तिथी
|
कार्तिक शुक्ल १५ (११:०९)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
कृत्तिका (१६:४१)
|
योग
|
परिघ (१०:५३)
|
करण
|
बव (११:०९), बालव (२२:०८)
|
कार्तिकस्नान समाप्ति
आश्विन
पौर्णिमेस चालू करून ३१व्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेला या व्रताची समाप्ती
करावी.
गुरुनानक जयंती
गुरुनानक हे शीख धर्माचे संस्थापक
व दहा शीख गुरूंपैकी प्रथम गुरू होते. त्या निमित्त गुरुद्वारा मध्ये आकर्षक
रोषणाई, लंगर इ. चे आयोजन केले जाते.
तुलसीविवाह समाप्ति
प्रबोधिनी
एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस तुलसी विवाह अधिक फलदायी होतो.
कार्तिकस्वामी दर्शन
११:०९ पर्यंत पौर्णिमा व
कृत्तिका नक्षत्र या योगावर कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे.
विधी : प्रथम तेथे स्नान करून कार्तिकेयाचे दर्शन घेऊन दर्भ, चन्दन, फुले, दशांग धूप, दीप अर्पण करून
कार्तिकेयाचे वाहन मयूर त्याची पूजा करून नंतर पुढे दिलेले श्लोक म्हणून एक एक
उपचार अर्पण करावा।
कमण्डलुर्जलापूर्ण:
स्वर्णगर्भ: सुलक्षण: |
अर्पितस्ते महासेन
प्रसन्नोऽनेन मे भव ||
या श्लोकाने जलाने भरलेला व
त्यात किंचित सुवर्ण घातलेला कमण्डलु समर्पण करावा.
ब्रम्हसूत्रं महादिव्यं
प्रीतये ते मयार्पीतम् |
ब्रम्हजन्मास्तु मे देव
ब्रम्हसूत्रसमर्पणात् ||
ब्राम्हण जन्म
प्राप्तीकरिता या श्लोकाने यज्ञोपवीत अर्पण करावे.
गोमतीतीरसंभूता गोपी वापी
समुद्भवा |
मृदर्पिता मया तुभ्यं
ब्रम्हजन्माप्तये गुह ||
या श्लोकाने गोपीचंदन
समर्पण करावे.
उपवीतानि शुभ्राणि
पवित्राणि शिवात्मज |
पुरतस्तेऽर्पयाम्यद्य
प्रसादार्थं तव प्रभो ||
या श्लोकाने पोवते अर्पण
करावे. (पोवते म्हणजे कापसाचे सुत काढून त्याची नवसुती करून त्या नवसुतीची आठ
ग्रंथीची (गाठीची) माळ).
तिला: काश्यपसंभूतास्तिला:
पापहरा: स्मृता: |
पादयोरर्पितास्तेऽद्य
सर्वपापापनुत्तये ||
सर्व पाप दूर होण्याकरिता या
श्लोकाने तीळ अर्पण करावे.
दर्भा ब्रम्हमया
विष्णुस्वरूपा रुद्ररूपिण: |
प्रीत्यर्थं तव देवेश
न्यस्ता: पादतले मया ||
या श्लोकाने दर्भ अगर कुश
चरणावर अर्पण करावे.
अष्टाविंशतिसंख्याकै
रुद्राक्षैर्योजिता मया |
अर्पिता तव हस्तेच गृहाण
सुरसैन्यप ||
या श्लोकाने अठ्ठावीस
रुद्राक्षांची माळ अर्पण करावी.
सुवर्णमुत्तमं लोके
भुक्तिमुक्तिप्रदं तथा |
अर्पितं तव देवेश
दैन्याज्ञानापनुत्तये ||
दैन्य व अज्ञान नाहीसे
होण्याकरिता या श्लोकाने सुवर्ण अर्पण करून नमस्कार करावा.
श्रीकार्तिकस्वामींचे
दर्शनास जाणार्यांना हे वरील आठ श्लोक येणे आणि वरील वस्तूही जवळ ठेवणे आवश्यक
आहे. कार्तिक शुध्द पौर्णिमेस कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा हा विधि आहे.
भाद्रपद शुध्द षष्ठीला
कार्तिकेयाचे दर्शन घेतले वा स्मरण केले असता पापांचा नाश होतो. भविष्य पुराणात
कार्तिकेयाची मृतिकेची मूर्ती करून पूजा करावयास सांगितले आहे. नीलतीर्थांचे स्मरण
करून स्नान करावे आणि वरील प्रमाणे उपचार अर्पण करावेत.
मन्वादि
१४ मन्वंतराच्या आरंभ
झाल्या अशा १४ तिथीना मन्वादि असे म्हणतात. या मन्वादि १४ तिथी पुढे दिल्या आहेत.
१
|
स्वायंभुव
|
चैत्र
शुक्ल तृतीया
|
२
|
स्वारोचीस
|
चैत्र
शुक्ल पौर्णिमा
|
३
|
उत्तम
|
कार्तिक शुक्ल पौर्णिमा
|
४
|
तामस
|
आषाढ
शुक्ल पौर्णिमा
|
५
|
रैवत
|
कार्तिक शुक्ल द्वादशी.
|
६
|
चाक्षुस
|
आषाढ
शुक्ल दशमी.
|
७
|
वैवस्वत
|
ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
|
८
|
सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
|
९
|
दक्ष सावर्णी
|
आश्विन
शुक्ल नवमी.
|
१०
|
ब्रह्म सावर्णी
|
माघ
शुक्ल सप्तमी
|
११
|
धर्म सावर्णी
|
पौष
शुक्ल एकादशी.
|
१२
|
रुद्र सावर्णी
|
भाद्रपद शुक्ल तृतीया.
|
१३
|
देव / रुची सावर्णी
|
फाल्गुन
शुक्ल अमावस्या.
|
१४
|
इंद्र/ भूती सावर्णी
|
श्रावण
कृष्ण अष्टमी.
|
‘मनु’
बाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत म्हटले आहे
महर्षय: सप्त पूर्वे
चत्वारो मनवस्तथा !
मद्भावा मानसा जाता येषां
लोक इमा प्रजा: !!
(श्रीमद्भ्गव्दगीता अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण म्हणतात
हे अर्जुना सात महर्षी जन आणि त्यांच्याही
पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वंजन माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात
यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.
इष्टि
इष्टि म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध
कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.
यमघंट योग
१६:४१ नंतर शुक्रवारी
रोहिणी नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज
सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
|
सोमवार – विशाखा
|
मंगळवार – आर्द्रा
|
बुधवार – मूळ
|
गुरुवार – कृत्तिका
|
शुक्रवार – रोहिणी
|
शनिवार – हस्त
|
|
यमघंट योगावर जन्म
झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण
केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता
कुलक्षय
देवास्थापाना केली असता
मृत्यू हि फळे मिळतात.
याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५,
गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर
पुढे) देखील यमघंट योग होतो.
प्रतिपदा श्राद्ध
अपराण्ह काळी प्रतिपदा
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी कार्तिक कृष्ण १ असेल तर या दिवशी
श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म
करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment