Monday, 26 November 2018

दिनविशेष - २९ नोव्हेंबर २०१८


तिथी
कार्तिक कृष्ण ७ (१८:४६)
वार
गुरुवार
नक्षत्र
मघा (२९:२१)
योग
ऐन्द्र (१३:०२)
करण
विष्टि (७:४७), बव (१८:४६), बालव (२९:४९)


लक्ष्मीपदव्रत

कृच्छ व्रतांपैकी एक व्रत. कार्तिक वद्य सप्तमी ते दशमीपर्यंत दूध, बिल्वपत्रे, कमळे आणि कमळांचे तंतू सेवन करणे, एकादशीला उपवास आणि या पाच दिवसांत केशवाची पूजा करणे असा विधी आहे.
फल- विष्णुलोकप्राप्ती.

कालभैरव जयंती

कार्तिक कृष्ण अष्टमीला हे व्रत करावे. प्रत्येक प्रहराला भैरवाची यथाविधी पूजा करावी आणि

भैरवार्घ्यं गृहाणेश भीमरूपाव्ययानघ ।
गृहाण्यार्घ्यं भैरवेदं सपुष्पं परमेश्‍वर ॥
पुष्पांजलिं गृहाणेश वरदो भव भैरव ।
पुनरर्घ्यं गृहाणेदं सपुष्पं यातनापह ॥

असे मंत्र म्हणून तीन अर्घ्यं द्यावेत. रात्री जागर करावा आणि शिवकथा श्रवण करावी. सर्व पापांचे क्षालन होते. भैरवाचा जन्म मध्यान्ही झाला होता म्हणून व्रतासाठी मध्यान्हव्यापिनी अष्टमी घ्यावी.


कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

एक शैव व्रत. आश्‍विन कृष्ण अष्टमीस हे व्रत विहित आहे. कार्तिक व भाद्रपद कृष्ण अष्टमी व या तिथीही या व्रतला उक्त सांगितल्या आहेत. व्रतविधीस दिवसभर उपवास व रात्री चंद्रोदय झाल्यावर भिंतीवर शेंदुराने शिव आणि चंद्र काढून त्यांची पूजा करतात. या पूजेत आठ दिवे लावतात. आठ पात्रांत वडे, पुर्‍या पायस इ. खाद्य वस्तू ठेवून त्यांचा नैवेद्य दाखवितात. ही पूजा कालभैरवा (शिवा) ची असते. पूजेचा ध्यानमंत्र

अष्टकालं महाकालं भैरवाष्टगणान्वितम्।
चंद्रमासहितं शुक्‍ल मृत्युंजय नमोऽस्तु ते

या दिवशी
जागरं चोपवासं च कृत्वा कलष्टमीदिने ।
प्रयत: पापनिर्मुक्‍त: शैवो भवति शोभन: ॥

या वचनानुसार उपोषण करून रात्री जागर करावा,  म्हणजे सर्व पापे नाहीशी होतात आणि व्रत करणारा शैव बनतो.
या व्रतास कार्तिक कृष्ण अष्टमीला प्रारंभ करतात. या व्रतात प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीच्या दिवशी उमा-महेश्‍वराच्या दर्भाच्या मूर्ती करून त्यांची पूजा करतात. त्यांना प्रत्येक महिन्यात निरनिराळ्या नावांनी निरनिराळी फूले वाहतात. निरनिराळ्या खाद्य पदार्थांचे नैवेद्य दाखवितात. वर्षानंतर व्रताचे उद्यापन करतात. त्यावेळी दांपत्य-भोजन घालतात आणि त्याला तांबड्या रंगाची वस्त्रे व दोन सुवर्णधेनू दक्षिणा म्हणुन देतात.
फल- पुत्र, विद्या व शिवलोक यांची प्राप्ती

भद्रा

७:४७ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका

योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

सप्तमी श्राद्ध

अपराण्ह काळी सप्तमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी कार्तिक कृष्ण ७ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते. 
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment