Wednesday, 14 November 2018

दिनविशेष - १६ नोव्हेंबर २०१८


तिथी
कार्तिक शुक्ल ८ (९:४१)
वार
शुक्रवार
नक्षत्र
धनिष्ठा (११:४६)
योग
ध्रुव (१८:२९)
करण
बव (९:४१), बालव (२२:५१)


दुर्गाष्टमी

प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

गोपाष्टमी / गोष्ठाष्टमी

गाईचे पूजन व प्रदक्षिणा, गाईचे मागून चालावे.
या दिवशी पहाटे गाईंना आंघोळ घालावी. गंधफुलांनी त्यांची पूजा करावी व वस्त्रालंकारांनी त्यांना सजवावे. शिवाय गोपाळां (गुराख्यां) चे पूजन करून गाईंना गोग्रास द्यावा. प्रदक्षिणा घालावी व गाईंच्या मागून थोडा काळा चालत जावे. असे केल्याने इच्छित फळ मिळते. याच दिवशी सायंकाळी गाई चरून येताच त्यांना नमस्कार करून, त्यांची पंचोपचार पूजा करावी. त्यांना पंचपक्वान्ने खावयास घालून त्यांची पायधूळ मस्तकी धारण करावी. यायोगे सौभाग्यवृद्धी होते.

रवि वृश्चिक राशीत प्रवेश

१८:३१ ला रवि वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. रवीच्या वृश्चिक राशी संक्रमणासाठी पुण्यकाल संक्रमणापूर्वी १६ घटिका असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. म्हणून पुण्यकाल १२:२३ ते सूर्यास्त असा आहे. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत.
सामुदायिक मुहूर्त १५ म्हणजे महर्घ आहे. रविच्या राशी संक्रमाणाच्या वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·         १५ : महर्ग / जघन्य : फळ = तेजी
·         ३० : साम्यार्घ : फळ = सम
·         ४५ : समर्घ : फळ = मंदी

महालय समाप्ति

भाद्रपद कृष्ण प्रतिपदेला सुरु झालेला महालय रवि वृश्चिक राशीत प्रवेश करेपर्यंत असतो. रवी वृश्चिक राशीत प्रवेश करत असल्यामुळे महालयाची समाप्ती होत आहे.

दग्ध योग

९:४१ पर्यंत शुक्रवारी अष्टमी तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


नवमी श्राद्ध

अपराण्ह काळी नवमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी कार्तिक शुक्ल ९ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment