Friday, 4 November 2016

दिनविशेष - ५ नोव्हेंबर – २०१६




तिथी
 कार्तिक शुक्ल ५ (१०:४८)  
वार
 शनिवार
नक्षत्र
 पूर्वाषाढा (२५:३३)
योग
 धृति (२६:००)
करण
 कौलव (२३:३६)

पांडव पंचमी

पांडवांनी ईश्वराच्या (श्रीकृष्णाच्या) आदेशानुसार कौरवांवर विजय मिळवला, तो दिवस म्हणजे पांडव पंचमी. पांडव पंचमीला पांडव वनवास संपवून परत आले. महाभारत युध्द मार्गशीष महिन्यात कृतिका नक्षत्रावर शुक्ल पक्षात सुरु झाले ते १८ दिवस चालले होते. युद्धच्या सुरुवातीला अर्जुन विषाद योग प्रसंगी भगवान श्रीकृष्णानी गीता उपदेश केला तो दिवस मार्गशीर्ष शुक्ल एकादशी होता. पांडवांसारखे पुत्र घरात जन्माला यावेत आणि पुत्रांत असलेल्या गुणांची वृद्धी व्हावी, यांसाठी पांडवांची पूजा करतात.
गायीच्या शेणापासून पांडव सिद्ध करतात आणि त्यांची पूजा करतात. पुढील प्रार्थना आणि श्रीकृष्णाचा नामजप अधिकाधिक करावा.
हे श्रीकृष्णा, ज्याप्रमाणे तुझ्या आदेशाचे पालन करून पांडवांनी कौरवांच्या विरुद्ध युद्ध करून विजय मिळवला, त्याप्रमाणे आम्हाला समाजातील दुर्जन आणि वाईट शक्ती यांच्याविरुद्ध युद्ध करून त्यांना नष्ट करता येऊ दे. पांडवांनी जसे तुझे आज्ञापालन केले, त्याप्रमाणे आम्हाला गुरूंचे आज्ञापालन करून तुझ्यासारखे गुण आमच्यात आणता येऊ देत. आम्हा सर्वांवर तुझी कृपा सतत असू दे. ईश्वरी राज्य आणण्यासाठी आमची धडपड असू दे.

कड पंचमी


जया पंचमी किंवा जयाव्रत

कार्तिक शुद्ध पंचमीस हे व्रत करतात. गंगादी तीर्थांचे स्मरण करून तिलोद्वर्तन करून स्नान करून शुद्धासनी बसून भगवान 'हरी' व त्याच्या डाव्या बाजूस 'जया' ची स्थापना करावी. गंध व विविध फुलांनी प्रेमपूर्वक त्यांची पूजा करून हरीच्या विविध अंगांची (उदा पावले, गुडघे, छाती, पोट, वक्ष:स्थळ, कंठ, मुख, मस्तक इ. ) पूजा पद्मनाभ, नरसिंह, मन्मथ, दामोदर इ. नावांनी करावी.

'जयाय जयरूपाय जय गोविंदरूपिणे ।
जय दामोदरायेऽति जय सर्व नमोऽस्तु ते ॥'

या मंत्राने अर्घ्य द्यावे व सात तर्‍हेची धान्ये टोपलीत घालून त्यावर लालवस्त्र झाकावे व
'यथा वेणुफलं दृष्ट्‌वा तुष्यते मधुसूदन: ।
तथा मेहस्तु शुभं सर्वं वेणुपात्र प्रदानत: ॥

या मंत्राने टोपलीतील धान्ये ब्राह्मणांना द्यावीत. मग एका वस्त्रात गंधाक्षता, फुले, मोहर्‍या व दूर्वा घालून 'राखी' तयार करून
'येन बद्धो बलोराजा दानवेन्द्रो महाबल: ।
तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ॥'
या मंत्राने रक्षाबंधन करावे. हे व्रत केल्यामुळे ब्रह्महत्येसारख्या पापापासून मुक्ती मिळते व सर्व सुखांचा लाभ होतो.

घबाड

१०:४८ नंतर २५:३३ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: स्वाती
चंद्र नक्षत्र : पूर्वाषाढा
तिथी: ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ३ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment