तिथी
|
कार्तिक शुक्ल पोर्णिमा (१९:२२)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
भरणी (१६:२७)
|
योग
|
वरीयान (२३:४०)
|
करण
|
विष्टि (९:२१), बालव (२९:२४)
|
त्रिपुरारी पोर्णिमा
कार्तिक पौर्णिमेस हे नाव आहे. या दिवशी रात्री घरात, देवळात आणि घराबाहेरही दिवे
लावतात. दीपदान द्यावे, गंगास्नान करावे आणि कार्तिकस्वामीचे दर्शन घ्यावे, असा विधी आहे. निरनिराळ्या
देवस्थांनात दगडी दीपमाळा असतात, त्याही या दिवशी पाजळतात. या दीपोत्सवाला त्रिपुर पाजळणे असे म्हणतात.
दीपोत्सवाचा मंत्र असा -
कीटा: पतंगा: मशकाश्च वृक्षा जले स्थले ये विचरन्ति जीवा: ।
दृष्ट्वा प्रदीपं न च जन्मभागिनो भवन्ति नित्यं श्वपचा हि विप्रा: ॥
त्रिपुरीज्वलन व्रत
कार्तिक पौर्णिमेस या व्रताचे नाव आहे. या पौर्णिमेस आरंभ करून पुढील
वर्षाच्या कार्तिकी पौर्णिमेस व्रताचे उद्यापन करतात. या व्रताचा मुख्य देव शिव
आहे. दरमहा पौर्णिमेला शिवापुढे निरनिराळ्या प्रकारच्या ७५० वाती लावणे, निरनिराळी दीपपात्रे दान करणे, नैवेद्यासाठी निरनिराळे अन्नपदार्थ
करणे, शिवाच्या निरनिराळ्या
नावांचा आदेश करून ते पदार्थ शिवाला अर्पण करणे, असा या व्रताचा विधी आहे. दुसर्या दिवशी दांपत्याला भोजन घालून
वस्त्रालंकारांनी त्याची संभावना करायची असते. उद्यापनाच्या दिवशी संकल्पपूर्वक
ब्रह्मादी देवतांची स्थापना, कलशावर पूर्णपात्रात शिवाची सुवर्ण प्रतिमा ठेवून तिची पूजा करतात. नंतर
पितळेच्या दीपपात्रात अठरा धाग्यांनी बनविलेल्या ७५० वाती तुपात भिजवून त्यांनी
देवाची आरती करतात. रात्री जागरण करून दुसर्या दिवशी समिधा, तीळ पायस व तूप या हविर्द्रव्यांनी
हवन करतात. शेवटी गोदान, पीठदान करून बारा दापंत्यांना यथाशक्ती वस्त्रालंकार व सौभाग्य वायने देतात.
कार्तिकी व्रत
तामिळ लोकांचे एक व्रत. कार्तिकी पौर्णिमेस पंचमहाभूतांप्रीत्यर्थ हे व्रत
करतात. यात अग्नीला प्राधान्य असते. यामुळेच सूर्यास्तानंतर घरीदारी दिवे लावून
सर्वत्र प्रकाश करणे हे या व्रताचे वैशिष्ट्य आहे.
दक्षिण अर्काट जिल्ह्यातील तिरुवन्नमलाईच्या शिव-मंदिरात हा व्रतोत्सव थाटाने
साजरा करतात. या वेळी त्या सर्व डोंगरावर रोषणाई होते व शिखरावर एक मोठी मशाल
पेटविली जाते. या उत्सवात पालापाचोळा एकत्र करून जाळण्याची प्रथा आहे.
निचेंगोडू, पळणि व वेदारण्यम् व तिरुचेंदूर येथेही हा उत्सव करतात.
याच्या कथेचे पर्याय पुढीलप्रमाणे
१)
सर्वांगाच दाह होत होता म्हणुन बलिराजाने हे व्रत केले.
२)
महिषासुराशी लढताना शिवलिंग भग्न झाले, म्हणून त्या पापाच्या क्षालनासाठी पार्वतीने हे व्रत केले.
स्कंदजयंती
कार्तिकी पौर्णिमे दिवशी स्कंदजयंती मानतात व त्या दिवशी स्कंदमूर्तीची पूजा
करतात. कार्तिक पौर्णिमेस कृत्तिका नक्षत्र असताना स्कंदाचे दर्शन घेणारा धनवान व
वेदपारंगत होतो. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजा करून एका
उंच स्तंभावर अग्नी प्रज्वलित करतात.
कार्तिकस्नान समाप्ति
आश्विन
पौर्णिमेस चालू करून ३१व्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेला या व्रताची समाप्ती करावी.
गुरुनानक जयंती
गुरुनानक हे शीख धर्माचे संस्थापक व दहा शीख गुरूंपैकी प्रथम गुरू होते. त्या
निमित्त गुरुद्वारा मध्ये आकर्षक रोषणाई, लंगर इ. चे आयोजन केले जाते.
तुलसीविवाह समाप्ति
प्रबोधिनी
एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस तुलसी विवाह अधिक फलदायी होतो.
कार्तिकस्वामी दर्शन
१६:२७ नंतर १९:२२ पर्यंत पौर्णिमा व कृत्तिका नक्षत्र असल्याने या योगावर कार्तिक स्वामींचे दर्शन
घ्यावे.
विधी : प्रथम तेथे स्नान करून कार्तिकेयाचे दर्शन घेऊन दर्भ, चन्दन, फुले, दशांग धूप, दीप अर्पण करून कार्तिकेयाचे वाहन
मयूर त्याची पूजा करून नंतर पुढे दिलेले श्लोक म्हणून एक एक उपचार अर्पण करावा।
कमण्डलुर्जलापूर्ण: स्वर्णगर्भ: सुलक्षण: |
अर्पितस्ते महासेन प्रसन्नोऽनेन मे भव ||
या श्लोकाने जलाने भरलेला व त्यात किंचित सुवर्ण घातलेला कमण्डलु समर्पण करावा.
ब्रम्हसूत्रं महादिव्यं प्रीतये ते मयार्पीतम् |
ब्रम्हजन्मास्तु मे देव ब्रम्हसूत्रसमर्पणात् ||
ब्राम्हण जन्म प्राप्तीकरिता या श्लोकाने यज्ञोपवीत अर्पण करावे.
गोमतीतीरसंभूता गोपी वापी समुद्भवा |
मृदर्पिता मया तुभ्यं ब्रम्हजन्माप्तये गुह ||
या श्लोकाने गोपीचंदन समर्पण करावे.
उपवीतानि शुभ्राणि पवित्राणि शिवात्मज |
पुरतस्तेऽर्पयाम्यद्य प्रसादार्थं तव प्रभो ||
या श्लोकाने पोवते अर्पण करावे. (पोवते म्हणजे कापसाचे सुत काढून त्याची
नवसुती करून त्या नवसुतीची आठ ग्रंथीची (गाठीची) माळ).
तिला: काश्यपसंभूतास्तिला: पापहरा: स्मृता: |
पादयोरर्पितास्तेऽद्य
सर्वपापापनुत्तये ||
सर्व पाप दूर होण्याकरिता या श्लोकाने तीळ अर्पण करावे.
दर्भा ब्रम्हमया विष्णुस्वरूपा रुद्ररूपिण: |
प्रीत्यर्थं तव देवेश न्यस्ता: पादतले मया ||
या श्लोकाने दर्भ अगर कुश चरणावर अर्पण करावे.
अष्टाविंशतिसंख्याकै रुद्राक्षैर्योजिता मया |
अर्पिता तव हस्तेच गृहाण सुरसैन्यप ||
या श्लोकाने अठ्ठावीस रुद्राक्षांची माळ अर्पण करावी.
सुवर्णमुत्तमं लोके भुक्तिमुक्तिप्रदं तथा |
अर्पितं तव देवेश दैन्याज्ञानापनुत्तये ||
दैन्य व अज्ञान नाहीसे होण्याकरिता या श्लोकाने सुवर्ण अर्पण करून नमस्कार
करावा.
श्रीकार्तिकस्वामींचे दर्शनास जाणार्यांना हे वरील आठ श्लोक येणे आणि वरील
वस्तूही जवळ ठेवणे आवश्यक आहे. कार्तिक शुध्द पौर्णिमेस कार्तिकस्वामींच्या
दर्शनाचा हा विधि आहे.
भाद्रपद शुध्द षष्ठीला कार्तिकेयाचे दर्शन घेतले वा स्मरण केले असता पापांचा
नाश होतो. भविष्य पुराणात कार्तिकेयाची मृतिकेची मूर्ती करून पूजा करावयास
सांगितले आहे. नीलतीर्थांचे स्मरण करून स्नान करावे आणि वरील प्रमाणे उपचार अर्पण
करावेत.
मन्वादि
१४ मन्वंतराच्या आरंभ
झाल्या अशा १४ तिथीना मन्वादि असे म्हणतात. या मन्वादि १४ तिथी पुढे दिल्या आहेत.
१
|
स्वायंभुव
|
चैत्र शुक्ल तृतीया
|
२
|
स्वारोचीस
|
चैत्र शुक्ल पौर्णिमा
|
३
|
उत्तम
|
कार्तिक शुक्ल पौर्णिमा
|
४
|
तामस
|
आषाढ शुक्ल पौर्णिमा
|
५
|
रैवत
|
कार्तिक शुक्ल द्वादशी.
|
६
|
चाक्षुस
|
आषाढ शुक्ल दशमी.
|
७
|
वैवस्वत
|
ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
|
८
|
सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
|
९
|
दक्ष सावर्णी
|
आश्विन शुक्ल नवमी.
|
१०
|
ब्रह्म सावर्णी
|
माघ शुक्ल सप्तमी
|
११
|
धर्म सावर्णी
|
पौष शुक्ल एकादशी.
|
१२
|
रुद्र सावर्णी
|
भाद्रपद शुक्ल तृतीया.
|
१३
|
देव / रुची
सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल अमावस्या.
|
१४
|
इंद्र/ भूती
सावर्णी
|
श्रावण कृष्ण अष्टमी.
|
‘मनु’ बाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत
म्हटले आहे
महर्षय: सप्त
पूर्वे चत्वारो मनवस्तथा !
मद्भावा मानसा
जाता येषां लोक इमा प्रजा: !!
(श्रीमद्भ्गव्दगीता
अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण
म्हणतात हे अर्जुना सात महर्षी जन आणि
त्यांच्याही पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वंजन माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात
यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.
भद्रा
९:२१ पर्यंत भद्रा म्हणजेच
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष माणू नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून
सर्व कार्यास प्रशस्त मानावे.
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान
देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला
जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment