करण
|
बव (१८:५४)
|
संकष्ट चतुर्थी
पुणे चंद्रोदय : २०:५५
या चतुर्थीला 'बहुला चतुर्थी' म्हणतात. ही वक्रतुंडाची तिथी प्रसिद्ध आहे. या दिवशी सर्व दिवस दूध पिऊन व्रत
करावे. उपास करावा. रात्री चंद्रोदयानंतर पुन्हा स्नान करून वक्रतुंडाची
षोडशोपचारे पूजा करावी. नंतर ब्राह्मणभोजन घालून सुवर्णदक्षिणा द्यावी. मग स्वत:
जेवावे. हे व्रत पापविनाशी आहे. यायोगे सर्व दु:खांचे अपहरण होते व सुख मिळते. या
व्रताच्या आचरणाने पूर्वीच्या काळी कर्दम नावाचा राजा क्षयरोगमुक्त होऊन अंती
देवलोकास गेला. तसेच एक पापकर्मा, अत्याचारी चांडाळ अनायासे घडलेल्या व्रताच्या प्रभावाने देवलोकी गेला.
करक चतुर्थी व्रत
हे एक स्त्रीव्रत आहे. कार्तिक कृष्ण चतुर्थीस हे व्रत करतात. गौरी ही या
व्रताची प्रधान देवता असून शिव, गणेश व कार्तिकेय या गौण देवता आहेत. हे व्रत सायंकाळी करतात. या व्रताचा
विधी-
व्रत-देवतांची चित्रे काढून ती वडाच्या झाडाखाली पूजास्थानी ठेवतात. मग स्नान
संकल्प, गणपतिपूजा इ. झाल्यावर
गौरीची पूजा करतात. मग पुढील मंत्राने प्रार्थना करतात.
नम: शिवायै शर्वाण्ये सौभाग्यं संततिं शुभाम् ।
प्रयच्छ भक्तियुक्तानां नारीणा हरिवल्लभे ॥
या व्रतात अन्नधान्य, दीपसहित दहा जलपूर्ण कुंभांचे दान, पोळीचा नैवेद्य, चंद्रोदय झाल्यावर त्याला अर्घ्यप्रदान करावयाचे असते.
फल – सौभाग्यप्राप्ती.
दशरथ चतुर्थी
कार्तिक कृष्ण चतुर्थीला 'दशरथ चतुर्थी' असे म्हणतात. हे एक व्रत आहे. एका मातीच्या पात्रात दशरथाची आणि दूर्गेची
मूर्ती ठेवून त्यांची पूजा करतात. हिला करक (करक = करा = मातीचे भांडे ) चतुर्थी
असेही म्हणतात.
फल - सर्व प्रकारच्या फलांचा लाभ.
भद्रा
८:२२ पर्यंत
भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष माणू नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून
सर्व कार्यास प्रशस्त मानावे.
मृत्यू योग
७:४१ पर्यंत गुरुवारी मृग
नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो.
असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष
रहात नाही.
घबाड
८:२२ नंतर २९:३६ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: विशाखा
चंद्र
नक्षत्र : आर्द्रा
तिथी: १५ + ४ = १९
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८
x ३ = ५४
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता
७ ने भागू ७३ / ७ = १० ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
क्षयदिन
ज्या
तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या
दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय
तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी
पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment